शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

कोकणातील ऐतिहासिक बंदरांना गतवैभव पुनर्प्राप्तीचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 2:32 AM

अलिबाग : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच रायगड जिल्ह्यातील बंदरातून जलवाहतूक सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

जयंत धुळप अलिबाग : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच रायगड जिल्ह्यातील बंदरातून जलवाहतूक सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. कोकणात जलवाहतुकीला संजीवनी मिळावी यासाठी केंद्रात प्रस्ताव देखील सादर केला असल्याचे त्यांनी सूचित केले आहे. वसई-कल्याण-ठाणे-धरमतर, रेवदंडा-रोहे आणि जयगड-मुसाकाजी-विजयदुर्ग-देवगड-मालवण असे हे तीन प्रस्तावित जलमार्ग आहेत. या जलवाहतुकीमुळे कोकणातील प्रवाशांना भविष्यात निश्चितच फायदा होणार आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने दिवाळीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर मुंबई (भाऊचा धक्का)-दिघी-दाभोळ अशी प्रवासी जलवाहतूक करून ती कायमस्वरूपी सुरू ठेवण्याकरिता नियोजन करण्यात येत आहे. सागरी प्रवासी वाहतुकीमुळे गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ताण कमी होवू शकतो असा जाणकारांचा अंदाज आहे.कोकणातील सागरी वाहतुक ीचा इतिहास देदीप्यमान असाच आहे. इ.स.पूर्व ५०० ते इ.स.२५० पर्यंत चौल, महाड, राजपुरी या बंदरांमधून पर्शिया, ग्रीस, अरेबिया, येमेन आणि इजिप्तबरोबर आयात- निर्यात व्यापार होत असे. परदेशी व्यापाराबरोबर चौल, महाड, मांदाड, राजपुरी व गोरेगाव (तत्कालीन घोडेगाव) ही बंदरे सह्याद्रीच्या पूर्वेकडील जुन्नर, नाशिक व पैठणसारख्या व्यापारी केंद्रांशी बोरघाट, देवस्थळी, कुंभा व शेवट्या घाट मार्गांनी जोडलेली होती. प्राचीन उत्तर कोकणात बंदरांच्या सान्निध्यात असलेल्या व्यापारी केंद्रांजवळ बौद्ध धर्मीयांच्या त्यावेळी वसाहती होत्या. कुडे, पाले, कोल, चौलजवळील बौद्ध लेण्यांवरून दिसून येते. या बंदरांव्यतिरिक्त म्हसळा आणि अंतोरे ही बंदरे सुद्धा तत्कालीन आयात-निर्यात व्यापाराकरिता प्रसिध्द होती.टॉलेमी, पेरिप्सल, स्ट्रॅबो आणि प्लिनी या सागरी प्रवाशांनी लिहून ठेवलेल्या माहितीनुसार चौल, मांदाड, महाड(पाले), राजपुरी ,गोरेगाव बंदरातून इजिप्त, अरेबिया, पर्शिया, आमोन आणि रोमन साम्राज्याशी त्याकाळी मोठा व्यापार चालत असे. सातवाहन कालीन ‘गाथा सप्तशती’ काव्यसंग्रहात (पहिले-दुसरे शतक) शिडांच्या जहाजांचे वर्णन तत्कालीन सागरी व्यापार व नाविक हालचालींचा पुरावा मानला जातो. अरब प्रवासी लेखक अल मसुदी (९१५), अबू झैद (९१६), सुलेमान (८१५) व इबन हौकल (९४३-९६८) यांनी कोकणातील व्यापाराबद्दल खूप लिहिले आहे. विजयनगरच्या राजाकडे हा प्रदेश