शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

महामार्गावर वाढलेल्या झाडीमुळे अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 3:32 AM

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणच्या प्रवासाला निघतील.

दासगाव : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणच्या प्रवासाला निघतील. शासन गणेशोत्सवासाठी सज्ज असल्याचा दावा करीत असला, तरी हा दावा महाड परिसरात फोल ठरताना दिसत आहे. महाडमधून जाणाºया मुंबई-गोवा महामार्गालगत दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. यामुळे महामार्गाची साइडपट्टी दिसत आहे. तर दासगाव, वहूर, टोळ, वीर परिसरात साइडपट्टीवरील टाकण्यात आलेली अनावश्यक खडी, दगडे अपघातांना निमंत्रण देणारे ठरण्याची शक्यता आहे. महामार्गाच्या या प्रश्नाकडे महामार्ग पोलीस आणि महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.कोकणवासीयांसाठी शिमगा आणि गणेशोत्सव या दोन सणाला अधिक महत्त्व आहे. चाकरमानी जगाच्या कोणत्याही कोपºयात असला, तरी गावातील या दोन सणांसाठी गावाकडे परत येतो. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठी गर्दी झालेली पाहावयास मिळते. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे, आठ ते दहा तासांची वाहतूककोंडी, अपघाताची भीती, आबालवृद्धांना होणारा त्रास, अशी अनेक संकटे पार करत चाकरमानी कोकणात पोहोचतोच. महाड तालुका हद्दीतून सुमारे २५ कि.मी.चा मुंबई-गोवा महामार्ग जातो. या महामार्गाचा आढावा घेतला असता, मुळातच हा महामार्ग अरुंद आहे. औद्योगिक वसाहत आणि स्थानिक पातळीवरील वाहनांची संख्यादेखील अधिक आहे.गणेशोत्सवासाठीच्या वाहनांची संख्या या महामार्गावर वाढल्यानंतर वाहतूककोंडी होणार हे निश्चित आहे. त्यामुळे इतर भागांप्रमाणे या महामार्ग परिसरात लक्ष घालणे गरजेचे आहे. असे असतानादेखील महामार्गाच्या साइडपट्टीवरील वाहतुकीला अडथळा ठरलेली झाडी-झुडपे अद्याप काढलेली नाहीत. यामुळे या झाडी-झुडपांचा वाहतुकीला त्रास होत आहे. त्याचप्रमाणे या झाडी-झुडपांमुळे साइडपट्टी देखील बेपत्ता झाली आहे. साइडपट्टी दिसून न आल्यामुळे वाहनचालकांना गाड्या थांबविण्यासाठी जागा मिळणे कठीण झाले आहे.>वाहतूक वळवण्याकडे प्रशासनाचा कलगेली दोन दशके मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. १० वर्षांपूर्वीपर्यंत मुंबई-गोवा महामार्ग अरुंद आणि खड्ड्यांनी भरलेला होता, तर नजीकच्या काळात चौपदरीकरणामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पुरती वाट लागली आहे. रस्ता रुंद झाला असला, तरी रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण देखील वाढले आहे.पनवेल ते इंदापूरदरम्यान रस्ता शिल्लकच नाही, अशी अवस्था आहे. महाड-पोलादपूर मार्ग कोकणात जाणारा हा मुंबई-गोवा महामार्ग जवळचा असूनदेखील गणेशोत्सव आणि शिमगा उत्सवकाळात प्रशासन तळकोकणात जाणारी वाहतूक पुणेमार्गे कराड, चिपळूण-आंबोली घाटमार्ग रत्नागिरी वळवण्याकडे सर्वाधिक कल आहे.हा मार्ग चांगला असला तरी प्रवास वाढतो आणि घाटदेखील वाढत आहे. महाड-पोलादपूर मार्गे जाणाºया रस्त्यावर सुविधा देण्याऐवजी प्रशासन उत्सवकाळातील वाहतूक घाटमार्गे वळवण्यात मग्न आहे. मात्र, यामुळे चाकरमान्यांना आपल्या गावी जाण्यासाठी वेळही जास्त लागतो तर वाढलेल्या अंतरामुळे खिशाला चापही बसत आहे.वीर, टोल, दासगाव, वहूर या परिसरांत अनेक ठिकाणी महामार्गाच्या साइडपट्टीवर वाळू उत्खननातून निघालेली टाकाऊ खडी (रेजगा) टाकून देण्यात आला आहे. हा रेजगा कोणत्याही परिस्थितीमध्ये गच्च बसणारा नाही. यामुळे अपघातजन्य परिस्थिती निर्माण होते.रेजगा टाकलेला खड्डा अगर साइडपट्टी लांबून दिसताना समतल दिसला तरी गाडीचे चाक जेव्हा या ठिकाणी जाते, त्या वेळी हा रेजगा बाजूला होऊन चाक पूर्ण खड्ड्यात जाते. छोटी चारचाकी वाहने अशी परिस्थिती अनियंत्रित होऊ शकतात.तर दुचाकी वाहन अपघातग्रस्त होण्याची शक्यता पूर्ण असते. यामुळे साइडपट्टीवरून रेजगा हलवणे गरजेचे आहे. अपघाताला निमंत्रण देणाºया या साइडपट्टीवरील रेजग्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.>महामार्गालगत गवताचे प्रमाण आहे. त्याचप्रमाणे साइडपट्टीवर टाकाऊ खडी (रेजगा) पडलेली आहे. गणपती सणासाठी कोकणात जाणाºया चाकरमान्यांच्या वाहनांना अडचण निर्माण होऊ नये. यासाठी हे अडथळे दोन दिवसांत दूर करण्यासाठी महामार्ग बांधकाम विभागाला लेखी पत्राद्वारे कळविण्यात येईल.- एस. एम. ठाकूर, पोलीस निरीक्षक,वाहतूक शाखा महामार्ग महाड केंद्र