शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुरुड समुद्रकिनाऱ्याची बंधा-याअभावी दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 01:59 IST

कोकणाला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

- संजय करडे 
मुरुड : कोकणाला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. पावसाळ्यात येणारी भरती यामुळे धूपप्रतिबंधक बंधारे फुटून भरतीचे पाणी शेतीमध्ये जात आहेत, तसेच समुद्रकिनाºयाला असणारी दगडाच्या भिंतवरून पाणी गेल्याने समुद्रकिनारच्या सुरूंच्या झाडांची वने नष्ट होऊन समुद्रकिनाºयाचे मोठे नुकसान होत आहे.
किनाºयाची धूप, लाटांच्या माºयामुळे दिवसेंदिवस उन्मळून पडणारी उंच सुरूची झाडे, उधाणासोबत वाहून आलेला कचरा, बसण्यासाठी बांधलेल्या सिमेंटच्या बाकांची दुर्दशा. अशी स्थिती आहे मिनी गोवा म्हणून परिचित असलेल्या मुरुडच्या समुद्रकिनाºयाची. या पर्यटनवृद्धी होणाºया अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे शासन व प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले आहे. त्याकडे गांभीर्याने कोणीही लक्ष न दिल्यास भविष्यात हा किनारा उद्ध्वस्त होऊन पर्यटनस्थळाचे मोठे नुकसान होण्याचा धोका आहे.
मुरुडमध्ये दरवर्षी दीड लाखापेक्षा अधिक पर्यटक येतात. ही संख्या नजीकच्या वर्षात दुप्पट हाण्याची शक्यता आहे. तथापि रस्ते व किनारा सुशोभीकरण, वाहनतळ आदी मूलभूत सुविधा देण्याकडे कोणाचेही लक्ष नाही. मुरुड नगरपरिषदेनेही प्राधान्याने हा विषय लावून धरला असला, तरी शासनाकडून अपेक्षित विकास निधी आणू शकले नाहीत, ही सत्यता नाकारता येत नाही.
मुरुड समुद्रकिनाºयावरील जिल्हा परिषद विश्रामगृह ते विश्रामबागेपर्यंतचा दगडी बांध नावापुरताच उरला असून पावसाळी लाटांच्या माºयात सुरूची अनेक झाडे उन्मळून पडली असून ही झाडे संवर्धनासाठी गेल्या १० ते १५ वर्षांपासून कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. सामाजिक वनीकरणाच्या १९८० सालच्या योजनेतून सुरूंच्या झाडांची लागवड केली होती. आज घडीला पर्यटकांसाठी सुरूचे बन हे आकर्षण ठरू पाहत असले तरी योग्य पद्धतीने वृक्षांचे संवर्धन झालेले नाही. मेरीटाइम बोर्डानेही धूपप्रतिबंधक बंधाºयाकडे फारसे लक्ष न दिल्याने मुरुडच्या किनाºयाची बिकटावस्था आहे. मुरुडच्या किनाºयावर धूपप्रतिबंधक दगडी बंधारा बांधून उर्वरित सुरूंच्या झाडांचे संवर्धन करणे अंत्यत गरजेचे आहे. तरी शासनाने या पर्यटनस्थळी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.
>अलिबाग समुद्रकिनाºयाप्रमाणे दगडी बंधारा बांधण्याची मागणी
मुरुड समुद्रकिनारी वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते, अशा वेळी मुरुड शहरातील समुद्रकिनारा हा सुंदर असणे गरजेचे आहे; परंतु यंदाच्या या पावसात मोठी भरती आल्याने समुद्रकिनारी असणारा बंधारा उद्ध्वस्त झाला आहे, तर जिल्हा परिषद गेस्टहाउस मागील दगडी बंधाºयावरून पाणी गेल्याने असंख्य सुरूची झाडे उन्मळून पडली आहेत. यामुळे किनारा उघडा-बोडका दिसत असून या ठिकाणी लवकरात लवकर दगडी बंधारा बांधणे खूप आवश्यक झाले आहे. पर्यटक व स्थानिक नागरिकांनी या भागात अलिबाग समुद्रकिनाºयाप्रमाणे दगडी बंधारा बांधावा, अशी मागणी केली आहे.
>मेरीटाइम बोर्डाकडे आम्ही पाठपुरावा करीत असून किनारा सुशोभीकरणाचा २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव १६ एप्रिल २०१८ रोजी सादर केला आहे. पर्यटन मंत्रालयातही दोनदा भेट देऊन या विषयासाठी संपर्क केला आहे. तसेच पालकमंत्र्यांनी ही शिफारस केली आहे. निधी प्राप्त होताच किनारा सुशोभीकरण करणार असून पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळावा, असा मुरुड नगरपरिषदेचा प्रयत्न आहे.
- पांडुरंग आरेकर, नियोजन व पर्यटन समिती सभापती, नगरपरिषद मुरुड