शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

आठवडी बाजारात कोट्यवधी रु पयांची उलाढाल; १८व्या शतकातील संस्कृती तग धरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 05:07 IST

आजच्या कार्पोरेट जगतामध्ये मॉल संस्कृतीला ठरावीक वर्गाकडून प्रचंड महत्त्व दिले जाते. या ठिकाणी मिळणाºया वस्तू या अव्वाच्यासव्वा दराने विकल्या जातात.

- आविष्कार देसाईअलिबाग : आजच्या कार्पोरेट जगतामध्ये मॉल संस्कृतीला ठरावीक वर्गाकडून प्रचंड महत्त्व दिले जाते. या ठिकाणी मिळणाºया वस्तू या अव्वाच्यासव्वा दराने विकल्या जातात. कोट्यवधी रुपयांच्या होणाºया उलाढालीत आजही १८व्या शतकातली आठवडी बाजार संस्कृती रायगड जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये तग धरून असल्याचे दिसून येते.कार्तिकी एकादशीच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडी बाजार भरण्याला सुरुवात झाली. पावसाळ्यात बंद असणारा बाजार आता पुन्हा सुरू झाला आहे. आठवडी बाजारमध्ये गरिबांपासून मध्यमवर्गीयांसह उच्च मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे या आठवडी बाजारांची उलाढालही कोट्यवधी रुपयांच्या घरात गेली आहे. या बाजारात गृहोपयोगी सर्वच गोष्टी एकाच ठिकाणी मिळत असल्याने नागरिकांना आठवडी बाजार सोयीचा ठरत आहे. नारळी-पोकळीच्या बागा, समुद्रकिनाºयाबरोबरच रायगड जिल्ह्यात येणाºया पर्यटकांची पावलेही आठवडी बाजाराकडे वळत आहेत. १३३ वर्षांची प्राचीन आठवडी बाजार परंपरा सध्या पर्यटकांचेही लक्ष वेधून घेत आहे. १८८३मध्ये अलिबाग तालुक्यात अलिबाग, रेवदंडा, किहीम, पोयनाड, रामराज, आंबेपूर आणि नागाव, पेण तालुक्यात पेण व नागोठणे, माणगाव तालुक्यात माणगाव व निजामपूर, रोहा तालुक्यात रोहा व अष्टमी, महाड तालुक्यात महाडला आठवडी बाजार भरण्यास प्रारंभ झाला. ग्रामीण भागात गरजेपोटी सुरू झालेले ही आठवडा बाजार पद्धत तालुक्यांतील विक्रेत्यांकरिता महत्त्वाची बाजारपेठ ठरली आहे.कपडे, कडधान्य, याशिवाय कांदे, बटाटे, घरगुती पद्धतीचे मसाले, पापड, लोणची, भांडी, पालेभाज्या, ओली-सुकी मच्छी यासह आठवडी बाजारात असलेल्या अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागासह शहरांतील नागरिक गर्दी करतात. सरकारी दप्तर नोंदीनुसार प्रारंभीच्या काळात पोयनाड बाजारात २०० विक्रे ते आणि सुमारे एक हजार खरेदीदार येत होते तर नागाव-हटाळे येथील आठवडी बाजारात प्रारंभीच्या काळात १५ विक्रे ते व १०० खरेदीदार येत असत.१८८१ च्या सुमारास तत्कालीन मुरु ड-जंजिरा संस्थानातील म्हसळा व श्रीवर्धनला आठवडी बाजार भरत होता.१८८२ मध्ये तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात गौळवाडी, कोंदिवडे, दहिवली, कडाव, नेरळ, कदंब, सुगवे, खालापूर व तुपगाव या नऊ ठिकाणी मोठा प्रमाणात आठवडी बाजार भरत होता.काळाच्या ओघात जिल्ह्यातील काही बाजार बंद झाले तर काही ठिकाणी नव्याने आठवडी बाजार सुरू झाले आहेत. त्यामध्ये अलिबागजवळच्या वरसोली, सहाण आणि वायशेत या तीन आठवडी बाजारांचा समावेश आहे.

टॅग्स :Marketबाजार