शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे ‘विघ्न’; खड्ड्यांमुळे खडतर प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 06:33 IST

रस्ता नूतनीकरणाकडे दुर्लक्षित होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप; प्रवासी त्रस्त

माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर लोणेर ते इंदापूर दरम्यान अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच या महामार्गाच्या नूतनीकरणचे काम चालू असल्याने ठरावीक अंतरावर नवीन काँक्रीटीकरण झाले आहे; मात्र या रस्त्याला जुना रस्ता एकत्र करताना अनेक ठिकाणी रस्ता वळवण्यात आला आहे. यामुळे नुसतीच खडीची मलमपट्टी केल्याने मोठे मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे सर्व महामार्गाची दैना उडालेली दिसत आहे. गणेशोत्सवासाठी आलेल्या गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून या वळणांमुळे मोठी अडचण वाहतुकीदरम्यान येत आहे. याच बरोबर या पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक मंद गतीने सुरू असून वाहतूककोंडी होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यात ऊसरघर, कुरवडा फाटा, गारळ, तळेगाव, तिलोरे, कोशिंबळे अशा अनेक ठिकाणी अपूर्ण रस्त्यामुळे रस्ता वळवण्यात आला आहे. या ठिकाणी नुसती खडी व ग्रिडचा वापर करून मलमपट्टी केली आहे, ती पावसात टिकत नसून तिथे मोठे मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे चालकांना या ठिकाणी गाडी चालविणे अवघड झाले आहे. या ठिकाणी वारंवार खडी असल्याने दुचाकी घसरून अपघाताच्या घटना घडत आहेत.

तसेच हा महामार्ग तयार करीत असताना काही ठिकाणी भराव केल्याने जुना रस्ता पाण्याखाली येत आहे. या ठिकाणी पाऊस आला की पाणी साचत आहे, निचरा होत नाही.अशा ठिकाणी कोणतीही चारचाकी गाडी गेली असता जवळच दुचाकीस्वार आला तर त्या पाण्याने त्या दुचाकीस्वाराची आंघोळ होते. या रस्त्यावरून जाताना चालकांना खूपच कसरत करावी लागत आहे.

माणगावपासून इंदापूरकडे जाताना दोन किलोमीटर अंतरावर पेण खरवली फाट्यावर महामार्गाचे काम चालू असल्याने साइडपट्टी नसल्याने त्या ठिकाणी मागील दोन महिन्यात अनेक अपघात झाले असून अनेक जणांना प्राण गमवावा लागला आहे. या ठिकाणी सूचना फलक लावण्याची गरज असून तशी मागणी होत आहे.

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जिकिरीचा१) पेण : मुंबई-गोवा महामार्गावर गेला आठवडाभर मुसळधार पाऊस पडतो आहे. अवजड वाहतुकीमुळे महामार्गावर वडखळ नाका ते पेण भोगावती पुलापर्यंत ७ किमी पट्टा खड्डेमय झाला आहे. ठेकेदार कंपनीने अंतोरा फाटा ते रामवाडी पुलापर्यंत खड्डे बुजविण्याचे काम सतत करावे लागत असल्याने या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविले आहेत. मात्र खड्डे जागोजागी असल्याने ही तात्पुरती मलमपट्टी ठरत आहे.

२) रामवाडी विभागीय बस स्थानकात रात्री येणाऱ्या कोकणातील एसटी बसेना या खड्ड्यातून प्रवास करावा लागतो आहे. यावर्षी जास्तीत जास्त कोकणातील चाकरमानी रेल्वेनेच परतीचा प्रवासाला पसंती देऊन मुंबईकडे जाताना दिसतात.

३)महामार्गावर दुपारी ४ ते सायंकाळी ७.३० पर्यंत थोडीफार वाहतूककोंडी निर्माण होते. एकंदर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडी व खड्ड्यांमुळे चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जिकिरीचा बनला आहे.वाहतूककोंडीची समस्यापोलादपूर : महामार्गवर शेकडो एसटी बसेससह हजारो लहान चारचाकी गाड्या आल्याने पोलादपूर बसस्थानाक परिसर महाड, माणगांव, इंदापूर, वडखळ आदी ठिकाणी वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे त्यातच अनेक ठिकाणी खड्डेमय मार्ग असल्याने वाहनाचा वेग मंदावत आहे. या कोंडीचा प्रवाशांना त्रास होत असून पावसामुळे प्रवासातील अडचणी वाढल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :Potholeखड्डेhighwayमहामार्ग