शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

वणव्यांमध्ये होरपळतेय रायगडची निसर्गसंपदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 01:27 IST

वनविभागाच्या उदासीन धोरणामुळे तत्काळ उपाययोजना नाही; श्रीवर्धनमधील वेळासच्या डोंगरावरील वनसंपत्तीची हानी

लोकमत न्यूज नेटवर्कदिघी : श्रीवर्धन तालुक्‍यातील दिघी रस्त्याला असणाऱ्या वेळास गावाच्या हद्दीतील वनविभागाच्या डोंगराला लागलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीची हानी झाली असून जनावरांचा चाराही नष्ट झाला. मात्र या वणव्यांकडे वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवते.वनविभागाच्या हद्दीत असणाऱ्या वेळास परिसरातील डोंगरावर रविवारी रात्री वणवा लागला. या वणव्यात जवळपास दोन ते पाच हेक्टर परिसर जाळून खाक झाला . यात लहान झाडे, शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठविलेल्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वणवा विझवण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे जाळपट्टे काढले जात नाहीत. त्यामुळे डोंगरच्या डोंगर आणि वनविभागाच्या हद्दीतील झाडे या वणव्यांच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

वनविभागाचे दुर्लक्ष श्रीवर्धन तालुक्यातील अनेक गावांच्या हद्दीत असलेल्या वनविभागाच्या जंगलाला दरवर्षी वणवे लागतात. मात्र वणवे रोखण्यासाठी वनविभागाकडून प्रभावी उपाय योजना केल्या जात नाही . शासन एकीकडे झाडे लावण्यासाठी प्रचंड अनुदान देते , जनजागृती करीत वृक्ष लावगड करते. तर दुसरीकडे वनविभागाच्या दुर्लक्षामुळे जंगल संपत्तीचे मात्र मोठे नुकसान होते. जाळपट्टे वेळेत काढले जात नसल्याने वणवे लागत आहेत.

आठ दिवसांतील दुसरी घटना या परिसरात दांडगूरी नंतर वेळास या ठिकाणी वणव्याची दोन आठवड्यातील दुसरी घटना आहे. दरवर्षी लागणारे वणवे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी. वनविभागाने याकडे लक्ष द्यावे आणि जंगल संपत्ती वाचविण्याचे प्रयत्न करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी केली आहे.

वेळास गावालगतच्या डोंगराला लागलेला वणव्यात अनेक वन्यजीव जळून मृत्यूमुखी पडले. दरवर्षी वणवे लागतात. मात्र, वनविभागाकडे तत्काळ वणवे विझवण्यासाठीची यंत्रणाच उपलब्ध नसते ही शोकांतिका आहे.- धवल तवसाळकर, हेल्प ग्रुप, वेळास

टॅग्स :Raigadरायगडforestजंगलfireआग