शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

पालीकारांना प्यावे लागते गढूळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:15 PM

आरोग्याचा प्रश्न गंभीर : पाणी उकळून पिण्याचे ग्रामपंचायतीचे आवाहन

पाली : अष्टविनायक देवस्थानापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत वर्षानुवर्षे शुद्ध पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. परतीच्या पावसामुळे पुन्हा एकदा येथील अंबा नदीचे पाणी आणखीनच गढूळ व दूषित झाले आहे. संपूर्ण पाणी मातकट रंगाचे झाले आहे. त्यामुळे पाणी उकळून व गळून पिण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. ग्रामपंचायतीमार्फत गुरुवार, १० आॅक्टोबर रोजी जॅकवेलजवळील गॅलरीमधील गाळ काढण्याचे काम सुरू झाले, तसेच साठवण टाक्यांमध्ये गाळ साठला असल्यास तोदेखील साफ करून काढला जाईल, अशी माहिती पाली सरपंच गणेश बाळके यांनी दिली.

पालीकरांना येथील अंबा नदीच्या पाण्याचा नळाद्वारे पुरवठा करण्यात येतो. वितरित होणाऱ्या या पाण्यावर कोणतेही शुद्धिकरण व क्लोरीनेशनची प्रक्रिया न करता थेट पालीकरांना पाणी पुरविले जाते. अशा प्रकारे कित्येक वर्षे पालीकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. पाली हे अष्टविनायकाचे क्षेत्र आहे. येथे रोज असंख्य भाविक येत असतात. पालीची लोकसंख्यादेखील पंधरा हजारांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे गढूळ व खराब पाणी प्यावे लागत आहे. आतापर्यंत येथील नळांतून चक्क जिवंत साप, शिंपले, मासे आणि किडे अनेक वेळा बाहेर आले आहेत. गाळ, चिखल आणि शेवाळ येणे हे तर नेहमीचेच आहे.

पालीकरांसाठी जवळपास १२ कोटींची शुद्ध पाणीपुरवठा योजना मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राजकीय हेवेदावे आणि लालफितीत ही योजना अडकल्यामुळे पालीकर अजूनही शुद्ध पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रसारमाध्यमांनी मागील चार-पाच वर्षांपासून हा विषय वारंवार मांडला आहे. मात्र, अजूनही प्रशासन व राजकारण्यांकडून याकडे लक्ष दिले जात नाही.

निवडणुकीत भांडवलाचा मुद्दाच्पालीतील शुद्ध नळ पाणीपुरवठा योजना मागील १५ ते २० वर्षांपासून प्रलंबित आहे. योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनदेखील आजतायागत ही योजना कार्यान्वित झालेली नाही. सर्वच राजकीय पक्ष व त्यांच्या पुढाऱ्यांनी या योजनेचे निवडणुकीपुरते भांडवल के ले आणिश्रेयही घेतात. मात्र, एकदा निवडणुका संपल्या की, त्यांना या गोष्टीचा विसर पडतो.गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे अंबा नदीचे पाणी गढूळ झाले आहे. त्यामुळे गावाला गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यावर उपाययोजना सुरू आहे. तरी गावातील नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने पाणी उकळून व गाळून प्यावे.- गणेश बाळके, सरपंच, ग्रामपंचायत पाली