शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

आठवडी बाजारात कोट्यवधी रु पयांची उलाढाल; १८व्या शतकातील संस्कृती तग धरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 05:07 IST

आजच्या कार्पोरेट जगतामध्ये मॉल संस्कृतीला ठरावीक वर्गाकडून प्रचंड महत्त्व दिले जाते. या ठिकाणी मिळणाºया वस्तू या अव्वाच्यासव्वा दराने विकल्या जातात.

- आविष्कार देसाईअलिबाग : आजच्या कार्पोरेट जगतामध्ये मॉल संस्कृतीला ठरावीक वर्गाकडून प्रचंड महत्त्व दिले जाते. या ठिकाणी मिळणाºया वस्तू या अव्वाच्यासव्वा दराने विकल्या जातात. कोट्यवधी रुपयांच्या होणाºया उलाढालीत आजही १८व्या शतकातली आठवडी बाजार संस्कृती रायगड जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये तग धरून असल्याचे दिसून येते.कार्तिकी एकादशीच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडी बाजार भरण्याला सुरुवात झाली. पावसाळ्यात बंद असणारा बाजार आता पुन्हा सुरू झाला आहे. आठवडी बाजारमध्ये गरिबांपासून मध्यमवर्गीयांसह उच्च मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे या आठवडी बाजारांची उलाढालही कोट्यवधी रुपयांच्या घरात गेली आहे. या बाजारात गृहोपयोगी सर्वच गोष्टी एकाच ठिकाणी मिळत असल्याने नागरिकांना आठवडी बाजार सोयीचा ठरत आहे. नारळी-पोकळीच्या बागा, समुद्रकिनाºयाबरोबरच रायगड जिल्ह्यात येणाºया पर्यटकांची पावलेही आठवडी बाजाराकडे वळत आहेत. १३३ वर्षांची प्राचीन आठवडी बाजार परंपरा सध्या पर्यटकांचेही लक्ष वेधून घेत आहे. १८८३मध्ये अलिबाग तालुक्यात अलिबाग, रेवदंडा, किहीम, पोयनाड, रामराज, आंबेपूर आणि नागाव, पेण तालुक्यात पेण व नागोठणे, माणगाव तालुक्यात माणगाव व निजामपूर, रोहा तालुक्यात रोहा व अष्टमी, महाड तालुक्यात महाडला आठवडी बाजार भरण्यास प्रारंभ झाला. ग्रामीण भागात गरजेपोटी सुरू झालेले ही आठवडा बाजार पद्धत तालुक्यांतील विक्रेत्यांकरिता महत्त्वाची बाजारपेठ ठरली आहे.कपडे, कडधान्य, याशिवाय कांदे, बटाटे, घरगुती पद्धतीचे मसाले, पापड, लोणची, भांडी, पालेभाज्या, ओली-सुकी मच्छी यासह आठवडी बाजारात असलेल्या अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागासह शहरांतील नागरिक गर्दी करतात. सरकारी दप्तर नोंदीनुसार प्रारंभीच्या काळात पोयनाड बाजारात २०० विक्रे ते आणि सुमारे एक हजार खरेदीदार येत होते तर नागाव-हटाळे येथील आठवडी बाजारात प्रारंभीच्या काळात १५ विक्रे ते व १०० खरेदीदार येत असत.१८८१ च्या सुमारास तत्कालीन मुरु ड-जंजिरा संस्थानातील म्हसळा व श्रीवर्धनला आठवडी बाजार भरत होता.१८८२ मध्ये तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात गौळवाडी, कोंदिवडे, दहिवली, कडाव, नेरळ, कदंब, सुगवे, खालापूर व तुपगाव या नऊ ठिकाणी मोठा प्रमाणात आठवडी बाजार भरत होता.काळाच्या ओघात जिल्ह्यातील काही बाजार बंद झाले तर काही ठिकाणी नव्याने आठवडी बाजार सुरू झाले आहेत. त्यामध्ये अलिबागजवळच्या वरसोली, सहाण आणि वायशेत या तीन आठवडी बाजारांचा समावेश आहे.

टॅग्स :Marketबाजार