शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
3
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
4
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
5
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
6
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
7
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
8
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
9
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
10
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
11
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
12
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
13
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
14
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
15
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
17
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
18
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
19
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
20
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्रीचा थरार... दोन शेतकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी केलं जिवाचं रान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 17:21 IST

मुंबईतून मध्यरात्री 2.30 वाजता फोन आला आणि अधिकाऱ्यांसह पोलिसांची झोप उडाली.

जयंत धुळप -

रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांना रविवारी मध्यरात्री अडीच वाजता फोन आला. दोन शेतकरी नदी पलिकडील शेतात अडकले असून पुराच्या पाण्यामुळे त्यांना घरी येता येत नाही. पाठक यांनी तात्काळ रोहा तहसिलदार सुरेश काशिद यांना फोन लावून याबाबत माहिती दिली. तहसिलदार काशिद यांनी क्षणाचाही विलंब न लावता रोहा पोलिसांना कळवले. तसेच कोलाड येथील वॉटर राफ्टींग इंन्स्टिट्यूटच्या बचाव पथकाचे प्रमुख महेश सानप यांनाही कळविण्यात आले. तहसिलदारांनी पोलिसांसह तर महेश सानप यांनी आपल्या रेस्कू बोटीसह घटनास्थळ गाठले. त्यानंतर सानप आपल्या 5 सहकाऱ्यांसह पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास नदी पलिकडे पोहोचले. त्या आपद्ग्रस्त  शेतकऱ्यांना आपल्या बोटीत घेतले आणि पहाटे पाच वाजता नदी पार करुन दोघांचेही प्राण वाचविले. 

रायगड जिल्हा आपत्ती निवारण नियंत्रण कक्षाच्या फोनवर रविवारी मध्यरात्री अडीच वाजता मुंबईत राहणाऱ्या किरण डबीर यांनी फोन केला. ‘माझे बाबा आणि काका नदी पलिकडच्या शेतात अडकले आहेत. नदीला पूर आलाय.. त्यांना शेतातून येता येत नाही.. त्यांना वाचवा..’ असा निरोप डबीर यांनी मुंबईतून दिला. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी, प्राप्त माहितीची खातरजमा करुन, दोघांना सुखरुप वाचविण्यासाठी तात्काळ नियोजन करुन रेस्क्यू ऑपरेशनसाठी पावले उचलली. भिकाजी डबीर व किशोर डबीर हे दोन भाऊ शेतात अडकले होते. 

रोहा तालुक्यांतील नव्हे गावातील भिकाजी गोविंद डबीर व किशोर भिकाजी डबीर हे दोघे आपल्या दोन बैलांसह नदी पलिकडील खैराळे बेटावरील आपल्या शेतात लावणीच्या कामासाठी रविवारी सकाळी गेले होते. कुंडलिका नदी आणि तीची उप नदी यांमधील खैराळे बेटावर ही शेती आहे. सकाळी शेतावर जाताना या उप नदीस फारसे पाणी नव्हते. त्यामुळे ते आपल्या शेतावर गेले. रविवारी अकरा वाजण्याच्या सुमारास माझी आई जेवणाचा डब्बा देण्यासाठी गेली असता, उपनदीस पाणी वाढल्याने तिला पलिकडे जाता आले नाही. ती जेवण घेऊन घरीच परतली. तर संध्याकाळी पाऊस कमी होईल आणि उपनदीचे पाणी कमी होताच आपण घरी जाऊ असा विचार डबीर बंधुंनी केला. मात्र, नदीचे पाणी वाढतचं गेलं. त्यामुळे नदी पार करुन या दोन्ही भावांना येता आले नाही. ते दोघे घरी आले नाहीत म्हणून मला घरुन रात्री दोन वाजता फोन आला. मी लगेच अलिबागला आपत्ती निवारण कक्षाच्या फोनवर फोन करुन बाबा व काका अडकून पडल्याची माहिती दिल्याचे भिकाजी गोविंद डबीर यांचा मुंबईती राहणारा मुलगा किरण डबीर याने ‘लोकमत’शी बोलताना दिली.

एका फोनवर तात्काळ हलली सरकारी यंत्रणाजिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मला फोन करुन याबाबत माहिती दिली. आम्ही तात्काळ रोहा पोलिसांना याबाबत माहिती दिली. रोहा पोलिसांची गाडी तात्काळ नाव्हे गावातील डबीर यांच्या घरी पोहोचली. प्राप्त माहिती खरी असल्याची खातरजमा करुन ते त्यांच्या काही नातेवाईकांसह खैराळे बेटा समोरील नदीकिनारी पोहोचले. तर कोलाड येथील वॉटर राफ्टींग इंन्स्टिट्यूटच्या बचाव पथकाचे प्रमुख महेश सानप यांनाही कळविण्यात आले होते. तात्काळ आम्ही आणि रेस्क्यू बोटीसह रेस्कू टिमचे प्रमुख महेश सानप घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी पहाटेचे तीन वाजले होते, पहाटे तीन वाजता खळखळत्या प्रवाहातून रेस्क्यू बोटीने किनाऱ्यावर पोहचून दोघांचे प्राण वाचवले, अशी माहिती रोह्याचे तहसिलदार सुरेश काशिद यांनी दिली.मोठ्या प्रकाश झोताच्या बॅटरीच्या प्रकाशात, भिकाजी गोविंद डबीर व किशोर भिकाजी डबीर हे दोघे आपल्या दोन बैलांसह नदी पलिकडील खैराळे बेटावरील शेतात आम्हाला दिसत होते. त्याच बॅटरीच्या प्रकाशात खळाळून वाहणारी नदी पार करुन पलिकडे जाण्याचा धाडसी निर्णय बचाव पथकाचे प्रमुख महेश सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला. बचाव पथक नदीपलिकडे गेले, त्यांनी भिकाजी गोविंद डबीर व किशोर भिकाजी डबीर या दोघांना आपल्या बोटीत घेतले आणि हेलकावणाऱ्या बोटीतून त्यांना किनाऱ्यावर आणले. त्यामुळे आम्हा सर्वाचा जीव भांड्यात पडल्याची रोमांचक सत्यकथा तहसिलदार काशिद यांनी सांगितले.

सर्वाच्या सुयोग्य आणि सत्वर समन्वयाचा परिणामजिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पाठक यांच्यापासून सुरु झालेले हे रेस्कू ऑपरेशन, सर्वाचा सुयोग्य समन्वय, पोलिस आणि बचाव पथकाचे प्रमुख महेश सानप व त्यांच्या सहकाऱ्यांच्या धाडसामुळे यशस्वी झाले. या यशस्वी मोहिमेमुळे सर्वानाच मोठे समाधान लाभल्याचे काशिद यांनी शेवटी सांगितले.

आमच्यासाठी ते देवदूतच.. माझ्या बाबा आणि काकांना वाचविणारे हे आमच्यासाठी देवदूतच आहेत. त्यांचे उपकार आम्ही डबीर कुटुंबीय आयूष्यभर विसरू शकणार नाही, अशी भावूक प्रतिक्रिया किरण डबीर यांनी दिली.

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊसFarmerशेतकरी