शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

पाली धनगरवाडा प्रकाशमय, स्वातंत्र्यानंतर प्रथमच पोहचली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 07:02 IST

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये असलेल्या पोटल ग्रामपंचायत हद्दीतील अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातील पाली धनगरवाड्यामध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच वीज पोहोचली आहे.

- कांता हाबळेनेरळ - रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये असलेल्या पोटल ग्रामपंचायत हद्दीतील अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातील पाली धनगरवाड्यामध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच वीज पोहोचली आहे. त्यामुळे आता तरुणांना शिक्षण, आरोग्य आणि शेतीकडे लक्ष देण्यासाठी या वीजपुरवठ्याचा पुरेपूर उपयोग होणार असल्याचे येथील नागरिक रामा खरात यांनी सांगितले. त्यामुळे तेथील धनगर बांधवांनी आनंदोत्सव साजरा करत एकच जल्लोष केला.२५ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता पाली धनगरवाड्यामध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत विद्युतपुरवठा नियमित करण्यात आला. याठिकाणी ६३ के व्हीचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला असून सिंगल फेज लाइन खेचण्यासाठी एसटी लाइनचे बारा विद्युत पोल आणि एलटी लाइनचे सात पोल उभे करून लाइन बसविण्यात आली. या ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते बाबू घारे आणि विद्युत वितरण महामंडळाचे अविनाश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.पोटल ग्रामपंचायत हद्दीतील अतिदुर्गम आणि डोंगराळ भाग असलेल्या या पाली धनगरवाड्याचे पाली गावापासूनचे अंतर दोन ते तीन किलोमीटर आहे. येथील लोकसंख्या तीस ते चाळीसच्या आसपास असून येथे धनगर बांधवांची सात घरे आहेत. पूर्व परंपरागत दुग्ध व्यवसाय हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असून त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो.देश स्वतंत्र झाल्यापासून येथे वीजच पोहोचली नसल्याने त्यांचा सर्वांगीण विकासच खुंटला होता. आता मात्र येथे वीजपुरवठा कायमस्वरूपी होणार आहे. त्यामुळे गावाच्या सर्र्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा प्रश्न सुटल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या धनगरवाड्यामध्ये प्रथमच विद्युतपुरवठा सुरू होत असल्याने येथील नागरिकांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आम्ही ते वातावरण टिकवून ठेवण्यासाठी आणि वीजपुरवठा कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू.- ए. ई. घुले, उपकार्यकारी अभियंता, महावितरण कर्जतयेथे बारा विद्युत पोल आणि एलटी लाइनचे सात पोल उभे करून लाइन बसवली. त्याचे उद्घाटन सेना उपतालुकाप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते बाबू घारे आणि विद्युत वितरण महामंडळाचे अविनाश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :electricityवीजRaigadरायगड