शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

धरणाच्या निधीअभावी पाणीटंचाई, वाशी खारेपाट विभागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 06:53 IST

पेण तालुक्यातील शहापाडा धरणाच्या खर्चासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याने वाशी विभाग, वडखळ विभागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची झळ सोसावी लागत आहे.

- सुनील बुरूमकरकार्लेखिंड  - पेण तालुक्यातील शहापाडा धरणाच्या खर्चासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याने वाशी विभाग, वडखळ विभागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची झळ सोसावी लागत आहे.मार्च महिन्यापासून सर्वत्रच पिण्याच्या पाण्याची बोंब सुरू होते. कोकणात पाऊस पडतो, परंतु पाणी साठवण व्यवस्था चांगली नसल्याने पावसाचे पाणी नाल्यावाटे समुद्राला मिळते. कोकण विभाग अतिवृष्टीचा असला तरी पाण्याची झळ सोसावी लागते. पेण तालुक्यात मोठी धरणे आहेत. परंतु या तालुक्यातील जनता पाण्यावाचून नेहमीच तडफडत असते. जलसंपदा, पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा यांचा समन्वय आणि नियोजन नसल्याने ही परिस्थिती आहे.शहापाडा धरण पाणी योजनेस हेटवणे धरणातून पाण्याचा साठा उपलब्ध करुन दिल्यास, या धरणातून वडखळ व वाशी विभाग कधीच पिण्याच्या पाण्यास वंचित राहाणार नाही. परंतु या धरणाच्या दुरुस्तीसाठी किंवा पाणीपुरवठा वाढविण्यासाठी आवश्यक निधी यंत्रणेला उपलब्ध होत नाही. त्यामुळे सुधारणा करण्यासाठी अनेक अडथळे आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा राजिप उपविभाग यांच्या अंतर्गत या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहापाडा धरणामध्ये पाण्याचा साठा कमी असल्यामुळे हेटवणे धरणाच्या सिंचनाच्या कालव्यातून ३५ एचपी आणि २५ एचपीच्या दोन पंपाद्वारे धरणामध्ये पाणी सोडले जाते आणि ते पाणी शुद्ध करून टाकीमध्ये साठविले जाते. परंतु शुद्ध केलेले पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अपुरे पडते. त्यामुळे या गावांना दोन ते तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येतो.पाणी शुद्धीकरण यंत्रणेविषयी शाखा अभियंता आर. एम. राठोड म्हणाले, पाणी पूर्णत: शुद्ध होत नाही हे सत्य आहे. त्यासाठी पंप मशिन, रेती, फिल्टर आदी लागणाऱ्या बाबींचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. राठोड पुढे म्हणाले, तीस कोटी रुपयांच्या मंजूर प्रकल्पामध्ये वाढीव शहापाडा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा समावेश आहे आणि हे काम महाराष्टÑ जीवन प्राधिकरण अंतर्गत होणार आहे. यासाठी साधारणत: दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. या योजनेमुळे वडखळ व वाशी विभाग पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही.सध्या वाशी खारेपाटातील जनतेचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांना रात्री बारा ते दोन वाजेपर्यंत जागावे लागते. पाण्याचा दाब कमी असल्याने छोटे पंप लावावे लागतात. तसेच अनेक ठिकाणी पाइप गळती असल्याने शेतातील खारे पाणी शिरून पिण्याचे पाणी दूषित देखील होते. अशामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. नोकरीनिमित्त बाहेर असलेले लोक गावी जाताना मिनरल पाण्याच्या बाटल्या घेवून जातात. मिळणारे पाणी कमी असल्यामुळे जनावरांचे सुद्धा हाल होत आहेत. अशी गंभीर परिस्थिती या विभागातील जनतेची आहे.हेटवणे धरणातील कालव्याद्वारे आलेले पाणी हे सिंचनासाठी असले तरी त्यातून पिण्याच्या पाण्यासाठी शहापाडा धरणात पंपाद्वारे पाणी सोडले जाते, अशी माहिती महाराष्टÑ शासनाच्या जलसंपदा विभाग उपविभागीय अधिकारी हेटवणे कालवा उपविभाग-१ उंबडे पेण या कार्यालयातून प्राप्त झाली आहे.हेटवणे कालवा कार्यालयाच्या अंतर्गत अठरा किमी अंतरातील भाग येतो. हेटवणे धरणातून रोज ३ हजार २५१ क्युसेक पाणी सिंचनासाठी सोडले जाते. तसेच याचा दुसरा उपयोग पानेड येथील वीजनिर्मिती प्रकल्पासाठी केला जातो. त्यामुळे रोज याच दाबाने पाणी सोडले जाते.प्राधिकरणाच्या नियोजनाअभावी हेटवणे धरणातील पाणी नाल्यावाटे खाडीत जातेआम्हाला योग्य दाबाने पाणी सोडले नाही तर शहापाडा या विभागातील शेतकºयांना पाणी देता येणार नाही,अशी माहिती जलसंपदा विभागाचे कनिष्ठ अभियंता झेड. एच. म्हैसकर यांनी दिली.पाणी वाया जाण्याचे कारण सांगताना म्हैसकर म्हणाले, अठरा किमी अंतरातील शेतकºयांना पाणी देवू नये अशी लेखी तक्रार रोडे व काश्मिर या ग्रामस्थांनी केलेली आहे. कारण सततच्या दलदलीमुळे आमची शेती सुपीक राहणार नाही. त्यामुळे आम्हाला या धरणाच्या शेजारी बांध घालावा लागला आहे आणि येणारे पाणी नाईलाजाने सोडावे लागत आहे. 

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईRaigadरायगड