शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

झंडा उँचा रहे हमारा, कोरोना काळात काम करणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 1:13 AM

अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे स्वातंत्र्य दिनाच्या ७३व्या वर्धापन दिनी मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

रायगड : समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. सरकारमार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सहकार्याने येणाºया काळात जिल्हा अधिक प्रगतीच्या दिशेने आगेकूच करताना दिसेल, असे प्रतिपादन रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शनिवारी येथे केले. अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे स्वातंत्र्य दिनाच्या ७३व्या वर्धापन दिनी मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर, पालकमंत्री आदिती तटकरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या ७३व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे, निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी व करोना या संकटात दुर्दैवाने मृत्यू झालेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यंदाच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यावर करोनाचे सावट आहे. गेले पाच महिने आपण सगळेच या विषाणूशी सर्व साधनसामुग्रीसह एकवटून लढतोय, त्यात यशस्वी ही होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपले राज्य विविध आघाड्यांवर मार्गक्रमण करीत आहेत. समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार, उद्योजक या सर्व घटकांच्या विकासासाठी सरकीर कटिबद्ध असल्याचा पुनरुउच्चार त्यांनी केला.कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन करण्यात आले होते. ओएनजीसी, उरण, एमआयडीसी असोसिएशन, महाड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, महाड, रोहा इंडस्ट्रिज असोसिएशन, रोहा, स्वदेश फाउंडेशन, रिलायन्स यांसारख्या उद्योग समूहांनी मदतीचा हात पुढे केला. त्याबाबत पालकमंत्री तटकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.सध्या जिल्ह्यात ९८ शिवभोजन केंद्रांना १७ हजार ३०० शिवभोजन थाळी मंजूर आहे. या शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून दररोज जवळपास १६ हजार गरजूंना जेवण मिळत आहे. याशिवाय कम्युनिटी किचनसारख्या उपाययोजनांमधून गरजूंना जेवण देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आल्याकडे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी लक्ष वेधले. कोरोनापाठोपाठ जिल्ह्यावर निसर्ग चक्रीवादळाचे संकट आले. या संकटात सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या माध्यमातून एनडीआरएफ, भारतीय तटरक्षक दल, रायगड जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलातील सदस्य संस्था, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवक, पोलीस विभाग, महसूल विभागाच्या मदतीने जिल्ह्यात निर्माण झालेल्या आपत्कालीन प्रसंगी सर्व विभागांशी समन्वय साधल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी टाळण्यास यश आले, याबद्दल तटकरे यांनी विविध सरकारी यंत्रणांच्या योग्य समन्वयामुळे हे शक्य झाले, असे सांगत त्यांचे कौतुक केले.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.>समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध>सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यताअलिबाग येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० रुग्ण खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरू करण्याबाबत मान्यता दिली आहे. याशिवाय लवकरच मांडवा ते गेट वे आॅफ इंडिया या सागरी मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर मोबाइल मेडिकल युनिटसह बोट अ‍ॅम्बुलन्स सेवा बाह्य यंत्रणेकडून कार्यान्वित होणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.पर्यटन विकासाला नवीन आयाम प्राप्त होणारकोकणातील पर्यटन वाढीसाठी सरकारने बीच शॅकस पॉलिसी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थानिकांना पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त होणार आहे. रेवस ते रेडी सागरी महामार्गाच्या कामासाठी शासनाने ४ हजार ५०० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. रेवस, करंजा, अलिबाग, नांदगाव, मुरुड, दिघी, दिवेआगर, शेखाडीमार्गे रेडी या भागातून हा सागरी महामार्ग जाणार आहे. यामुळे पर्यटन विकासाला नवीन आयाम प्राप्त होणार आहे.