शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

वणव्यांमध्ये होरपळतेय रायगडची निसर्गसंपदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 01:27 IST

वनविभागाच्या उदासीन धोरणामुळे तत्काळ उपाययोजना नाही; श्रीवर्धनमधील वेळासच्या डोंगरावरील वनसंपत्तीची हानी

लोकमत न्यूज नेटवर्कदिघी : श्रीवर्धन तालुक्‍यातील दिघी रस्त्याला असणाऱ्या वेळास गावाच्या हद्दीतील वनविभागाच्या डोंगराला लागलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीची हानी झाली असून जनावरांचा चाराही नष्ट झाला. मात्र या वणव्यांकडे वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवते.वनविभागाच्या हद्दीत असणाऱ्या वेळास परिसरातील डोंगरावर रविवारी रात्री वणवा लागला. या वणव्यात जवळपास दोन ते पाच हेक्टर परिसर जाळून खाक झाला . यात लहान झाडे, शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठविलेल्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वणवा विझवण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे जाळपट्टे काढले जात नाहीत. त्यामुळे डोंगरच्या डोंगर आणि वनविभागाच्या हद्दीतील झाडे या वणव्यांच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

वनविभागाचे दुर्लक्ष श्रीवर्धन तालुक्यातील अनेक गावांच्या हद्दीत असलेल्या वनविभागाच्या जंगलाला दरवर्षी वणवे लागतात. मात्र वणवे रोखण्यासाठी वनविभागाकडून प्रभावी उपाय योजना केल्या जात नाही . शासन एकीकडे झाडे लावण्यासाठी प्रचंड अनुदान देते , जनजागृती करीत वृक्ष लावगड करते. तर दुसरीकडे वनविभागाच्या दुर्लक्षामुळे जंगल संपत्तीचे मात्र मोठे नुकसान होते. जाळपट्टे वेळेत काढले जात नसल्याने वणवे लागत आहेत.

आठ दिवसांतील दुसरी घटना या परिसरात दांडगूरी नंतर वेळास या ठिकाणी वणव्याची दोन आठवड्यातील दुसरी घटना आहे. दरवर्षी लागणारे वणवे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी. वनविभागाने याकडे लक्ष द्यावे आणि जंगल संपत्ती वाचविण्याचे प्रयत्न करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी केली आहे.

वेळास गावालगतच्या डोंगराला लागलेला वणव्यात अनेक वन्यजीव जळून मृत्यूमुखी पडले. दरवर्षी वणवे लागतात. मात्र, वनविभागाकडे तत्काळ वणवे विझवण्यासाठीची यंत्रणाच उपलब्ध नसते ही शोकांतिका आहे.- धवल तवसाळकर, हेल्प ग्रुप, वेळास

टॅग्स :Raigadरायगडforestजंगलfireआग