शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
5
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
6
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
7
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
8
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
9
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
10
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
11
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
12
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
13
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
14
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
15
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
16
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
17
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
18
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
19
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
20
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या

जयगड बंदरात मासळी उतरवण्यास स्थानिकांच्या विरोधामुळे मच्छीमारांना फटका, तीन कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 02:17 IST

रायगड, मुंबईतील सुमारे १६० बोटींनी मागील आठवड्यात आलेल्या वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरामध्ये या बोटींनी आश्रय घेतला होता

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड, मुंबईतील सुमारे १६० बोटींनी मागील आठवड्यात आलेल्या वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरामध्ये या बोटींनी आश्रय घेतला होता; परंतु या बोटीतील पकडलेले तीन हजार किलोचे मासे बंदरावर उतरवण्यास स्थानिकांनी विरोध केल्याने मच्छीमारांवर मासे फेकून देण्याची वेळ आली. यामुळे मच्छीमारांचे सुमारे तीन कोटी रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. आश्रय मिळाला. मात्र, पकडलेली मासळी फेकून द्यावी लागल्याने मच्छीमारांना अश्रू अनावर झाले होते. या विरोधात सरकार आणि प्रशासनाकडे दाद मागण्यात येणार असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.१ आॅगस्ट रोजी मासेमारी करण्याची अधिकृत बंदी आदेश उठल्यानंतर रायगड, मुंबईमधील सुमारे १६० बोटी या मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेल्या होत्या. मात्र, हवामान खराब झाल्याने अचानक वादळ सुरू झाले. त्यामुळे या बोटींना आश्रय घेणे क्रमप्राप्त होते. प्रत्येक बोटीमध्ये सुमारे २५० किलोचे मासे होते. बोटी ज्या ठिकाणी होत्या. तेथून रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदर जवळ होते. त्यामुळे स्वाभाविकपणे या बोटींना तेथे आश्रय मागितला. त्यानंतर १ ते ३ आॅगस्टपर्यंत हवामान खराब असल्याने तसेच १४ आॅगस्टपर्यंत हवामानात फरक पडणार नसल्याने पकडलेली मासळी खराब होणार होती. बंदरावर मासळी उतरवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती बोटींतील सर्वांनी स्थानिकांना केली. मात्र, स्थानिकांनी त्याला नकार दिला. त्यानंतर रस्ते मार्गाने मुंबईकडे वाहतूक करण्यासाठी परवनागी देण्याबाबतही विनंती केली. त्यालाही नकार मिळाला.जिल्हा प्रशासनाने याबाबत बैठकही लावली. मात्र, स्थानिकांच्या हट्टापाई त्यांनीही सहकार्य केले नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची आमची मासळी खराब होऊन नुकसान झाल्याचे बोटीचे मालक अंबर नाखवा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दरम्यान, रायगड जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त अभयसिंग शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकलानाही.१६० बोटींमध्ये प्रत्येकी २५० किलो मासळीआर्थिक नुकसान झालेल्या बोटी या प्रामुख्याने रेवस, करंजा, बोडणी परिसरातील आहेत, तसेच काही बोटींचे पंजीकरण हे मुंबईतील ससूण डॉकमधील आहे. १६० बोटींमध्ये प्रत्येकी २५० किलो मासळी होती. त्यामध्ये पापलेट या मासळीचे प्रमाण अधिक होते. प्रत्येक बोटीचे सुमारे दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याने एकत्रितपणे विचार केल्यास हा आकडा सुमारे तीन कोटी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जाते.स्थानिकांच्या विरोधामुळे नुकसानस्थानिक बाजारपेठेत मासळी विकू न दिल्याने हीच मासळी रस्ते मार्गाने मुंबईत विक्री करण्यासाठी तीन ट्रक चिपळूणला पोहोचले होते; परंतु स्थानिकांनी बोटीतील मासळी उतरवण्याला विरोध केला. त्यामुळे सर्व वाहनांना रिकाम्या हातानेच माघारी फिरावे लागले होते. स्थानिकांच्या विरोधापुढे काही एक न चालल्याने आता हळूहळू काही बोटी या स्वगृही परतल्या आहेत. स्थानिकांनी मासळी उतरवण्याची परवानगी दिली असती, तर आज कोट्यवधी रुपयांच्या मासळीचे नुकसान झाले नसते.भरपाईसाठी मागणार जिल्हाधिकाऱ्यांकडे दादआपत्तीच्या प्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरामध्ये आश्रय घेण्याला स्थानिकांनी अनुमती दिली; परंतु मासळी उतरवण्यास परवानगी दिली असती तर कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले नसते. भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांवर अशी वेळ आली आणि रायगड अथवा मुंबईमधील स्थानिकांनी त्याला विरोध केल्यास त्यांचेही नुकसान होईल; परंतु रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी नेहमीच सलोख्याची भूमिका घेत कोणाचेही नुकसान केले नसल्याकडे अंबर नाखवा यांनी लक्ष वेधले. नुकसानभरपाईसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :fishermanमच्छीमारRaigadरायगडRatnagiriरत्नागिरी