शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलादपूरमध्ये ८६ लाख १६ हजारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 23:45 IST

चार हजार ९१ शेतकऱ्यांना फटका; बँक खाते क्रमांक जमा करण्याचे तहसीलदारांचे आवाहन

- प्रकाश कदम

पोलादपूर : पोलादपूर परतीच्या पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. तालुक्यात शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून, चार हजार ९१ शेतकऱ्यांचे सुमारे १२६७.२० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या पोटी ८६ लाख १६ हजार ९६० रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील दोन ते तीन वर्षांतील धान्य पीक नुकसानीची रक्कम प्रशासनाकडून थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याने शेतकºयांनी आपले बँक खाते व सहमती पत्र तलाठी सजा तहसील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन तहसीलदार दीप्ती देसाई यांनी केले आहे.

आॅक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने शेतकºयांचे अतोनात नुकसान केले. हाती आलेले पीक वाया गेले असून भविष्यात सुक्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम राहिल्याने शेतकºयांना मदत कधी व केव्हा मिळणार, असा प्रश्न शेतकºयांकडून विचारण्यात येत आहे.

तालुक्यातील बाधित झालेल्या शेतीची पाहणी तहसील कार्यालयामधील महसूल अधिकारी, तलाठी, कृषी विभाग, ग्रामसेवक यांच्या वतीने करण्यात आले आहे. तालुक्यात पिकाखालील तीन हजार ७०३.६८ हेक्टर क्षेत्र असून, शेतकºयांची संख्या चार हजार ९१ इतकी आहे. या सर्व शेतकºयांचे पंचनामे पूर्ण झाले असून, बाधित झालेले क्षेत्र १२६७.२० हेक्टर असून सुमारे ८६ लाख १६ हजार ९६० रुपयांचे नुकसान झाले आहे.

कापणी झाल्यावर पिकाचे नुकसान झालेल्या शेतकºयांची संख्या ६४३ असून २६०.९० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तर उभ्या पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. तीन हजार ४५७ शेतकºयांचे सुमारे १००६.३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

113 शेतकºयांचे १०१.१२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पोलादपूर तालुक्यात ३७७० सरासरी पाऊस पडत असतो. मात्र, यंदा सुमारे ५९०२ पावसाची नवीन विक्रमी नोंद झाली आहे. आॅक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने शेतकºयांना मोठा फटका बसला असून शेतात पाणी साचल्याने पीक कुजले. तालुक्यात पीक विमा संरक्षित शेतकºयांची संख्या तुरळक आहे.

धान्य पीक नुकसानभरपाई रक्कम प्रशासनाकडून तहसील कार्यालयद्वारा थेट शेतकºयाच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासाठी शेतकºयांनी बँक खाते क्रमांक व सहमती पत्र जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापोटी २०१७-१८ वर्षासाठी नुकसानभरपाईसाठी सुमारे ३२ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.
- दीप्ती देसाई, तहसीलदार, पोलादपूर