शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

राष्ट्रीय महामार्ग वृक्षतोडीमुळे उजाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:00 PM

३० किलोमीटर लांबीच्या अंतरावर महामार्गावर दोन बाजूना दुतर्फा असलेल्या जुनाट वटवृक्षांची अभेद्य तटबंदी आणि इतर अनेक प्रकारच्या वृक्षांची विपुलता येथे होती.

नेरळ : नैसर्गिक वनसंपदेने नटलेल्या सदाहरित जंगल परिसरातील पेण-खोपोली राज्य महामार्गाचे आता राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले आहे. ३० किलोमीटर लांबीच्या अंतरावर महामार्गावर दोन बाजूना दुतर्फा असलेल्या जुनाट वटवृक्षांची अभेद्य तटबंदी आणि इतर अनेक प्रकारच्या वृक्षांची विपुलता येथे होती. यामुळे महामार्गावर शीतल हवेच्या झोतासह सावलीत प्रवास करताना प्रत्येक वाहनचालक व प्रवाशांना आल्हाददायक वातावरणाची अनुभूती मिळत असे. मात्र, आता या महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे दोन्ही बाजूंना उभी असलेली वृक्षांच्या साखळीवर कुऱ्हाडीचे घाव घालून सर्रास वृक्षतोड सुरू झाली आहे. यामुळे वृक्षप्रेमी व पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

पेण, खालापूर, खोपोली ते अलिबाग तालुक्याचा मुंबई महानगर विकास प्राधिकरणात समावेश करण्यात आल्याने भविष्यातील येथील राहणीमान व औद्योगिक विकासाला पूरक अशा सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाचे धोरण आहे. असे असले तरीही वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार जी जैवसाखळी उद्ध्वस्त होते, ती पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी कित्येक वर्षे लागतात.

केंद्र व राज्य शासनाच्या विकास धोरणानुसार पेण महामार्ग रुंदीकरणाच्या कामांमुळे भविष्यात गतिमान अशी दळणवळण व्यवस्था तयार व्हावी यासाठी रस्ते, महामार्ग रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली असून जी वृक्षतोड सुरू झाली आहे ती रीतसर परवानग्या घेऊन केली जात आहे. मात्र, जी झाडे तोडली जातात त्यांच्या तिपटीने वृक्षलागवड करणे बंधनकारक असते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात अशीच वृक्षतोड करण्यात आली होती. ते काम आता पेण-खोपोली महामार्गावर सुरू झाले आहे. यामुळे निसर्गसंपदेने नटलेल्या या महामार्गावरच्या सुरू झालेल्या वृक्षतोडीमुळे शीतल सावली मात्र हरवली जाणार असल्याने यामुळे पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र