शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

तरुणाचा डेंग्यूमुळे मृत्यू, अलिबागमध्ये डासांचा प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 02:48 IST

शहरातील कोळीवाडा परिसरातील रहिवासी सुजित गजानन भगत (३०) यांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे.

अलिबाग : शहरातील कोळीवाडा परिसरातील रहिवासी सुजित गजानन भगत (३०) यांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. या पावसाळ्यातील हा डेंग्यूचा पहिलाच बळी ठरला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेसह नगर पालिका प्रशासनाने सुदृढ आरोग्य व्यवस्था राबवल्याचा केलेला दावा सुजित याच्या मृत्यूने फोल ठरला आहे. सुजितचा मृत्यू हा अलिबागमधील डेंग्यूचा डास चावूनच झाला आहे, असे आपण कसे म्हणू शकतो, अशी प्रतिक्रिया अलिबाग नगर पालिकेचे मुख्याधिकारी महेश चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.अलिबाग कोळीवाड्यात राहणारा मेहनती तरुण अशी सुजितची ओळख आहे. त्याचे दोन-अडीच वर्षांपूर्वीच लग्न झाले असून, दीड वर्षाची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी ताप आल्याने त्याने स्थानिक दवाखान्यामध्ये उपचार घेतले. त्यानंतर तो कामात व्यग्र झाला. मात्र, जास्त त्रास जाणवू लागल्याने त्याला जिल्हा सरकारी रु ग्णालयात दाखल केले, परंतु सुजितची परिस्थिती गंभीर झाली होती. त्यामुळे त्याला तातडीने मुंबईला नेण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. जे.जे. रुग्णालयात त्याला डेंग्यू झाल्याचे निदान झाले. त्यांच्या शरीरातील पेशी झपाट्याने कमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा १७ जुलै रोजी मृत्यू झाला.सुजितच्या मृत्यूने जाग आल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरातील सदस्यांची, त्याचप्रमाणे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य तपासणी केली. सुजितला डेंग्यूची लागण होऊन मृत्यू झाल्याने शहरात डेंग्यू पसरल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने कोळीवाडा परिसरात तपासणी सुरू केली आहे, तर घराजवळ साचलेले डबके व परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.>फॉगिंग मशिनचा प्रशासनाचा दावा फोलअलिबाग नगर पालिकेचे मुख्याधिकारी महेश चौधरी यांनी मात्र अलिबाग शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये डास निर्मूलनासाठी उपाययोजना केल्या जातात, असे ‘लोकमत’ला सांगितले. त्यामध्ये फॉगिंग मशिन दररोज वॉर्डमध्ये फिरवण्यात येते. त्याचप्रमाणे गटारांमध्ये औषध फवारणीही नित्यनियमाने करण्यात येते, असा दावा केला असला तरी, प्रत्यक्षात मात्र नागरिकांनी हा दावा अमान्य केला आहे.सुजित भगत याचा मृत्यू हा अलिबागमधील डास चावल्यानेच झाला असे आपण सांगू शकत नाही, असे संतापजनक उत्तर चौधरी यांनी दिल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.अलिबाग नगर पालिका प्रशासनामार्फत डास निर्मूलनासाठी करण्यात येणाºया उपाययोजनांमध्ये सातत्य नाही. २०१० पासून अलिबाग नगर पालिकेमध्ये आरोग्य निरीक्षकाचे महत्त्वाचे पद रिक्त असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी सांगितले.>डेंग्यूमुळे काही रु ग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात.२० हजारांच्यावर प्लेटलेट्स असतील तर, येथे उपचार करता येतात. त्याच्या खाली असल्यास त्या रुग्णाला अधिक उपचारासाठी मुंबईला पाठवण्याशिवाय पर्याय नसतो. रुग्णाच्या रक्ताच्या विविध तपासण्या करण्याची सोय अलिबागला उपलब्ध नाही.- डॉ. अनिल फुटाणे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक

टॅग्स :dengueडेंग्यू