शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

निसर्ग चक्रीवादळ बाधित मच्छीमार दुर्लक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 00:54 IST

या नुकसानीचे शासनामार्फत पंचनामे केले गेले. मात्र, हे पंचनामे करताना मच्छीमारांचे नुकसान डावलले गेल्याचे मत आमदार रमेश पाटील यांनी व्यक्त केले.

आगरदांडा : मुरुड किनाऱ्यावर प्रघात केलेल्या निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले आहे. या नुकसानीचे शासनामार्फत पंचनामे केले गेले. मात्र, हे पंचनामे करताना मच्छीमारांचे नुकसान डावलले गेल्याचे मत आमदार रमेश पाटील यांनी व्यक्त केले.वादळी लाटांनी मासेमारी नौकांमध्ये पाणी भरल्याने इंजिनाचे झालेले नुकसान, होड्या एकमेकांवर अथवा किनाºयावर आदळून मोठे नुकसान झाले आहे. वादळापूर्वी समुद्रात टाकलेली जाळी पुन्हा परत आणू न शकल्याने, जाळी वाहून गेल्याचे पंचनामे अथवा किनाºयावर शाकारून ठेवलेल्या नौकांवरील बंदिस्ती उडून गेली, घरातीचे छत आणि कौले उडाल्याने पावसाळ्यासाठी साठवून ठेवलेल्या सुक्या मासळीच्या झालेल्या नुकसानीचे पाहणी कोळी महासंघाचे अध्यक्ष तथा आमदार रमेश पाटील यांनी केली. यावेळी कोळी समाजाने आपल्या व्यथा मांडल्या. कोळी बांधवांचे या वादळामुळे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यावर संकट ओढावले आहे. यामध्ये १३ बोटींचे २ लाख ५० हजार रुपयांचे तर लिलाव शेडचे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, कोळी समाज उद्ध्वस्त झाला आहे, अशी व्यथा सागरकन्या मच्छीमारी सोसायटीचे चेअरमन मनोहर बैले यांनी कोळी महासंघाचे अध्यक्ष तथा आमदार रमेश पाटील यांच्यासमोर मांडली. निसर्ग प्रकोप होऊनही १८ दिवसांनंतर झाले, तरी जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा असून, कोणत्याच गावाला वीजपुरवठा होत नाही असल्याचे पाटील यांनी सांगितले.कोळी बांधवांना भरपाई वाढवून न दिल्यास येणाºया अधिवेशनात आवाज उठवून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून जास्तीतजास्त भरपाई कशी मिळेल, याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आ. पाटील यांनी दिले. यावेळी मुरुड मच्छीमारी सोसायटीचे उपाध्यक्ष मनोहर मकू आदी उपस्थित होते.>‘वादळग्रस्तांना घरकुल मिळवून देणार’तळा : मांदाड येथील पाण्याचा प्रश्न, चक्रीवादळात शाळेतील झालेले कॉम्पुटर आणि प्रींटरचे नुकसान मी माझ्या आमदारकीच्या फंडातून करुन देणार असल्याचे आश्वासन आ.रमेश पाटील यांनी तळा येथे पाहणी दरम्यान दिले. पूर्णत: नुकसान झालेल्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मिळवुन देण्याचे आश्वासन दिले, त्याचप्रमाणे प्रत्येक मच्छीमार बांधवांनी बँकेत किसान क्रेडिट कार्ड काढुन व्यवसाय करावा, समुद्रा शेजारी मच्छशेती करुन त्यातून कर्ज फेडुन समृद्ध व्हावे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले. या पाहणी दौºयाच्या आधी चक्रीवादळात नुकसान झालेल्या तळा प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी आ.रमेश पाटील यांनी केली. संपुर्ण प्राथमिक केंद्र, डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या वसाहतीचे मोठे नुकसान झाले असून आज अठरा दिवस होऊन गेले तरी जिल्हा आरोग्य विभागाकडून तातडीची मदत न मिळाल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. पावसाळ्याच्या दिवसात गळत्या रुममध्ये डॉक्टर रुग्णांना कशी सेवा पुरवणार असा प्रश्न उपस्थित करुन जिल्हा आरोग्य विभागाला जाब विचारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.>वाढीव भरपाईसाठी प्रयत्नशील : मासळीचा दुष्काळ अथवा चक्रीवादळमध्ये झालेले मच्छीमारांचे नुकसान असो, यामध्ये नेहमी शासन कोळी समाजावर अन्याय करीत असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी यावेळी केला. मच्छीमारांना भरपाई वाढवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितल.

टॅग्स :cycloneचक्रीवादळ