शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
निवडणुकीत अजितदादांना शह द्यायला पार्थ पवार प्रकरण मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढले?; चर्चांना उधाण
5
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
6
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
7
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
8
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
9
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
10
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
11
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
12
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
13
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
14
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
15
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
16
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
17
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
18
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
20
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."

भातपिकाच्या जनुकीय आराखड्यासाठी प्रयत्न- डॉ. संजय सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 00:00 IST

कर्जत येथे राज्यातील भात शास्त्रज्ञांची गटचर्चा

कर्जत : प्रत्येक जनुकाचे कार्य समजण्यासाठी जनुकिय आराखडा महत्वाचा आहे, त्यामुळे आराखडा तयार झाल्यास त्याचा खूप फायदा होऊ शकतो, म्हणून विशिष्ट गुणधर्म असलेल्या जाती निर्माण करण्यासाठी ह्यजनुक संपादनह्ण या तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे असे मत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी मांडले. भातपिकाच्या संधोधनासाठी जनुकीय आराखडा तयार करण्यावर विद्यापीठ प्रयत्न करीत आहे असे मत कर्जत येथील कृषी भात संशोधन केंद्रात आयोजित राज्यातील भात शास्त्रज्ञ यांच्या गटचर्चेत डॉ. सावंत बोलत होते.

कोकणात भाताचे संकरित क्षेत्र एकूण भात लागवड क्षेत्राच्या १० टक्के पर्यंत वाढविण्याची नितांत गरज आहे. असे झाल्यास भात शेती फायदेशीर ठरेल. बदलत्या हवामानाच्या दृष्टीने प्रत्येक भात जातीनुसार लागवड पध्दत अवलंबिली जाणे. तसेच उत्परिवर्तन प्रजनन तंत्रज्ञानाने कमी उंचीच्या भाताचे वाण आणि कमी आकाराचे दाणे तसेच जमिनीवर न गळणाऱ्या वाणावर संशोधन व्हायला हवे, या प्रकारे संशोधन केले जात आहे असे डॉ सावंत यांनी स्पष्ट केले.

या आराखड्यात किडी आणि रोगांच्या प्रादुर्भावाचे अवलोकन करून कमी कालावधीमध्ये अधिक क्षेत्रावर फवारणी करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान फायदेशीर ठरेल असे देखील डॉ सावंत यांनी नमूद केले. शेवटी बोलताना भात आणि कोकण हे समीकरण अबाधित ठेवण्यासाठी शहरामध्ये वास्तव्यास असलेल्या कोकणातील बहुतेक चाकरमान्यांची शेती पडिक होत चालल्याने ती शेती लागवडी खाली आणण्याची गरज आहे आणि त्यातून अधिक उत्पन्न काढण्याची गरज आहे असे आवाहन डॉ संजय सावंत यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. उपस्थित शास्त्रज्ञांचे स्वागत कर्जत भात पैदासकार महेंद्र गवई यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मदार्ने यांनी केले,तर सहायक भात विशेषज्ञ डॉ. प्रवीण वणवे यांनी मानले.

गटचर्चेला मराठवाड्यातून डॉ. अभय जाधव, विदभार्तून डॉ. गौतम श्यामकुवर, डॉ. बाळासाहेब चौधरी, डॉ. मिलिंद मेश्राम, पश्चिम महाराष्ट्रातून डॉ. हेमंत पाटील, डॉ. एन. व्ही. काशीद, डॉ. के. एस. रघुवंशी, सी. डी. सरवंडे,दक्षिण कोकणातून डॉ. भरत वाघमोडे, डॉ. विजय शेट्ये, खार जमीन शास्त्रज्ञ डॉ.एस. बी.दोडके, ए.एस.ढाणे, भाभा अणू संशोधन केंद्राचे डॉ. बी. के. दास आदी भात पिकावर काम करणारे शास्त्रज्ञ प्रामुख्याने उपस्थित होते.

भाताची उत्पादकता १२० टक्क्यांनी वाढली- डॉ. रमेश कुणकेरकर

परिषदेत डॉ.इंदू सावंत यांनी, मधुमेह रुग्णांसाठी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले भात वाण प्रसारित करण्याची गरज प्रतिपादित करीत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला तांदूळ ब्रँड नेमने मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ.पराग हळदणकर यांनी भाताचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे.

च्क्षेत्र कमी होत असल्याची चिंता व्यक्त करीत विद्यापीठाने विकसित केलेल्या भात जातींमुळे शेतकऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनावर झालेल्या परिणामांचा अभ्यास करण्याची गरज प्रतिपादित केली. यावेळी डॉ. मुराद बुरोंडकर आणि डॉ. शिवराम भगत यांची समयोचित भाषणे झाली.

च्प्रास्ताविकात डॉ. रमेश कुणकेरकर म्हणाले की, ५४ वर्षांपासून सलग वार्षिक गट चर्चा होत असून, महाराष्ट्रात आतापर्यंत ६९ भात जाती प्रसारित झाल्या. १९६० पासून २०१९ पर्यंत भाताची उत्पादकता १२० टक्क्यांनी वाढली असून, बारीक दाण्याचे संकरित वाण विकसित करणे काळाची गरज आहे.

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र