असताना सुद्धा चौल महत्त्वाचे बंदर होते. पुढे बहमनींची राजधानी दौलताबादहून गुलबर्ग्याला स्थलांतरित झाल्यावर चौलचा व्यापार राजापूर, दाभोळ व चिपळूणकडे वळला. तथापि चौलचे महत्त्व मात्र अबाधित राहिले. ठाणे व तत्कालीन कुलाबा जिल्ह्यांचा भाग गुजरातच्या सुलतानाकडे गेल्यावर मात्र चौलचे महत्त्व घटले. १५०९ मध्ये चौल व नागोठणे बंदरे पोर्तुगीजांकडे आल्यावर चौल बंदराचा पुन्हा भाग्योदय झाला. पोर्तुगीजांनी चौल वगळता सर्व बंदरांचा विध्वंस केला. चौलचे मात्र संरक्षण केले. तेथील व्यापार वाढविला. इ.स.१७४० मध्ये एका तहानुसार पोर्तुगीजांनी चौल इंग्रजांच्या तर १७४१ मध्ये इंग्रजांनी ते मराठ्यांच्या स्वाधीन केल्याची नोंद शासकीय दस्तात उपलब्ध आहे.१३ बंदरे होती व्यापारी बंदरेइ.स.१८८३ मध्ये जिल्ह्यातील १३ बंदरांच्या सीमाशुल्कासाठी अलिबाग, साक्षी (पेण), राजापुरी-मांदाड आणि बाणकोट अशा चार बंदर समूहात विभाजन होते. अलिबाग समूहात अलिबाग, थळ, रेवदंडा, मांडवा, रेवस आणि धरमतर या सात बंदरांचा समावेश होता. साक्षी (पेण) बंदर समूहात अंतोरा आणि नागोठणे बंदराचा समावेश होता. राजपुरी विभागात मांदाड हे एकमेव बंदर होते. सीमाशुल्कासाठी हे बंदर तळखाडी वा तळ या नावाने ओळखले जात असे. बाणकोट विभागात म्हाप्रळ आणि रत्नागिरीतील इतर बंदरांचा समावेश होता. याशिवाय बाणकोट विभागात महाड(सावित्री), गोरेगाव (तत्कालीन घोडेगाव) आणि दासगाव या तीन बंदरांमध्ये होणाºया व्यापाराचा अंतर्भाव होत असे.जलमार्ग हेच प्रवासी व मालवाहतुकीचे मुख्य साधनमुंबई-पुणे लोहमार्ग होईपर्यंत जलमार्ग हेच प्रवासी व मालवाहतुकीचे मुख्य साधन होते. मुंबई-रेवस, धरमतर-रेवस-मुंबई, मांडवा-मुंबई, धरमतर-नागोठणे, पनवेल-उलवा-मुंबई हे जलवाहतुकीचे प्रमुख मार्ग होते.पोर्तुगीजांच्या आगमनापर्यंत रेवदंडा हे महत्त्वाचे बंदर होते. कालांतराने हे बंदर गाळाने भरल्यामुळे त्याचा उपयोग व्यापारी बंदर म्हणून करणे बंद झाले. धरमतर धक्का १८६८ मध्ये १६ हजार ५३० रुपये खर्चून बांधण्यात आला.पूर्वी जिल्ह्यातील जलवाहतूक प्रामुख्याने गलबताने होई. अलिबाग बंदरात पडाव आणि लहान बोटी बांधल्या जात असत. अलिबाग बंदरातील बोटी रत्नागिरी व राजापूरचे सुतार बांधत असत. आता धरमतर हे मोठे व्यापारी बंदर झाले आहे.इ.स.१८८०-८१ मधील कुलाबा सीमाशुल्क विभागातील बोटींची ऐतिहासिक वाहतूकसीमाशुल्क विभाग भरलेली आलेली गलबते रिकामी आलेली गलबतेसंख्या टन संख्या टनराजपुरी १०९ ७४६ ६११ ६,९४६अलिबाग १४५३ ९,३५० २,२०६ १७,०८५साक्षी (पेण) १,७१३ १३,५१६ २,८४८ २५,१२७एकूण ३,२७५ २३,६१२ ५,६६५ ४९,१५८सीमाशुल्क विभाग भरलेली गेलेली गलबते रिकामी गेलेली गलबतेसंख्या टन संख्या टनराजपूर ६९७ ७,३९० २० ११४अलिबाग २,६६९ १९,८०६ ८८३ ५,५५२साक्षी (पेण) ३.९८७ ३५,६२३ ५२१ २,६२७एकूण ७,३५३ ६२,८१९ १४२४ ८२९३