शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

धरणाच्या निधीअभावी पाणीटंचाई, वाशी खारेपाट विभागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 06:53 IST

पेण तालुक्यातील शहापाडा धरणाच्या खर्चासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याने वाशी विभाग, वडखळ विभागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची झळ सोसावी लागत आहे.

- सुनील बुरूमकरकार्लेखिंड  - पेण तालुक्यातील शहापाडा धरणाच्या खर्चासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याने वाशी विभाग, वडखळ विभागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची झळ सोसावी लागत आहे.मार्च महिन्यापासून सर्वत्रच पिण्याच्या पाण्याची बोंब सुरू होते. कोकणात पाऊस पडतो, परंतु पाणी साठवण व्यवस्था चांगली नसल्याने पावसाचे पाणी नाल्यावाटे समुद्राला मिळते. कोकण विभाग अतिवृष्टीचा असला तरी पाण्याची झळ सोसावी लागते. पेण तालुक्यात मोठी धरणे आहेत. परंतु या तालुक्यातील जनता पाण्यावाचून नेहमीच तडफडत असते. जलसंपदा, पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा यांचा समन्वय आणि नियोजन नसल्याने ही परिस्थिती आहे.शहापाडा धरण पाणी योजनेस हेटवणे धरणातून पाण्याचा साठा उपलब्ध करुन दिल्यास, या धरणातून वडखळ व वाशी विभाग कधीच पिण्याच्या पाण्यास वंचित राहाणार नाही. परंतु या धरणाच्या दुरुस्तीसाठी किंवा पाणीपुरवठा वाढविण्यासाठी आवश्यक निधी यंत्रणेला उपलब्ध होत नाही. त्यामुळे सुधारणा करण्यासाठी अनेक अडथळे आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा राजिप उपविभाग यांच्या अंतर्गत या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहापाडा धरणामध्ये पाण्याचा साठा कमी असल्यामुळे हेटवणे धरणाच्या सिंचनाच्या कालव्यातून ३५ एचपी आणि २५ एचपीच्या दोन पंपाद्वारे धरणामध्ये पाणी सोडले जाते आणि ते पाणी शुद्ध करून टाकीमध्ये साठविले जाते. परंतु शुद्ध केलेले पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अपुरे पडते. त्यामुळे या गावांना दोन ते तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येतो.पाणी शुद्धीकरण यंत्रणेविषयी शाखा अभियंता आर. एम. राठोड म्हणाले, पाणी पूर्णत: शुद्ध होत नाही हे सत्य आहे. त्यासाठी पंप मशिन, रेती, फिल्टर आदी लागणाऱ्या बाबींचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. राठोड पुढे म्हणाले, तीस कोटी रुपयांच्या मंजूर प्रकल्पामध्ये वाढीव शहापाडा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा समावेश आहे आणि हे काम महाराष्टÑ जीवन प्राधिकरण अंतर्गत होणार आहे. यासाठी साधारणत: दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. या योजनेमुळे वडखळ व वाशी विभाग पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही.सध्या वाशी खारेपाटातील जनतेचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांना रात्री बारा ते दोन वाजेपर्यंत जागावे लागते. पाण्याचा दाब कमी असल्याने छोटे पंप लावावे लागतात. तसेच अनेक ठिकाणी पाइप गळती असल्याने शेतातील खारे पाणी शिरून पिण्याचे पाणी दूषित देखील होते. अशामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. नोकरीनिमित्त बाहेर असलेले लोक गावी जाताना मिनरल पाण्याच्या बाटल्या घेवून जातात. मिळणारे पाणी कमी असल्यामुळे जनावरांचे सुद्धा हाल होत आहेत. अशी गंभीर परिस्थिती या विभागातील जनतेची आहे.हेटवणे धरणातील कालव्याद्वारे आलेले पाणी हे सिंचनासाठी असले तरी त्यातून पिण्याच्या पाण्यासाठी शहापाडा धरणात पंपाद्वारे पाणी सोडले जाते, अशी माहिती महाराष्टÑ शासनाच्या जलसंपदा विभाग उपविभागीय अधिकारी हेटवणे कालवा उपविभाग-१ उंबडे पेण या कार्यालयातून प्राप्त झाली आहे.हेटवणे कालवा कार्यालयाच्या अंतर्गत अठरा किमी अंतरातील भाग येतो. हेटवणे धरणातून रोज ३ हजार २५१ क्युसेक पाणी सिंचनासाठी सोडले जाते. तसेच याचा दुसरा उपयोग पानेड येथील वीजनिर्मिती प्रकल्पासाठी केला जातो. त्यामुळे रोज याच दाबाने पाणी सोडले जाते.प्राधिकरणाच्या नियोजनाअभावी हेटवणे धरणातील पाणी नाल्यावाटे खाडीत जातेआम्हाला योग्य दाबाने पाणी सोडले नाही तर शहापाडा या विभागातील शेतकºयांना पाणी देता येणार नाही,अशी माहिती जलसंपदा विभागाचे कनिष्ठ अभियंता झेड. एच. म्हैसकर यांनी दिली.पाणी वाया जाण्याचे कारण सांगताना म्हैसकर म्हणाले, अठरा किमी अंतरातील शेतकºयांना पाणी देवू नये अशी लेखी तक्रार रोडे व काश्मिर या ग्रामस्थांनी केलेली आहे. कारण सततच्या दलदलीमुळे आमची शेती सुपीक राहणार नाही. त्यामुळे आम्हाला या धरणाच्या शेजारी बांध घालावा लागला आहे आणि येणारे पाणी नाईलाजाने सोडावे लागत आहे. 

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईRaigadरायगड