शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची उद्यापासून भाडेवाढ

By admin | Updated: August 21, 2014 01:12 IST

सूत्रनुसार प्रवासभाडय़ात 22 ऑगस्टपासून सरासरी 0.80 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : सातत्याने होणा:या डिङोल दरवाढीमुळे एसटी महामंडळाला फटका बसत असून महामंडळाने आपोआप भाडेवाढ सूत्रनुसार  प्रवासभाडय़ात 22 ऑगस्टपासून सरासरी 0.80 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.   त्यामुळे एसटीच्या सर्व सेवांच्या तिकिटांच्या किमतीत साधारण 1 रुपया ते 6 रुपये अशी वाढ होणार होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे डिङोल दरवाढ झाली की फक्त 
राज्य परिवहन प्राधिकरणाला भाडेवाढीची कल्पना देऊन 
भाडेवाढ एसटी महामंडळ करू शकते. मात्र 22 ऑगस्टपासून अशी भाडेवाढ होणार असल्याची साधी माहितीही परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण 
यांना नसल्याचे बुधवारी 
एसटीच्याच एका कार्यक्रमात दिसून आले. 
एसटी महामंडळाकडून 0.80 टक्के भाडेवाढ करण्यात आली असून त्यामुळे साध्या, जलद आणि रात्रसेवा तसेच निमआराम सेवेत प्रति सहा किलोमीटरसाठी फक्त 5 पैसे अशी अत्यल्प वाढ आहे. साध्या आणि जलद सेवेच्या 27 किलोमीटरच्या प्रवासासाठी वाढ करण्यात आली नसून, शहरी सेवेच्या प्रवासभाडय़ात वाढ केलेली आहे. शिवनेरी प्रवाशांना मात्र दिलासा मिळाला असून पुणो-नाशिक शिवनेरी आणि पुणो-नाशिक शीतल निमआराम वातानुकूलित सेवेत फक्त 5 रुपये वाढ करण्यात आली आहे. तर साध्या, रात्र सेवा आणि निमआराम सेवेत एक रुपयापासून ते 6 रुपयांर्पयत वाढ आहे. एसटी महामंडळाने मार्च महिन्यापासून आतार्पयत केलेली ही चौथी भाडेवाढ आहे. 2014 मध्ये 7 मार्च रोजी 2.54 टक्के भाडेवाढ झाली होती. ही सर्वात मोठी भाडेवाढ होती. त्यानंतर महामंडळाकडून अत्यल्प भाडेवाढ सातत्याने करण्यात आली. 
 
च्मात्र या भाडेवाढीबाबत राज्याचे परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण हेच अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. राज्य परिवहन प्राधिकरणाला भाडेवाढीच्या तीन दिवस अगोदर माहिती देऊन त्यानंतर एसटी महामंडळ भाडेवाढ करू शकते. यात अन्य कोणालाही भाडेवाढीची माहिती देणो गरजेचे नसते. 
च्मात्र बुधवारी एसटी महामंडळाच्या सलग 25 वर्षे विनाअपघात केलेल्या चालकांच्या सत्कार कार्यक्रमास हजेरी लावणा:या परिवहन मंत्र्यांना 22 ऑगस्टपासून भाडेवाढ होणार असल्याची माहितीच नसल्याचे दिसून आले. या कार्यक्रमानंतर परिवहन मंत्र्यांना 22 ऑगस्टपासून भाडेवाढ होणार असून, सातत्याने होणा:या भाडेवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत असल्याचे विचारताच त्याची माहितीच नसल्याचे त्यांनी सांगितले. 
च्याबाबत त्यांनी सोबत असलेले एसटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांना विचारले आणि डिङोल दरवाढीमुळे भाडेवाढ करावी लागल्याचे खंदारे यांनी परिवहन मंत्र्यांना सांगितले. त्यानंतर सारवासारव करीत महामंडळाने केलेली भाडेवाढ योग्य असल्याचे सांगत परिवहन मंत्र्यांनी काढता पाय घेतला.
 
क्षमतेपेक्षा पाच प्रवासी ज्यादा नेण्याची अजब सूचना
मुंबई : एसटी महामंडळाला सध्या तोटा होत असून तो कमी करण्यासाठी वाहतूक नियमांना डावलून महामंडळाकडून अजब सूचना केल्या जात आहेत. एसटी महामंडळाकडून 25 वर्षे अपघातविरहित सेवा देणा:या चालकांचा सत्कार बुधवारी करण्यात आला. या वेळी क्षमतेपेक्षा पाच प्रवासी अधिक नेण्याची अजब सूचना एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी चालकांना केली. जास्त प्रवासी भरल्यानेही अपघात होत असताना महामंडळाकडून अशी सूचना करणो म्हणजे अपघातांना निमंत्रण देण्यासारखेच असल्याची चर्चा आहे. 
25 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे अपघातविरहित सेवा केलेल्या मुंबई विभागातील चालक आणि त्यांच्या पत्नींचा विशेष सत्कार दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात करण्यात आला. यावेळी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे व एसटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, अधिकारी व चालक उपस्थित होते. यावेळी 73 चालकांचा रोख रक्कम, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर भाषणात एसटीचे व्यवस्थापकीय संचालक खंदारे यांनी चालकांना सांगितले, की महामंडळाचा तोटा वाढतच आहे. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होत आहे. सध्या 200 कोटी रुपयांची तूट असून ती भरून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे प्रत्येक चालकाने क्षमतेपेक्षा पाच तरी अधिक प्रवाशांची वाहतूक करावी. (प्रतिनिधी)
 
च्एसटीच्या बसची आसनक्षमता सध्या 45 असून, उभ्याने प्रवास करणा:या प्रवाशांची क्षमता ही 13 ते 15 आहे. त्यामुळे आणखी जास्त प्रवासी नेण्याची सूचना म्हणजे हे अपघाताला निमंत्रण असल्याची चर्चा रंगली. 
च्अपघातविरहित चालकांच्या सत्कार कार्यक्रमात अशी सूचना करणो कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित झाला. या वेळी अधिकृत थांब्यांवरच चालकांनी बस थांबवून प्रवाशांना सहकार्य करण्याची सूचनाही त्यांनी केली.