शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

अलिबाग मतदारसंघात धुसफूस; स्थानिक नेते, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 23:37 IST

युती, आघाडीच्या उमेदवारांचा लागणार कस

- जयंत धुळपलोकसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर होताच रविवारी आचारसंहिताही लागू झाली. रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्वच राजकीय पक्ष सोमवारपासून निवडणुकीकरिता सज्ज झाले असले, तरी प्रमुख लढत विद्यमान खासदार युतीचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप या आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्यामध्ये होणार हे स्पष्ट आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अलिबाग विधानसभा मतदारसंघात ‘आघाडी’ आणि ‘युती’मधील अंतर्गत धुसफूस पेटण्याआधीच विझवण्याचे काम दोन्ही उमेदवारांना करावे लागणार आहे.शेकापची साथ तटकरेंसाठी जमेची बाजूमागच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विरोधात असलेला शेकाप यावेळी तटकरे यांच्या सोबत आहे. रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापची सत्ता, अलिबाग पंचायत समितीत आणि अलिबाग नगरपालिका यामध्ये शेकापची सत्ता, तालुक्यांतील बहुतांश ग्रामपंचायती शेकापच्या ताब्यात तर रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक देखील शेकापच्या ताब्यात आहे. अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघातील शेकापचे आमदार पंडित पाटील यांचा पाठिंबाही तटकरेंसाठी मोठी जमेची बाजू आहे.जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचे आघाडीचा धर्म निभावण्याचे आदेशअलिबागमधील काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या गटाची नाराजी तटकरे यांना दूर करावी लागेल अशी अपेक्षा काँग्रेसजनांची आहे. दरम्यान, शुक्रवारी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माणिक जगताप यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथील काँग्रेस भुवनमध्ये घेतलेल्या पक्षाच्या सभेत, आघाडीबाबत पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला असून काँग्रेसला आघाडीचाच धर्म निभावावा लागेल, हे ठणकावून सांगितले. या निर्णयास बैठकीत समर्थनही मिळाले आहे. त्यामुळे काँग्रेसचे माजी आमदार ठाकूर वेगळी चूल मांडणार नाहीत, मात्र तटकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधावा, अशी अपेक्षा काँग्रेसजनांची आहे.विरोधी भूमिकांमुळे संभ्रमशिवसेना-भाजपा युतीचे विद्यमान खासदार, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या गेल्या पाच वर्षांतील कार्यप्रणालीबाबत अलिबाग विधानसभा मतदारसंघातील भाजपामध्ये नाराजी सातत्याने ऐकायला मिळते. येथे भाजपाला विश्वासात घेतले जात नाही अशी तक्रार भाजपा कार्यकर्त्यांची आहे. केंद्रीय योजना ज्या प्रमाणात रायगडमध्ये येणे अपेक्षित होत्या त्या प्रमाणात त्या आल्या नाहीत आणि ज्या आल्या त्यामध्ये येथील भाजपाला विचारात घेतले गेले नाही.सेना-भाजपा केवळ लोकसभा निवडणुकीच्या वेळेसच दिसते, गेल्या पाच वर्षांच्या काळात सेना-भाजपा कोणत्याही संयुक्त उपक्रमात वा कार्यक्रमात दिसून आले नाहीत. त्याचबरोबर राज्याच्या सत्तेत असताना सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील भूमिका स्वीकारणारी शिवसेना आता केवळ निवडणुकीकरिता युती करीत आहे, याचे शल्य गेली अनेक वर्षे भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना आहे. यातून भाजपामध्ये असणारी धुसफूस दूर करणे गीतेंसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा