शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

रायगड जिल्ह्यात कोट्यवधींचा खर्च करूनही पाणी योजना अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 07:03 IST

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात २०१७ - १८ या वर्षात २५९ योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ५१ योजना या अद्याप अपूर्णच आहेत.

- अमुलकुमार जैनबोर्लीमांडला : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात २०१७ - १८ या वर्षात २५९ योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ५१ योजना या अद्याप अपूर्णच आहेत.अपूर्ण असलेल्या योजनांपैकी ३१ योजनांची कामे अजूनही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे यंदा उन्हाळा हा कोरडा राहणार आहे. या योजनेतील तीनविरा, रेवस, उमटे, खंडाळा, ममदापूर आदी योजनेसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला असून, त्यापैकी काही देयके ठेकेदाराला देण्यातही आलेलीआहेत. मात्र, योजनेचा कालावधी उलटूनही ती अद्याप अपूर्णावस्थेत आहे.रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील नागरिकांना सध्या भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील पाणीप्रश्न सुटावा, म्हणून शासनाने राष्ट्रीय पेयजल कार्यक्र मांतर्गत योजना कार्यान्वित केल्या आहेत. यापैकी काही योजना पूर्ण झाल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येत असला, तरी त्यातील काही योजनांमधून अद्याप पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. मात्र, ठेकेदाराला देयके मिळाल्याने काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे बंदावस्थेतील पाणी योजना कधी पूर्ण होणार? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे.अलिबाग तालुक्यातील उमटे धरणावरील जलशुद्धीकरण प्रकल्प, तीनविरा जलशुद्धीकरण प्रकल्प, रेवस ग्रामीण पाणी योजना, नेरळ येथील ममदापूर येथील पाणी योजना या प्रमुख पाणी योजनांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प योजना राबविण्यात आली असली, तरी या योजना कार्यान्वित झाल्या नसल्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.जिल्ह्यात अपूर्ण असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना पूर्ण करण्यासाठी ६० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. याबाबत शासनाकडून एक ते दोन कोटींचा निधी प्राप्त होत आहे. त्यामुळे योजना पूर्ण करण्यास निधीची कमतरता भासत असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी यांचे म्हणणे आहे.उमटे धरणावरील जलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी तर तीनविरा धरणावरील अपुऱ्या कामाबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी आवाज उठविल्यानंतर काम सुरू करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे काम तालुकास्तरावर सुरू आहे. मात्र, योजना सुरू होऊनही अनेक ठिकाणी त्या अपुºया राहिलेल्या आहेत.६० कोटींच्या तरतुदीची गरजच्रायगड जिल्ह्यातील २९५ पेयजल योजना कार्यान्वित करण्यासाठी १५ कोटी ९० लाख १५ हजारांचा निधी प्राप्त झाला आहे.च्यापैकी १३ कोटी २३ लाख ३७ हजार रुपयांचा निधी योजनांवर खर्च करण्यात आला आहे.च्मात्र, जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना पूर्ण करण्यासाठी अजूनही ६० कोटींची तरतूद करावी लागणार आहे, असे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता वेंगुर्लेकर यांनी सांगितले आहे.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील प्रगतिपथावर असलेल्या काही योजनांची कामे बंद असतील तरीही ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. निधीची कमतरता असूनही काम झालेल्या योजनेचे काम पाहून निधी वितरित करण्यात येईल.- अदिती तटकरे, अध्यक्षा,रायगड जिल्हा परिषद

टॅग्स :Raigadरायगडwater scarcityपाणी टंचाई