शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

केमिकल झोन असूनही महाड औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेचे पुन्हा वाभाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 11:47 IST

कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ गर्दी, गोंधळ आणि माहिती दडविण्याचे उद्योग

सिकंदर अनवारेलोकमत न्यूज नेटवर्क महाड : कारखान्यातील स्फोटाची माहिती समजताच अनेक कामगारांचे नातलग कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ जमले. पण कामावर किती जण होते, त्यातील किती बाहेर पडू शकले, किती जणांवर उपचार सुरू आहेत, बाकीचे सर्व सुरक्षित आहेत का, याबाबत काहीही माहिती मिळत नव्हती. त्यामुळे नातलग संतापले होते. घाबरलेल्या काही नातलगांनी रडारड, आक्रोश सुरू केला. सायंकाळपर्यंत ११ जणांचा शोध न लागल्याने त्यांच्या भावनांचा बांध फुटला. 

महाडच्या औद्योगिक वसाहतीत रासायनिक कारखाने आहेत. तेथे वारंवार दुर्घटना घडतात. मात्र सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना नाहीत. एमआयडीसीचे अधिकारी त्याकडे लक्ष देत नाहीत. कंंत्राटी कामगारांना कोणतेही संरक्षण नसते. दुर्घटनेनंतर काही रक्कम देऊन त्यांची बोळवण केली जाते. सुरक्षेच्या उपाययोजनाही पुरेशा नाहीत. त्याचे प्रत्यंतर शुक्रवारच्या दुर्घटनेनंतरही आले. 

कंपनीचे अधिकारी नीट माहिती देत नसल्याचा त्यांचा आरोप होता. सुरुवातीला ११ कामगारांचा शोध लागला नाही, तरी ते आत अडकले असावेत असाच नातलगांचा समज होता. मात्र नंतरही त्यांच्याबद्दल कोणीच काही सांगत नव्हते. विरल आणि अॅक्वाफर्म या शेजारच्या कारखान्यातील कामगारांनी लगेचच आग विझवण्यासाठी धावपळ सुरू केली. आग लागल्यानंतर सुमारे तासानंतर पोलिस हजर झाले. तोपर्यंत कोणताही सरकारी अधिकारी घटनास्थळी नव्हता. कंपनीकडे आरोग्यपथकही उपलब्ध नव्हते. सायंकाळी चारनंतर प्रशासनातील प्रमुख अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या हलगर्जीवर नातलगांनी संताप व्यक्त केला आहे.

रसायनांची माहितीच नाही!ज्या कारखान्यात आग लागली, तेथे नेमकी कोणती रसायने होती, याची माहिती कोणालाच नव्हती. रसायनांचे ज्ञान असलेले विशेष पथकही घटनास्थळी पोहोचले नव्हते. त्यामुळे आग विझवताना अडचणी येत होत्या. घातक रसायनांबाबतची माहिती दडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप होता.

एनडीआरएफच्या पथकावर भिस्तबेपत्ता कामगारांच्या शोधासाठी पुण्याहून बोलावलेले एनडीआरएफचे पथक रात्री दाखल होण्याची शक्यता आहे. काऱखान्यात बरीच रसायने असल्याने त्यांची माहिती हे पथक घेईल. त्यासाठी त्यांच्यासोबत रासायनिक तज्ज्ञ असतील. तसेच कंपनीचा काही भाग आग आणि स्फोटानंतर झुकला आहे. तपासकामादरम्यान तो कोसळला, तर मदतीत अडथळे येऊ शकतात. त्यामुळे एनडीआरएफचे पथक दाखल झाल्यानंतरच तपासकामाला वेग येण्याची चिन्हे आहेत.  

स्फोट झाला, तेव्हा कारखान्यात १४ कामगार काम करत होते. जखमींना तत्काळ उपचारासाठी हलवण्यात आले. इतर कामगारांचा शोध सुरू आहे. स्फोटानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.- शैलेश जोशी, कारखाना अभियंता

मल्लक दुर्घटनेची आठवण९ फेब्रुवारीला महाड एमआयडीसीतील मल्लक कंपनी अशाच आगीत खाक झाली होती. यात १३ कामगार जखमी झाले होते. या स्फोटाची तीव्रता  इतकी भयानक होती की, आठ किमीचा परिसराला हादरला होता. इमारतीचे तुकडे आणि कारखान्यातील लोखंडी तुकडेही दोन किमी अंतरापर्यंत जाऊन पडले होते. पिग्मेन्ट रंगाची निर्मिती करणारा हा कारखाना होता.

 

टॅग्स :fireआगRaigadरायगड