शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
3
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
4
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
5
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
6
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
7
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
8
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
9
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
10
मोठ्या पडद्यावर फ्लॉप पण बिझनेसमध्ये केली कमाल, चालवतोय १०००० कोटींची कंपनी; कमाईच्या बाबतीत अनेकांना टाकलं मागे
11
ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
12
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
13
सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
14
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
15
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
16
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
17
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
18
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
19
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
20
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर

घरकूल योजना : तुटपुंजा अनुदानामुळे लाभार्थी घरांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:31 IST

बेघरांना हक्काचे घर मिळावे, यासाठी सरकार विविध योजना राबवित आहेत; परंतु घर बांधणीसाठी सरकारकडून देण्यात येणारे अनुदान अत्यंत तुटपुंजे असल्याने घर पूर्ण करणे कठीण जाते, अशी ओरड सातत्याने लाभार्थ्यांकडून केली जाते. रायगड जिल्ह्यामध्ये १८९ प्रस्तावांपैकी १३८ प्रस्तावाना मंजुरी देण्यात आली.

अलिबाग : बेघरांना हक्काचे घर मिळावे, यासाठी सरकार विविध योजना राबवित आहेत; परंतु घर बांधणीसाठी सरकारकडून देण्यात येणारे अनुदान अत्यंत तुटपुंजे असल्याने घर पूर्ण करणे कठीण जाते, अशी ओरड सातत्याने लाभार्थ्यांकडून केली जाते. रायगड जिल्ह्यामध्ये १८९ प्रस्तावांपैकी १३८ प्रस्तावाना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी फक्त ८० घरेच पूर्ण होऊ शकली आहेत. उरलेले १०९ लाभार्थी मात्र अजूनही घरांच्या प्रतीक्षेत आहेत.प्रत्येकाला घर देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातही विविध योजना राबविण्यात येत असून गरीब, कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना हक्काचे छप्पर मिळावे, असा त्यामागचा उद्देश आहे. सरकारने रमाई, शबरी आणि आदीम घरकूल योजना आखल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून घरबांधणीसाठी लाभार्थ्यांना सरकारकडून एक लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. या रकमेतून त्या लाभार्थ्याला घर उभारायचे असते. मात्र, एवढ्या तुटपुंजा रकमेमध्ये घर उभारणे अत्यंत कठीण आहे. त्यातून घर उभारले गेलेच तर, त्या घराचा दर्जा, गुणवत्ता कशी असेल याचा विचारच न केलेला बरा. अशा गुणवत्ता नसलेल्या घरांचा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.सरकार समाजमंदिर, निवारा शेड यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, महत्त्वांच्या योजनांच्या माध्यमातून गरिबांना मुख्य प्रवाहात आणणाºया योजनांसाठी हात आखडता घेतला जातो. समाजमंदिरांवर होणारा वारेमाप खर्च टाळून तो प्रत्येक गावागावांमध्ये अभ्यासिका उभारण्यासाठी वापरण्याबाबत विचार सुरू असल्याचे मध्यंतरी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखवले होते. तसाच विचार आता घरकूल योजनांसाठी केल्यास गरिबांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर निश्चितच मिळेल.केवळ ९६ लाखांचा निधीरायगड जिल्ह्यामध्ये घरकूल उभारणीसाठी तब्बल १८९ प्रस्ताव प्रशासनाकडे आले होते. पैकी १३८ प्रस्तावानाच मंजुरी देण्यात आली. त्यातील फक्त ८० घरेच पूर्ण होऊ शकली आहेत. उरलेले १०९ लाभार्थी मात्र उघड्यावरच राहिले आहेत. सरकारकडे ८० घरांसाठी लागणारा फक्त ९६ लाख रुपयांचाच निधी शिल्लक होता. सरकारकडे निधी नव्हता, तर तर १३८ प्रस्तांवाना मंजुरी देऊन गरिबांना घराचे स्वप्न का दाखवले, असा प्रश्न प्रबोधिनीचे अध्यक्ष अ‍ॅड. राकेश पाटील यांनी सरकारला विचारला आहे.घरकूल मंजूर करताना सर्वच विभागातील ग्रामपंचायत पातळीवर राजकारण केले जाते. निवडणुकीत आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलेल्या मतदारांचा अशा योजनांसाठी पहिला विचार केला जातो. त्यामुळे खरेच ज्यांना घरांची आवश्यकता आहे, त्यांना त्याचा लाभ होत नाही, यासाठी सरकारसह प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून योग्य लाभार्थ्याची निवड कशी होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचेही अ‍ॅड. पाटील यांनी स्पष्ट केले.दरम्यान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे खैरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

टॅग्स :Raigadरायगड