शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
4
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
5
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
6
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
7
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
8
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
9
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
10
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
11
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
12
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
13
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
14
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
15
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
16
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
17
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
18
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
19
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
20
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनातून मिळणार स्थानिकांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 04:36 IST

पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील पाच किल्ल्यांचा समावेश या योजनेत करण्यात येणार आहे. यामध्ये सागरगड (अलिबाग), सरसगड (पाली), पेब, कोथळीगड व खांदेरी या किल्ल्यांचा समावेश आहे.

जयंत धुळप ।अलिबाग : गडभ्रमण आणि निसर्गभ्रमण इच्छूक तरुणाई आणि इतिहासप्रेमी यांना सुरक्षित गडभ्रमण आणि निसर्गभ्रमण करता यावे, याकरिता रायगडचे निसर्ग व इतिहासप्रेमी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एका विशेष योजनेची निर्मिती केली आहे. गडभ्रमण आणि निसर्गभ्रमण यातून पर्यटनवृद्धी आणि पर्यटनातून स्थानिक ग्रामस्तरावर स्थानिकांना रोजगार संधी, असे या योजनेचे स्वरूप राहणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या कार्यालयात या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची रूपरेषा तयार करण्याच्या अनुषंगाने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस गडभ्रमण आणि निसर्गभ्रमणात कार्यरत डॉ. चंद्रशेखर साठे, पक्षी तज्ज्ञ डॉ. वैभव देशमुख, युथ हॉस्टेल सदस्य अनिल जोशी, सरिता गायकवाड व युथ हॉस्टेल पर्यावरण आणि गड सवर्धन समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.रायगड जिल्ह्यात एकूण ३९ ऐतिहासिक किल्ले आहेत. या किल्ल्यावर जाण्यासाठी इतिहासप्रेमी आणि विशेषत: तरुणाई मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत असते. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात गिरिभ्रमणादरम्यान सुमारे २० मृत्यू झाले आहेत, तर सुयोग्य वाटाड्याअभावी जंगलात चुकण्याचे प्रसंग घडले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षित गडभ्रमण आणि निसर्गभ्रमण ही संकल्पना युथ हॉस्टेल असोसिएशन आॅफ इंडिया या गिरिभ्रमण उपक्रम आयोजनात व्यस्त संस्था व अशाच हेतूने स्थानिक पातळीवर कार्यरत संस्था, किल्ल्याच्या जवळील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालयीन विद्यार्थी, गडकिल्ल्याच्या परिसरातील स्थानिक ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि स्थानिक युवक, जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणा, वन विभाग व स्थानिक महसूल कर्मचारी यांच्या संयुक्त सहयोगातून ही योजना अमलात आणण्याचे नियोजन या बैठकीतील चर्चेतून करण्यात आले.पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील पाच किल्ल्यांचा समावेशपहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील पाच किल्ल्यांचा समावेश या योजनेत करण्यात येणार आहे. यामध्ये सागरगड (अलिबाग), सरसगड (पाली), पेब, कोथळीगड व खांदेरी या किल्ल्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांतील गडभ्रमण उपक्रम व्यस्त संस्थांचा समन्वय साधून उर्वरित किल्ल्यावर ही योजना टप्प्याटप्प्याने अमलात आणण्यात येणार आहे.गिरिभ्रमणास येणाऱ्यांची नोंदणी, वाटाड्याची सुविधा, गडावर आवश्यक माहिती फलक, निवारा व न्याहरी व्यवस्था, पक्षी व इतिहासविषयक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सत्वर साहाय्य आदीचा समावेश या सुरक्षित गिरिभ्रमण व निसर्गभ्रमण योजनेत करण्यात येणार आहे. दरम्यान, अलिबाग जवळच्या सागरगड किल्ल्यावरील सुरक्षित गिरिभ्रमण व निसर्गभ्रमण योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकरिता करावयाच्या नियोजनाकरिता लवकरच ग्रामस्थ व स्थानिकांबरोबर बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Fortगड