शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

बंधाऱ्याच्या दुरवस्थेमुळे धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 12:31 AM

महाड तालुक्यातील बिरवाडीजवळ असलेल्या खरवली येथील कोल्हापूर बंधाºयावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे.

- सिकंदर अनवारे दासगाव : महाड तालुक्यातील बिरवाडीजवळ असलेल्या खरवली येथील कोल्हापूर बंधाºयावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. बंधाºयावरील मार्गावर खड्डे पडले असून ऐन पावसाळ्यात पुराचे पाणी गेल्याने बंधाºयाचे नुकसान झाले आहे. या बंधाºयाच्या एका बाजूचा माती भराव मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असला तरी लघू पाटबंधारे विभागाने या मार्गावरील वाहतूक सुरूच ठेवली आहे.कोल्हापूर पद्धतीने बांधलेल्या या बंधाºयावरून खरवली आणि बिरवाडी या दोन्ही गावांतील ग्रामस्थ ये-जा करतात. खरवली आणि बिरवाडीमध्ये असलेल्या शाळांमधील विद्यार्थीदेखील या मार्गाचा वापर करतात. बंधाºयावरील मार्ग अत्यंत खराब आणि खाचखळग्यांचा झाला आहे. ज्या नदीवर हा बंधारा बांधला आहे त्या काळ नदीचे पात्र आणि पाण्याचा प्रवाह ऐन पावसाळ्यात रौद्र रूप धारण करून असतो. प्रचंड आवाज करीत पाण्याचा प्रवाह येथून सावित्री नदीला मिळतो. अनेकवेळा या बंधाºयावरूनदेखील पाणी जाते. अशा वेळी हा मार्ग बंद होतो. काही दिवसांपूर्वी या बंधाºयावरून पाणी गेल्याने मोठे वृक्ष यावर आदळले गेले आहेत. काही वृक्ष या ठिकाणी अडकले आहेत. यामुळे हा बंधारा धोकादायक बनला आहे. या बंधाºयावरून यापूर्वीच अवजड वाहतूक बंद केली आहे. मात्र तरीदेखील अनेक वेळा मोठी वाहने यावरून ये-जा करीत असतात. येथील लघू पाटबंधारे विभागाचे सुरक्षा विभाग कार्यालयदेखील बंद आहे. त्याचीदेखील मोडतोड झाली आहे. बंधाºयाच्या एका बाजूचा माती भरावदेखील वाहून गेला आहे. यामुळे हा मार्ग बंद करणे गरजेचे असतानादेखील याकडे संबंधित विभागाने कानाडोळा केला आहे. यामुळे ये-जा करणारे विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.बिरवाडी गावाजवळ काळ नदीवर कोल्हापूर पद्धतीने सन १९७६ रोजी बंधारा बांधण्यात आला होता. या बंधाºयामुळे बिरवाडी आणि परिसरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. या बंधाºयातील पाणीसाठ्यापैकी काही भाग सिंचनाकरितादेखील राखीव आहे. महाड औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांनादेखील याच पाण्याचा वापर करता येतो. १.६९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा यामध्ये होत असून ४.५६ हेक्टर क्षेत्र बुडीत गेले आहे. प्रतिवर्षी सिंचन आणि पाणीपुरवठा यातून लघू पाटबंधारे विभागाला किमान ६० लाख रुपयांचे उत्पन्न होत असले तरी या बंधाºयाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. लोखंडी प्लेट्स आणि मजबुतीकरण याकरिता सन २०१४ मध्ये लाखो रुपये खर्च करण्यात आले, मात्र या बंधाºयावरील मार्गाची दुरुस्ती करण्यात आली नाही.>मागच्या दोन वर्षांत धरणाच्या वरच्या बाजूला काँक्रिटची दुरुस्ती आणि खालील स्टील काँक्रिटची दुरुस्ती याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मान्यता मिळत नसल्याने ते काम थांबले आहे. या वर्षी वरचे काँक्रिट दोन्ही ठिकाणी वाहून गेल्यामुळे दुरुस्तीसाठी वरील कार्यालयाकडे अंदाजपत्रक पाठविण्यात आले आहे. मान्यता मिळताच काम केले जाईल.- प्रकाश पोळ,शाखा अभियंता, लघू पाटबंधारे विभाग