शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

आठवडी बाजारात कोट्यवधी रु पयांची उलाढाल; १८व्या शतकातील संस्कृती तग धरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 05:07 IST

आजच्या कार्पोरेट जगतामध्ये मॉल संस्कृतीला ठरावीक वर्गाकडून प्रचंड महत्त्व दिले जाते. या ठिकाणी मिळणाºया वस्तू या अव्वाच्यासव्वा दराने विकल्या जातात.

- आविष्कार देसाईअलिबाग : आजच्या कार्पोरेट जगतामध्ये मॉल संस्कृतीला ठरावीक वर्गाकडून प्रचंड महत्त्व दिले जाते. या ठिकाणी मिळणाºया वस्तू या अव्वाच्यासव्वा दराने विकल्या जातात. कोट्यवधी रुपयांच्या होणाºया उलाढालीत आजही १८व्या शतकातली आठवडी बाजार संस्कृती रायगड जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये तग धरून असल्याचे दिसून येते.कार्तिकी एकादशीच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडी बाजार भरण्याला सुरुवात झाली. पावसाळ्यात बंद असणारा बाजार आता पुन्हा सुरू झाला आहे. आठवडी बाजारमध्ये गरिबांपासून मध्यमवर्गीयांसह उच्च मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे या आठवडी बाजारांची उलाढालही कोट्यवधी रुपयांच्या घरात गेली आहे. या बाजारात गृहोपयोगी सर्वच गोष्टी एकाच ठिकाणी मिळत असल्याने नागरिकांना आठवडी बाजार सोयीचा ठरत आहे. नारळी-पोकळीच्या बागा, समुद्रकिनाºयाबरोबरच रायगड जिल्ह्यात येणाºया पर्यटकांची पावलेही आठवडी बाजाराकडे वळत आहेत. १३३ वर्षांची प्राचीन आठवडी बाजार परंपरा सध्या पर्यटकांचेही लक्ष वेधून घेत आहे. १८८३मध्ये अलिबाग तालुक्यात अलिबाग, रेवदंडा, किहीम, पोयनाड, रामराज, आंबेपूर आणि नागाव, पेण तालुक्यात पेण व नागोठणे, माणगाव तालुक्यात माणगाव व निजामपूर, रोहा तालुक्यात रोहा व अष्टमी, महाड तालुक्यात महाडला आठवडी बाजार भरण्यास प्रारंभ झाला. ग्रामीण भागात गरजेपोटी सुरू झालेले ही आठवडा बाजार पद्धत तालुक्यांतील विक्रेत्यांकरिता महत्त्वाची बाजारपेठ ठरली आहे.कपडे, कडधान्य, याशिवाय कांदे, बटाटे, घरगुती पद्धतीचे मसाले, पापड, लोणची, भांडी, पालेभाज्या, ओली-सुकी मच्छी यासह आठवडी बाजारात असलेल्या अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागासह शहरांतील नागरिक गर्दी करतात. सरकारी दप्तर नोंदीनुसार प्रारंभीच्या काळात पोयनाड बाजारात २०० विक्रे ते आणि सुमारे एक हजार खरेदीदार येत होते तर नागाव-हटाळे येथील आठवडी बाजारात प्रारंभीच्या काळात १५ विक्रे ते व १०० खरेदीदार येत असत.१८८१ च्या सुमारास तत्कालीन मुरु ड-जंजिरा संस्थानातील म्हसळा व श्रीवर्धनला आठवडी बाजार भरत होता.१८८२ मध्ये तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात गौळवाडी, कोंदिवडे, दहिवली, कडाव, नेरळ, कदंब, सुगवे, खालापूर व तुपगाव या नऊ ठिकाणी मोठा प्रमाणात आठवडी बाजार भरत होता.काळाच्या ओघात जिल्ह्यातील काही बाजार बंद झाले तर काही ठिकाणी नव्याने आठवडी बाजार सुरू झाले आहेत. त्यामध्ये अलिबागजवळच्या वरसोली, सहाण आणि वायशेत या तीन आठवडी बाजारांचा समावेश आहे.

टॅग्स :Marketबाजार