शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Mahad Flood: पूर ओसरला आता नवं संकट! महाभयंकर साथ राेगांचा फैलाव हाेण्याती भीती, २६ रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 7:50 PM

Mahad Flood: महाडमध्ये अतिवृष्टीने सावित्री नदीला आलेल्या महापुराचे विपरीत पडसाद पुर आेसरल्या नंतर सुरु झाले आहेत. महाडमध्ये आतापर्यंत 12 हजार 931 जणांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे

आविष्कार देसाईलाेकमत न्यूज नेटवर्करायगड ः महाडमध्ये अतिवृष्टीने सावित्री नदीला आलेल्या महापुराचे विपरीत पडसाद पुर आेसरल्या नंतर सुरु झाले आहेत. महाडमध्ये आतापर्यंत 12 हजार 931 जणांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे, तर 380 नागरिकांची अॅन्टीजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये लेप्टोपायरोसिसचे 19, काेराेनाचे तीन, डेंग्यु आणि मलेरियाचे प्रत्येकी दाेन असे एकूण 26 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाड तालुक्यात महाभयंकर साथ राेगांचा फैलाव हाेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.महाड आणि पाेलादपूर मध्ये अतिवृष्टीने पुर, दरडी काेसळल्या हाेत्या.  महाड-तळीये मध्ये दरड काेसळल्याने 84  नागरिक डाेंगराच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. पैकी 53 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले उर्वरीत 31 जणांना मृत घाेषित करण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी आहे. तसेच पाेलादपूर-केवनाळे आणि सुतारवाडी येथेही 11 जणांचा दरडीखाली गुदमरुन मृत्यू झाला. त्याचवेळी महाडमध्ये अतिवृष्टीने सावित्रीला महापुर आला. तब्बल 15 फुटाहून अधिक पाणी हाेते.महापुरात नागरिकांनी आपले प्राण वाचवले. आता महापुर आेसरला आहे. परंतू शहरासह अन्य भागांमध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे लवकर लवकर स्वच्छता करण्याचे आव्हान सरकार आणि प्रशासना पुढे आहे. स्वच्छता करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु झाले आहे.राेगराई पसरु नये यासाठी विविध ठिकाणची 18 वैद्यकीय पथक महाडमध्ये तैनात करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत आतापर्यंत तब्बल 12 हजार 931 नागरिकांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच एक हजार 416 जणांना टिटीचे इंजेक्शन देण्यात आले आहे. जिल्ह्यातील काेराेनाचा प्रार्दुभाव थांबलेला नाही. त्यामुळे 380 नागरिकांची अॅन्टीजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तीन जणांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले आहे.लॅप्टाेपायरसिसचे 19 रुग्ण सापडले आहेत, तर डेंग्यु आणि मलेरियाचे प्रत्येकी दाेन असे एकूण 26 रुग्ण सापडले आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी दिली.महाड, पाेलादपूरमध्ये साथ राेगांचा फैलाव हाेऊ नये यासाठी आराेग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने स्वच्छता करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.महाडमध्ये सध्या नागरिकांचे जीवनमान पुर्वपदावर येत आहे. पुरात उघड्यावर पडलेला संसार वेचण्यात नागरिक अद्यापही गुंतलेले आहेत. अशा विचित्र परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी नागरिक काेराेना नियमांचे पालन कसे करणार असा प्रश्न आहे. दरम्यान, हाडमधील नागरिकांचा संसार उभा करतानाच या ठिकाणी साथराेग पसरु नये यासाठी सरकार आणि प्रशासनाला कठाेर मेहनत घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस