शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

महामार्गावर अवजड वाहनांची अवैध पार्किंग; स्थानिक रहिवासी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 03:33 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दररोज या ठिकाणच्या मार्गिकेत बदल केला जातो. त्यामुळे वाहनचालकांना विशेष खबरदारी घ्यावी लागते.

पनवेल : मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दररोज या ठिकाणच्या मार्गिकेत बदल केला जातो. त्यामुळे वाहनचालकांना विशेष खबरदारी घ्यावी लागते. या ठिकाणच्या सर्व्हिस रोडवर अवजड वाहनांचे अनधिकृत पार्किं ग करण्यात येत असल्याने लहान वाहनांचे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्त्यालगत अवजड वाहनांच्या पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर या मार्गाचे रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गावर पळस्पे, चिंचवन, शिरढोण आदी गावांचा समावेश आहे. गावांलगत मोठमोठे गोदाम असून, मालवाहतूक करणाºया अवजड वाहनांची दिवसभर वर्दळ असते. ही वाहने रस्त्यावर उभी करण्यात येत असल्याने स्थानिकांची गैरसोय होत आहे. रहदारीसाठी रस्ता अपुरा पडतो. शिवाय अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.पळस्पेतील जेडब्ल्यूसी कंपनीजवळ असलेल्या सर्व्हिस रोडवर दररोज दोन्ही बाजूस अवजड वाहने उभी असतात. विशेष म्हणजे, या ठिकाणी असलेल्या आदिवासीवाडी तसेच गावकºयांना या वाहनांचा अडथळा निर्माण होतो. मात्र, वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी चालकांकडून सर्रास अजवड वाहने उभी केली जातात. मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांमुळे झालेल्या अपघातात हजारो लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. आर्श्चय म्हणजे वाहतूक पोलिसांकडूनही अनधिकृतपणे होणाºया अवजड वाहनांच्या पार्किंगवर कारवाई होताना दिसत नाही.यासंदर्भात नवीन पनवेल वाहतूक शाखेचे अनिल संगपाल यांना विचारणा केली असता, सर्व्हिस रोडला वाहन पार्क केली जातात, मुख्य रस्त्यावर नाही. सर्व्हिस रोडचा उपयोग कोणीच करीत नसल्याचे उत्तर त्यांनी दिले. मात्र, सर्व्हिस रोडवर वाहन पार्क करण्याची परवानगी चालकांना आहे का, अशी विचारणा केली असता त्यांनी अशा वाहनांवर कारवाई केली जाईल, असे मोघम उत्तर त्यांनी दिले.वाहतूककोंडीपनवेल, कळंबोली, कामोठे परिसरातील अनेक सर्व्हिस रोडवर अवजड वाहनांचे पार्किंग करण्यात येते. मात्र, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून गुन्हेगारीचे प्रकारही वाढले आहेत.मुंबई-गोवा महामार्गावरील खांदा वसाहत परिसरात सध्या भुयारी मार्ग, रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यातच अवजड वाहने रस्त्यात उभी असल्याने कोंडी होत असून, लहान वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो.

टॅग्स :Raigadरायगड