शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात कोट्यवधींचा खर्च करूनही पाणी योजना अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 07:03 IST

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात २०१७ - १८ या वर्षात २५९ योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ५१ योजना या अद्याप अपूर्णच आहेत.

- अमुलकुमार जैनबोर्लीमांडला : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात २०१७ - १८ या वर्षात २५९ योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ५१ योजना या अद्याप अपूर्णच आहेत.अपूर्ण असलेल्या योजनांपैकी ३१ योजनांची कामे अजूनही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे यंदा उन्हाळा हा कोरडा राहणार आहे. या योजनेतील तीनविरा, रेवस, उमटे, खंडाळा, ममदापूर आदी योजनेसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला असून, त्यापैकी काही देयके ठेकेदाराला देण्यातही आलेलीआहेत. मात्र, योजनेचा कालावधी उलटूनही ती अद्याप अपूर्णावस्थेत आहे.रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील नागरिकांना सध्या भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील पाणीप्रश्न सुटावा, म्हणून शासनाने राष्ट्रीय पेयजल कार्यक्र मांतर्गत योजना कार्यान्वित केल्या आहेत. यापैकी काही योजना पूर्ण झाल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येत असला, तरी त्यातील काही योजनांमधून अद्याप पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. मात्र, ठेकेदाराला देयके मिळाल्याने काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे बंदावस्थेतील पाणी योजना कधी पूर्ण होणार? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे.अलिबाग तालुक्यातील उमटे धरणावरील जलशुद्धीकरण प्रकल्प, तीनविरा जलशुद्धीकरण प्रकल्प, रेवस ग्रामीण पाणी योजना, नेरळ येथील ममदापूर येथील पाणी योजना या प्रमुख पाणी योजनांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प योजना राबविण्यात आली असली, तरी या योजना कार्यान्वित झाल्या नसल्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.जिल्ह्यात अपूर्ण असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना पूर्ण करण्यासाठी ६० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. याबाबत शासनाकडून एक ते दोन कोटींचा निधी प्राप्त होत आहे. त्यामुळे योजना पूर्ण करण्यास निधीची कमतरता भासत असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी यांचे म्हणणे आहे.उमटे धरणावरील जलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी तर तीनविरा धरणावरील अपुऱ्या कामाबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी आवाज उठविल्यानंतर काम सुरू करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे काम तालुकास्तरावर सुरू आहे. मात्र, योजना सुरू होऊनही अनेक ठिकाणी त्या अपुºया राहिलेल्या आहेत.६० कोटींच्या तरतुदीची गरजच्रायगड जिल्ह्यातील २९५ पेयजल योजना कार्यान्वित करण्यासाठी १५ कोटी ९० लाख १५ हजारांचा निधी प्राप्त झाला आहे.च्यापैकी १३ कोटी २३ लाख ३७ हजार रुपयांचा निधी योजनांवर खर्च करण्यात आला आहे.च्मात्र, जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना पूर्ण करण्यासाठी अजूनही ६० कोटींची तरतूद करावी लागणार आहे, असे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता वेंगुर्लेकर यांनी सांगितले आहे.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील प्रगतिपथावर असलेल्या काही योजनांची कामे बंद असतील तरीही ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. निधीची कमतरता असूनही काम झालेल्या योजनेचे काम पाहून निधी वितरित करण्यात येईल.- अदिती तटकरे, अध्यक्षा,रायगड जिल्हा परिषद

टॅग्स :Raigadरायगडwater scarcityपाणी टंचाई