शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

गेल इंडियाच्या जमिनीवर उभारणार पॉलिमर प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 02:07 IST

अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल इंडिया कंपनी बंद पडल्याने त्याच ठिकाणी ५०० एकर परिसरामध्ये पॉलिमर कंपनी उभारण्यात येणार आहे.

अलिबाग : तालुक्यातील उसर येथील गेल इंडिया कंपनी बंद पडल्याने त्याच ठिकाणी ५०० एकर परिसरामध्ये पॉलिमर कंपनी उभारण्यात येणार आहे. सुमारे सात हजार ४२६ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध नसला, तरी प्रशिक्षित करून रोजगार संधी आणि जमिनीला वाढीव मोबदला मिळावा, अशा महत्त्वाच्या मागण्यांवर स्थानिक ठाम आहेत. त्यामुळे सरकार आणि कंपनी व्यवस्थापन भूमिपुत्रांचे प्रश्न नेमके कशा प्रकारे हाताळते यावरच नव्याने उभारण्यात येणाºया कंपनीचे यश आणि अपयश अवलंबून आहे.काही दिवसांपूर्वी पॉलिमर कंपनीसाठी पर्यावरणीय जनसुनावणी पार पडली. त्यामध्ये कोणत्याही प्रकाराचा विरोध करण्यात आलेला नाही अथवा होणारही नाही. मात्र, कंपनीला नेमक्या कोणकोणत्या स्वरूपाच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे, याची माहिती कंपनी व्यवस्थापनाने प्रथम द्यावी, त्यानंतर प्रकल्पग्रस्तांसह स्थानिकांना त्याबाबतचे योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.अलिबाग तालुक्यातील उसर, कुणे, मल्याण, खानाव परिसरातील गेल प्रकल्पासाठी १९८१ मध्ये १९६ हेक्टर (५०० एकर) जमीन एकरी एक लाख रुपये दराने एमआयडीसीने संपादित केली होती. यापैकी काही भूखंडांवर गॅस एथोरिटी आॅफ इंडियाचा प्रकल्प उभारण्यात आला. मात्र, जमिनी सरकारकडे अडकून राहिल्याने त्या जमिनींचा वापर शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी झाला अथवा गजरेपोटी कर्ज काढण्यासाठी झाला. वाढीव मोबदला मिळावा, यासाठी १५४ खातेदारांनी २३ वर्षे लढा दिला आहे. दरम्यान, न्यायालयाने या सर्व शेतकºयांना १२ रुपये प्रतिचौरस मीटर वाढीव मोबदला देण्याचे आदेश देऊनही तांत्रिक कारण पुढे करून प्रशासन वेळकाढूपणाकरत असल्याचे गोंधळी यांनी सांगितले.शेतकºयांचे पूर्वीचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची हमी सरकारने प्रकल्पबाधितांना द्यावी, विस्तारित प्रकल्पामध्ये किती रोजगार उपलब्ध होणार आहेत याची माहिती द्यावी, या रोजगारांमध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना प्रकल्पात नोकरी मिळण्याचा हक्क अबाधित ठेवावा, प्रकल्पामध्ये ज्या जागा निर्माण होतील त्याची यादी व्यवस्थापनाने प्रथम खानाव ग्रामपंचायतीला द्यावी, त्यानंतर खानाव ग्रामपंचायतीने नावे दिलेल्या उमेदवारांना कंपनीने त्या त्या प्रवर्गातील तांत्रिक (टेक्निकल) प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी, स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण योजना राबवावी, प्रकल्पाने त्यांचा सीएसआरमधील खर्च परिसरातील गावांच्या विकासासाठी खर्च करावा, त्यासाठी खानाव ग्रामपंचायतीच्या शिफारशींना प्राधान्य देण्यात यावे, प्रकल्पाने या परिसरात अद्ययावत असे रुग्णालय उभारावे, या रुग्णालयात सर्व अद्ययावत उपकरणे, वैद्यकीय अधिकारी, डायलेसिस सेंटर, सीटी स्कॅन, एमआरआय, अ‍ॅम्बुलन्स आदी सुविधा असाव्यात, प्रकल्पाने या परिसरातील ग्रामस्थांसाठी अलिबाग मुख्यालयापर्यंत ये-जा करण्यासाठी सकाळ, दुपार व सायंकाळी मोफत वाहतूक व्यवस्था निर्माण करावी यासह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत.जमिनींना मिळणार वाढीव भाव?एमआयडीसी अ‍ॅक्टनुसार जमिनींचे संपादन करण्यात आले आहे. त्या वेळी दोन रुपये ५२ पैसे प्रतिचौरस मीटर असा दर शेतकºयांच्या जमिनीला दिला होता. त्यानुसार त्यांना एकरी एक लाख रुपये मिळाले होते. आता सध्या बाजार भावानुसार ५० रुपये चौरस मीटर दर असल्याने जमिनीची किंमतही एकरी १८ लाख रुपये अशी होते.गेल पेट्रोकेमिकल काम्प्लेक्समध्ये ५०० केटीपीए प्रोपेन डिहायड्रोजनेशन युनिट, पोलि प्रोपेम युनिटची स्थापना पुढील चार वर्षांत करण्यात येणार आहे. त्यासाठी सात हजार ४२६ कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार आहे. या कंपनीतून प्रतिवर्षी एक हजार टन पॉलिमरचे उत्पादन घेतले जाणार आहे.पॉलिमर्स वापरआधुनिक जीवनात जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात पॉलिमर्सचा वापर केला जातो. किराणा पिशव्या, सोडा आणि पाण्याच्या बाटल्या, टेक्सटाइल फायबर, फोन, संगणक, खाद्य पॅकेजिंग, आॅटो पार्ट्स आणि खेळण्यांमध्ये सर्व पॉलिमर्स वापर केला जातो. 

टॅग्स :Raigadरायगड