शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागामुळे खैरपाडामधील मृत्यू थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 00:19 IST

कोरोनाची लक्षणे नसल्याने कर्जत पंचायत समिती आणि वारे ग्रामपंचायत यांनी गावातील सर्व २६ बोअरवेलमधील पाणी तपासणीसाठी नेले.

कर्जत : तालुक्यातील खैरपाडा गावातील चार आणि आदिवासी वाडीमधील एका व्यक्तीचा नोव्हेंबर महिन्यात अचानक मृत्यू झाला होता. कावीळ आणि हृदयविकाराचा झटका, यामुळे मृत्यू झालेले असतानाही कोरोनाची असलेली दहशत यामुळे खैरपाडा गावातील लोकांना आजूबाजूच्या गावातील लोक जवळ करीत नव्हते. कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राने राबविलेल्या कठोर उपाययोजनांनमुळे खैरपाडा येथील आकस्मिक मृत्यूचे प्रमाण थांबले आहे.

तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या खैरपाडा गावात ९ नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर, आठ दिवसांत गावातील आणखी तीन व्यक्तींचे निधन झाले, तर बाजूच्या वाडीमधील एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर कोरोनाच्या असलेल्या दहशतीमुळे आजूबाजूच्या गावकऱ्यांनी खैरपाडा गावाला अक्षरशः बाजूला करून ठेवले होते. खैरपाडा गावातील कोणत्याही व्यक्तीला आजूबाजूला असलेल्या गावातील लोक जवळ करीत नव्हते. स्थानिक दूधवाले यांचे घरोघरी पोहोचणारे दूधही कोणी घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे त्या दूधवाल्यांचे आर्थिक नुकसान होत होते, तर दुसरीकडे भाजीपाला पिकविणारे शेतकऱ्यांचा भाजीपाला शेजारच्या गावातील लहानशा बाजारपेठेत कोणी विकत घेत नव्हता आणि कंदमुळे विकायला नेली असता, तीही कोणी विकत घेत नव्हते. त्यात खैरपाडा गावातील त्या चार व्यक्तींपैकी दोन व्यक्तींचे मृत्यू कावीळ झाल्याने झाले असल्याचे बोलले जात होते. दोन व्यक्तींना हृदय विकाराचा झटका आला होता. मात्र, कोरोनाची भीती सर्वत्र घातली जात असल्याने नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात त्या गावात कोणी जायला तयार नव्हता. कोणत्याही मृत व्यक्तीच्या घरी बाहेरून कोणीही सांत्वन करायला जात नव्हते.

कावीळमुळे मृत्यू झाले असल्याची चर्चा सुरू असल्याने, कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राने खैरपाडा गावात आरोग्य शिबिर घेतले. त्या शिबिरात गावातील १४३ लोकांची तपासणी करण्यात आली असता, त्यातील कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लक्षणे नसल्याचे स्पष्ट झाले. कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळाजी पुरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सी.के. मोरे यांनी कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत यादव यांच्यासोबत ग्रामस्थांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर दररोज आठ दिवस कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक हे खैरपाडा गावात येऊन प्रत्येक घरी फिरून माहिती घेत होते.

चार व्यक्तींचे मृत्यू  दूषित पाण्यामुळे कोरोनाची लक्षणे नसल्याने कर्जत पंचायत समिती आणि वारे ग्रामपंचायत यांनी गावातील सर्व २६ बोअरवेलमधील पाणी तपासणीसाठी नेले. अलिबाग येथील प्रयोगशाळेतून त्या पाणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर गावातील चार व्यक्तींचे झालेले मृत्यू हे दूषित पाण्यामुळे झाले नाहीत, हे सिद्ध झाले. आरोग्य विभागाने घेतलेल्या आरोग्य शिबिर, तसेच सतत आठ दिवस प्रत्येक घरी जाऊन व्यक्तींची केलेली तपासणी, त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात निर्माण झालेली भीती कमी होण्यास मदत झाली, तर कोरोनाची लक्षणे कोणाला नसल्याने आपल्या गावातील चार व्यक्तींचे मृत्यूही कोरोनामुळे झाले नाहीत, हेही स्पष्ट झाले आहे. परिणामी, गावातील व्यक्तींच्या मनात निर्माण झालेली भीती निघून गेली आणि मागील १० दिवसांपासून खैरपाडा गावात कोणत्याही नवीन मृत्यूची नोंद झाली नाही आणि गावातील कोणत्याही व्यक्तीला कोणताही आजार झालेला नाही. त्यामुळे मृत्यूची निर्माण झालेली भीती निघून गेली असून, खैरपाडा गावात सध्या शांतता आहे.