शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : रायगडमध्ये फडकला महायुतीचा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 06:12 IST

Maharashtra Election 2019: शेकापचा सफाया ;अलिबाग, महाड, कर्जत शिवसेनेकडे; तर पेण, पनवेल भाजपकडे

- आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघापैकर सहा मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकला आहे, तर एक विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने आपल्याकडे रोखण्यात यश मिळवले आहे. महायुतीच्या झंझावातापुढे शेकापचा सुपडा साफ झाला, तर जिल्ह्यात काँग्रेस औषधालाही उरलेली नसल्याचे निकालावरून स्पष्ट होते.

पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर, उरण मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी, कर्जतमध्ये शिवसेनेचे महेंद्र थोरवे, पेण मतदारसंघातून भाजपचे रवींद्र पाटील, अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी, महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले आणि श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांनी बाजी मारली आहे. राज्यात विरोधकांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या विरोधात चांगलेच वातावरण पेटवले होते. मात्र, मतदारांनी महायुतीच्याच बाजूने कौल दिला आहे. शेकापला या निवडणुकीत महायुतीने धूळ चारली आहे. त्यांनी उभा केलेला एकही उमेदवार निवडून आलेला नाही, त्यामुळे जिल्ह्यातील शेकापच्या अस्तित्वावर आपोपच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्े आहे. शिवसेनेने अलिबागची जागा शेकापकडून, तर कर्जतची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून हिसकावली. महाडची जागा राखताना मात्र उरणची जागा गमावली आहे.

भाजपने पनवेलची जागा कायम ठेवतानाच पेणची जागा शेकापकडून घेतली आहे, तसेच उरणमधील शिवसेनेच्या ताब्यातील जागेवर भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी वर्चस्व मिळवत युतीलाच धक्का दिला आहे. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपली जागा राखली आहे. या निवडणुकीत सर्वाधिक नुकसान कोणाचे झाले असेल तर ते शेकापचे आहे. शेकापचे चारही उमेदवार पराभूत झाले आहेत. काँग्रेससाठी ही निवडणूक ‘करो या मरो’ अशीच होती. मात्र, काँग्रेसने महाड वगळता कोणत्याच मतदारसंघात लक्षात राहील अशी कामगिरी केलेली दिसत नाही. जिल्ह्याला आता अलिबाग, उरण, पेण, कर्जत, श्रीवर्नधन या पाच मतदारसंघातून नवीन आमदार लाभले आहेत. तर पनवेल, महाडमध्ये मतदारांनी जुन्याच आमदारांना पुन्हा संधी दिल्याने भाजपचे प्रशांत ठाकूर आणि शिवसेनेचे भरत गोगावले यांना हॅट्ट्रिक साधता आली आहे. जनतेने दिलेला कौल शेकापसह काँग्रेसनेही मान्य केला आहे. यापुढे शेकापला आणि काँग्रेसलाही पराभवाची कारणे शोधतानाच आत्मपरीक्षण करावे लागेल, एवढे मात्र निश्चित आहे.

राष्ट्रवादीकडे श्रीवर्धन; उरण अपक्षाकडे

श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांनी बाजी मारली आहे. तर उरण मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी निवडून आल्याने आता उरण मतदारसंघ अपक्षाकडे गेला आहे. राज्यात विरोधकांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या विरोधात चांगलेच वातावरण पेटवले होते. मात्र, मतदारांनी महायुतीच्याच बाजूने कौल दिल्याने रायगडमध्ये महायुतीने बाजी मारली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019uran-acउरणshrivardhan-acश्रीवर्धनpanvel-acपनवेलShiv SenaशिवसेनाBJPभाजपा