शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

सहा वर्षांत ट्रेकिंगला आलेल्या पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 03:29 IST

तालुक्यातील कर्नाळा किल्ला व प्रबळगडावरून खाली पडून सहा वर्षांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात आहे. तरुण मुले, मुली कोणतीही साधन सामुग्री न घेता सध्या ट्रेकिंगला जाताना दिसत आहेत. मात्र, ही ट्रेकिंग त्यांच्या जीवावर बेतत आहे.

- मयूर तांबडे

पनवेल : तालुक्यातील कर्नाळा किल्ला व प्रबळगडावरून खाली पडून सहा वर्षांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात आहे. तरुण मुले, मुली कोणतीही साधन सामुग्री न घेता सध्या ट्रेकिंगला जाताना दिसत आहेत. मात्र, ही ट्रेकिंग त्यांच्या जीवावर बेतत आहे. तरुणाई ट्रेकिंगला जाताना मृत्यू ओढवून घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणी ट्रेकिंगसाठी जाताना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे.ट्रेक करण्यासाठी अनेक गिर्यारोहक व पर्यटक नेहमीच माची प्रबळगडावर येत असतात. यापैकी काहीना मृत्यूने गाठले आहे, तर यात काही जण जखमी होत असल्याचे सांगितले जात आहे. माची प्रबळगड सर करण्याचा प्रयत्न करत असताना पाय घसरून पडल्याची घटना चार दिवसांपूर्वी नुकतीच घडली आहे. पुणे येथील पिंपळे सौदागर येथील चेतन सुनील धांडे हा २६ वर्षीय युवक व मालविका कुलकर्णी ही त्याची २५ वर्षीय सहकारी शनिवार, १० फेब्रुवारीलाप्रबळगडावर ट्रॅकिंग करता आले होते. गड चढायला सुरुवात केल्यानंतर प्रबळगडाचा शेवटचा टप्पा असलेला कलावती दुर्ग चढत असताना चेतन याने पकडलेला दगड निसटल्याने तो खाली पडला. त्यात त्याचा खाली पडून मृत्यू झाला. पोलिसांनी निसर्ग मित्र संघटना व स्थानिकांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढला. अनेकांना किल्ला/गड ट्रेक करण्याचा अनुभव नसतानादेखील तो सर करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यामुळे अनर्थ घडत आहे. ट्रेकिंगची वाट मृत्यूकडे नेत असल्याने पोलीस प्रशासनाकडून सावधतेचा इशारा देण्यात येत आहे. गेल्या सहा वर्षांत पाच मृत्यू झाल्याने ट्रेकिंग करणाºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामुळे पर्यटकांनी व गिर्यारोहकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या वीकेंडला सहकुटुंब ट्रेकसाठी जाणाºयांची संख्या वाढत आहे. तरुणांसह खास ज्येष्ठ नागरिकदेखील ट्रेकची आखणी करताना दिसत आहेत. ट्रेकमध्ये कोणताही अपघात घडल्यास अथवा त्रास जाणवल्यास प्रथमोपचारांची माहिती असणे गरजेचे आहे. ट्रेकरूटमध्ये अपघात झाल्यास आणि प्रथमोपचारांची माहिती नसल्यास मदत मिळणे अवघड असते. निसर्गाचा स्वभाव समजून घेतला तर ट्रेकिंग, भटकंती वा पदभ्रमण या सगळ्या गोष्टी आनंददायीच ठरतात. निसर्गातले थ्रील आजमावण्यात चूक काहीच नाही; पण जेव्हा हे थ्रील जीवावर बेतते तेव्हा फारच उशीर झालेला असतो. ट्रेकिंगला बाहेर पडताना एकटे असू वा सोबत ग्रुप असो. आपल्या सुरक्षेची सर्वात पहिली जबाबदारी आपलीच असते. त्यामुळे ट्रेकिंगला जाताना त्या ठिकाणची संपूर्ण माहिती असणे गरजेचे असते. ट्रेकिंगला जाताना सर्व साधन सामुग्री जवळ बाळगणे अपेक्षित आहे.जानेवारी २०१२मध्ये पुणे येथील भावेन पटेल (२६), या युवकाचा कर्नाळा किल्ला चढत असताना पाय घसरून खाली पडून मृत्यू झाला. एप्रिल २०१३मध्ये बोरीवली येथील करन मेहता (२५) हा तरु ण आपल्या मित्रांसह कर्नाळा किल्ला सर करत असताना अचानकपणे मधमाशांनी केलेल्या हल्लात सर्व जण घाबरून सैरावैरा पळत असताना करन मेहता या तरु णाचा किल्यावरून पाय घसरून खाली पडून मृत्यू झाला. डिसेंबर २०१३मध्ये जालना येथील अर्जुन जोगदंड (२१) या युवकाचा हाजीमलंग येथील डोंगरावरून खाली पडून मृत्यू झाला. डिसेंबर २०१६मध्ये हैदराबाद येथील रुचिता गुप्ता कनौडिया (२७) या तरु णीचा माची प्रबळगड येथून पाय घसरून खाली पडून मृत्यू झाला. तर फेब्रुवारी २०१८मध्ये पुणे येथील चेतन धांडे (२५) या तरु णाचा माची प्रबळगड येथे पाय घसरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निसर्ग मित्र संघटना व स्थानिक गावकºयांच्या मदतीने पोलिसांनी या घटनेतील मृत नागरिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले. त्यामुळे ट्रेकिंगला जाताना सावधानता बाळगण्याचा इशारा दिला जात आहे.

टॅग्स :FortगडRaigadरायगड