शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

मुंबई-गोवा : २ ठेकेदारांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; १४ वर्षांनंतर प्रथमच कारवाई, एका अधिकाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 05:25 IST

१४ वर्षांनंतर प्रथमच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते वडपाले या २६.७ किमी अंतरातील चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले. याप्रकरणी चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड आणि ॲपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी या दोन ठेकेदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ वर्षांनंतर प्रथमच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. 

माणगाव पोलिसांत गुरुवारी चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड आणि ॲपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेशकुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित कावळे आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला. कावळे यांना अटकही करण्यात आली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी महामार्गावरील अपघातांस जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

चार वर्षांत १७० अपघात आणि ९७ बळीमहामार्गाच्या कामातील हलगर्जीमुळे २०२० पासून आतार्यंत १७० मोटार अपघातांत ९७ जणांना प्राणास मुकावे लागले. तसेच २०८ प्रवाशांना लहान, मोठ्या स्वरुपाच्या गंभीर व किरकोळ स्वरुपाच्या दुखापती झाल्या आहेत. अपघातग्रस्त वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. 

२०१७ पासून काम सुरूच...- रायगड हद्दीतील इंदापूर ते वडपाले या २६.७ कि. मी. अंतरातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम केंद्र शासनाकडून मागविण्यात आलेल्या निविदांद्वारे चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड आणि ॲपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या संयुक्त कंपन्यांना १ जून २०१७ रोजी मंजूर केले. त्यानुसार १८ डिसेंबर २०१७ पासून काम सुरू केले. - या मार्गाचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे करारात म्हटले होते. मात्र, मुदत संपूनही काम पूर्ण झाले नाही. तरीही शासनाने मुदत वाढून दिली होती. अजूनही हे काम अपूर्णावस्थेतच आहे. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकhighwayमहामार्ग