शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

आरोग्य विभागामुळे खैरपाडामधील मृत्यू थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 00:19 IST

कोरोनाची लक्षणे नसल्याने कर्जत पंचायत समिती आणि वारे ग्रामपंचायत यांनी गावातील सर्व २६ बोअरवेलमधील पाणी तपासणीसाठी नेले.

कर्जत : तालुक्यातील खैरपाडा गावातील चार आणि आदिवासी वाडीमधील एका व्यक्तीचा नोव्हेंबर महिन्यात अचानक मृत्यू झाला होता. कावीळ आणि हृदयविकाराचा झटका, यामुळे मृत्यू झालेले असतानाही कोरोनाची असलेली दहशत यामुळे खैरपाडा गावातील लोकांना आजूबाजूच्या गावातील लोक जवळ करीत नव्हते. कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राने राबविलेल्या कठोर उपाययोजनांनमुळे खैरपाडा येथील आकस्मिक मृत्यूचे प्रमाण थांबले आहे.

तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या खैरपाडा गावात ९ नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर, आठ दिवसांत गावातील आणखी तीन व्यक्तींचे निधन झाले, तर बाजूच्या वाडीमधील एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर कोरोनाच्या असलेल्या दहशतीमुळे आजूबाजूच्या गावकऱ्यांनी खैरपाडा गावाला अक्षरशः बाजूला करून ठेवले होते. खैरपाडा गावातील कोणत्याही व्यक्तीला आजूबाजूला असलेल्या गावातील लोक जवळ करीत नव्हते. स्थानिक दूधवाले यांचे घरोघरी पोहोचणारे दूधही कोणी घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे त्या दूधवाल्यांचे आर्थिक नुकसान होत होते, तर दुसरीकडे भाजीपाला पिकविणारे शेतकऱ्यांचा भाजीपाला शेजारच्या गावातील लहानशा बाजारपेठेत कोणी विकत घेत नव्हता आणि कंदमुळे विकायला नेली असता, तीही कोणी विकत घेत नव्हते. त्यात खैरपाडा गावातील त्या चार व्यक्तींपैकी दोन व्यक्तींचे मृत्यू कावीळ झाल्याने झाले असल्याचे बोलले जात होते. दोन व्यक्तींना हृदय विकाराचा झटका आला होता. मात्र, कोरोनाची भीती सर्वत्र घातली जात असल्याने नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात त्या गावात कोणी जायला तयार नव्हता. कोणत्याही मृत व्यक्तीच्या घरी बाहेरून कोणीही सांत्वन करायला जात नव्हते.

कावीळमुळे मृत्यू झाले असल्याची चर्चा सुरू असल्याने, कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राने खैरपाडा गावात आरोग्य शिबिर घेतले. त्या शिबिरात गावातील १४३ लोकांची तपासणी करण्यात आली असता, त्यातील कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लक्षणे नसल्याचे स्पष्ट झाले. कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळाजी पुरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सी.के. मोरे यांनी कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत यादव यांच्यासोबत ग्रामस्थांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर दररोज आठ दिवस कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक हे खैरपाडा गावात येऊन प्रत्येक घरी फिरून माहिती घेत होते.

चार व्यक्तींचे मृत्यू  दूषित पाण्यामुळे कोरोनाची लक्षणे नसल्याने कर्जत पंचायत समिती आणि वारे ग्रामपंचायत यांनी गावातील सर्व २६ बोअरवेलमधील पाणी तपासणीसाठी नेले. अलिबाग येथील प्रयोगशाळेतून त्या पाणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर गावातील चार व्यक्तींचे झालेले मृत्यू हे दूषित पाण्यामुळे झाले नाहीत, हे सिद्ध झाले. आरोग्य विभागाने घेतलेल्या आरोग्य शिबिर, तसेच सतत आठ दिवस प्रत्येक घरी जाऊन व्यक्तींची केलेली तपासणी, त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात निर्माण झालेली भीती कमी होण्यास मदत झाली, तर कोरोनाची लक्षणे कोणाला नसल्याने आपल्या गावातील चार व्यक्तींचे मृत्यूही कोरोनामुळे झाले नाहीत, हेही स्पष्ट झाले आहे. परिणामी, गावातील व्यक्तींच्या मनात निर्माण झालेली भीती निघून गेली आणि मागील १० दिवसांपासून खैरपाडा गावात कोणत्याही नवीन मृत्यूची नोंद झाली नाही आणि गावातील कोणत्याही व्यक्तीला कोणताही आजार झालेला नाही. त्यामुळे मृत्यूची निर्माण झालेली भीती निघून गेली असून, खैरपाडा गावात सध्या शांतता आहे.