शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

देहविक्री व्यवसायातील महिलांना मदतीचा हात; अन्नधान्य व आर्थिक साहाय्य योजना लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 02:47 IST

महिला व बालविकास विभाग, सद्य:स्थितीत कोविड-१९च्या संकटात या महिलांची, त्यांच्या मुलांची अवस्था बिकट झाली.

रायगड : देहविक्री व्यवसायात अडकलेल्या महिलांना सरकराने मदतीचा हात दिला आहे. रायगडच्या महिला व बालविकास विभागाने या महिलांसाठी अन्नधान्य व आर्थिक साहाय्य योजना लागू केली. पनवेलच्या लोक परिषद सामाजिक विकास संस्थेकडे नोंद असलेल्या १०४ महिलांना या मोहिमेंतर्गत आधार कार्डही देण्यात आले आहेत.

सद्य:स्थितीत कोविड-१९च्या संकटात या महिलांची, त्यांच्या मुलांची अवस्था बिकट झाली. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. मात्र, हे संकट दूर होण्यासाठी शासनाच्या महिला व बालविकास विभागाने या महिलांसाठी अन्नधान्य व आर्थिक साहाय्य योजना लागू केली. जेणेकरून त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित होऊ शकेल. यासाठी महिला व बालविकास विभागाने २६ नोव्हेंबर, २०२० रोजी शासन निर्णय जाहीर केला आहे. या शासन निर्णयानुसार या क्षेत्रातील महिलांना कोरडे अन्नधान्य व आर्थिक साहाय्य याचा लाभ मिळणार आहे. हा लाभ या महिलांना मिळण्याबाबत जिल्हा स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. 

रायगड जिल्ह्यातील देहविक्री करणाऱ्या ४०१ महिलांना कोरडे अन्नधान्य व आर्थिक साहाय्य रुपये ५ हजार, तसेच शाळेत जाणाऱ्या त्यांच्या मुलांना प्रत्येकी रुपये २ हजार ५००, याप्रमाणे एकूण १५ मुलांना रुपये ६१ लाख २७ हजार ५०० इतके अनुदान मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात आले आहे. या व्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या महिला, तसेच वेश्याव्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना एकूण ८ क्विंटल धान्य वितरित करण्यात आले. त्याचप्रमाणे, रोख स्वरूपात आर्थिक साहाय्य, थेट लाभ हस्तांतरण करण्याकरिता संबंधित स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने ४५ महिलांचे बचतखाते बँकेत काढण्यात आली आहेत, असेही महिला व बालविकास अधिकारी उज्ज्वला पाटील यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे या महिलांवर ओढावलेले संकट दूर होणार असून त्यांना स्वत:ची ओळख मिळून दिलासा मिळणार आहे. 

ओळख देण्याचा प्रयत्नसमाज व्यवस्थेतून संस्कृती, परंपरा आणि चालीरीती तयार होत असतात. त्याच समाजमनावर बिंबविल्या जातात. काही परंपरा समाज जीवनावर इतक्या खोलवर रुजलेल्या आहेत की, अथक प्रयत्नांनीही त्या समाजापासून वेगळ्या करता येत नाहीत. मानवी मूल्यांशी सुसंगत नसलेल्या वेश्याव्यवसायासारख्या काही अनिष्ट प्रथा सरकार आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून बंद केल्या जात आहेत. या व्यवसायातील बऱ्याच महिलांना स्वतःचा चेहराही नाही, स्वतःची ओळखही नाही. यासाठी सर्वप्रथम या महिलांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम राबविली असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी उज्ज्वला पाटील यांनी दिली.