शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

जिल्ह्यात २०० कोटींचे पॅकेज द्या; मच्छीमारांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:22 AM

मत्स्य व्यवसाय आयुक्तांना दिले निवेदन

अलिबाग : अवकाळी पाऊस, क्यार आणि महाचक्रिवादळामुळे रायगड जिल्ह्यातील मासेमारी करणारे, तसेच त्याच्यावर उदरनिर्वाह करणाऱ्यांचे तब्बल २०० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने आर्थिक पॅकेज मंजूर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाने केली आहे. तसे निवेदन त्यांनी राज्याच्या मत्स्य व्यवसाय आयुक्तांना गुरुवारी दिले.राज्यात पडलेल्या परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून राज्य सरकारने दहा हजार कोटी रु पयांची तरतूद केली आहे. मात्र, क्यार वादळ आणि महाचक्रिवादळामुळे मच्छीमारांच्या नुकसानभरपाईबाबत अद्याप कोणतीही भूमिका सरकारने स्पष्ट केलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून अरबी समुदातील क्यार आणि महाचक्रिवादळामुळे मासेमारी करणाºयांना मासेमारी करण्यासाठी जाताच आलेले नाही. त्यामुळे त्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.जिल्ह्यामध्ये एक नौका सहा सिलिंडर व बिगर यांत्रिकी नौकांची संख्याही तीन हजार ४५५ आहे. त्यांचे सुमारे १२७ कोटी दहा लाख तीन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मच्छीविक्रेतींची संख्या ही सात हजार ४७७ आहे. त्यांचे २० कोटी ७६ लाख २५ हजार ५०० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच मच्छी सुकवणारे (महिला) तीन हजार ८१२ अशी संख्या आहे. त्यांना नऊ कोटी २८ लाख ३८ हजार रुपयांचा फटका बसला आहे.जिल्ह्यात आठ हजार २३९ खलाशांचे ३४ कोटी ५४ लाख ३९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अन्य कामगार आणि जाळी विणणाºया दोन हजार ३६४ जणांना चार कोटी ७९ लाख १६ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. असे एकूण १९६ कोटी ४८ लाख २१ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे, असे निवेदनात रायगड जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाचे अध्यक्ष शेषनाथ कोळी यांनी नमूद केले आहे.सरकारने मच्छीमार समाजाला न्याय द्यावा, तरच त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी राज्य मच्छीमार संघाचे अध्यक्ष रामदास संधे, अलिबाग मच्छीमार संघाचे अध्यक्ष विजय तांडेल, संचालक सत्यजित पेरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :fishermanमच्छीमार