शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी नियोजनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:07 IST

बोअरवेल फेल : महाड तालुक्यातील पिण्याची पाणी योजना प्रस्तावित; टंचाईची झळ

- सिकंदर अनवारे

दासगाव : महाड तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी पाणीटंचाई जाणवलेल्या गावांत पुन्हा यावर्षीही पाणीटंचाई जाणवल्याने प्रशासन सज्ज झाले. प्रतिवर्षी पाणीटंचाई आणि पाणी या प्रश्नांवर लाखो रुपये खर्च केले जात असले, तरी ठोस उपाय न केल्याने ही टंचाई वर्षानुवर्षे जाणवतच आहे. भूगर्भातील पाणी पातळी आधीच घटली असतानाच बोअरवेलही मारल्या जात आहेत. महाड तालुक्यात यावर्षी जवळपास ६८ बोअरवेल मारण्यात आल्या आहेत. गावातील भौगोलिक स्थिती नपाहता नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात असल्याने पाणी योजना सपशेल फेल ठरत आहेत.

महाड तालुका हा दुर्गम आणि खेडोपाड्यात वसलेला तालुका आहे. या तालुक्यात गेली अनेक वर्षे असलेली पाणीटंचाईची समस्या आजही कायम भेडसावत आहे. वर्षानुवर्षे नवनवे प्रयोग करूनही काही गावातील पाणीटंचाई दूर झालेली नाही, यामुळे या गावात प्रतिवर्षी टँकरने पाणीपुरवठा करणे भाग पडत आहे. महाड पंचायत समिती पाणीपुरवठा करण्यासाठी लाखो रुपये खर्ची घालत आहे, तर दुसरीकडे याच गावातून पाणी योजनांवरही खर्च टाकला जात आहे. दुर्गम भागात पाण्याचे अन्य स्रोत उपलब्ध नसल्याने सद्यस्थितीत १२ गावे व ५५ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पिंपळकोंड, पाचाड गाव व वाड्या, पुनाडे, शेवते, वाकी गावठाण, ताम्हाणे, सापे, साकडी, नेराव, आढी, घुरुपकोंड या गाव व वाड्यांना टंचाईची झळ पोहोचत आहे. या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा हाच आधार उरला आहे. पाण्याचा टँकर हा दररोज जात नसल्याने पाणी पुरवून वापरावे लागत असते.

याशिवाय वारंगी गाव व वहूर गावच्या वाड्या अशा एकूण १६ वाड्यांत टँकरने पाणीपुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. त्यामुळे तालुक्यात १३ गावे व ७२ वाड्या अशा ८५ ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महाड तालुक्यात असलेली पाणीटंचाई दूर करण्यास योग्य नियोजनाची गरज आहे. याकरिता तालुक्यातील प्रलंबित पाणी प्रकल्प पूर्ण झाले तर पाणीटंचाई दूर होईल. टँकरमुक्त अभियान राबवताना तालुक्यातील रखडलेले पाणीप्रकल्प पूर्ण झाले तर तालुका सुपीक होण्यास मदत होणार आहे.शासकीय योजनांसाठी पाठवलेले प्रस्ताव प्रलंबितमहाडमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता तोरो यांनी आता टंचाईग्रस्त गावात स्वत: पाहणी करून कावले तर्फे विन्हेरे, ताम्हाणे, पिंपळकोंड, किये, पाचाड, कुंभेशिवथर, रावतळी, नडगाव तर्फे तुडील आदी गावात जलस्वराज्य टप्पा-२, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, जलयुक्त शिवार योजना, या योजनांतून प्रस्ताव पाठवले आहेत. मात्र, हे सर्व प्रस्ताव प्रलंबित आहेत.दुर्लक्षामुळे अपयशीमहाड तालुक्यातील काळ जलविद्युत प्रकल्पामुळे किल्ले रायगड परिसर, वारंगी ते बिरवाडी, कोंझर ते महाड हा परिसर पाण्याखाली येणार आहे. विन्हेरे विभागातील आंबिवली धरण, कोथेरी धरण आजही अपूर्ण अवस्थेत खितपत पडून आहेत. यामुळे हे प्रकल्प मार्गी लागणे काळाची गरज आहे. महाड तालुक्यातील पाणीटंचाईवर शासनाच्या पाणलोट, राष्ट्रीय पेयजल योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना, जलस्वराज्य आदी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. मात्र, या योजना राबवताना तेथील भौगोलिक स्थिती आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सूचनांकडे केले गेलेले दुर्लक्ष अपयशी होण्यास कारणीभूत ठरले आहे.