शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

पावसामुळे नुकसान : माणगावमध्ये ४४१२ शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 12:56 AM

पावसामुळे नुकसान : बळीराजा सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत

माणगाव : अवेळी झालेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीबाबतचे माणगाव तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती तहसीलदार माणगाव व कृषिविभागाकडून दिली आहे. तालुक्यातील बाधित एकूण संख्या १८७ आहे तर पंचनामे झालेली पूर्ण गावसंख्या १६७ आहे. एकूण पिकाखालील क्षेत्र १२२५० हेक्टर असून हे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेले शेतकरी संख्या ४४१२ व एकूण क्षेत्र १३५०.०६ हेक्टर असून पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.

पंचनामे पूर्ण क्षेत्रापैकी कापणी पश्चात पिकांचे नुकसान ग्रस्त शेतकरी संख्या २७४ व ८७.५० हेक्टर क्षेत्र तसेच उभ्या पिकांचे नुकसान ग्रस्त शेतकरी संख्या ४१३८ व एकूण क्षेत्र ११४२.५६ हेक्टर आहे. पंचनामे पूर्ण क्षेत्रापैकी विमा संरक्षित संख्या २१ व त्यांचे क्षेत्र ४.२० हेक्टर आहे. तसेच १६७ गावे व उर्वरित गावांचे पंचनामे प्रगतीपथावर असून बाधित क्षेत्र व खातेदार संख्या वाढणार अशी माहिती देण्यात आली.तालुक्यातील बहुतांश सर्व शेतकºयांचा मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय आहे. यावर त्यांच्या कु टुंबाचा उदरनिवाह होतो; मात्र परती पाऊस आणि क्यार, महा या सारख्या चक्रीवादळामुळे होणार अवकाळी पाऊस यामुळे कापणीला आलेले भात पीक नष्ट झाले आहे. यामुळे शेतकºयाची महेनतच पाण्यात गेली आहे. शासनाने महसूल विभागाकडून पंचनामेची कामे प्रगती पथावर चालू असून यावेळी प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसीलदार प्रियांका आयरे व तालुका कृषि अधिकारी पी.बी. नवले यांनी भादाव गावात जाऊन संयुक्त पाहणी केली.तालुका कृषि अधिकाºयांनी शेतकºयांनी सध्या शेतीच्या अंगवलीवरती हरभरा , मूग , मटकी , चवळी , पावटा, वाल अशा द्विदल धान्याची लागवड करावी. सध्याची शेतीची जागा उशिरा राहिलेल्या पावसाने ओली रहाणार आहे कडधान्य शेतकºयाने पेरल्यास चांगले पीक घेता येईल असे सांगितले.मुरूडच्या ११७० हेक्टरला फटका1आगरदांडा : राज्यात आवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकºयांच्या तोंडाशी आलेला घास हिसकून घेतला आहे. या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी यंत्रणेला पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने मुरुड तहसीलदार गमन गावीत यांनी गेले चार दिवस स्व:त तलाठी, मंडळ अधिकारी, तालुका कुषिअधिकारी सुरज नामदास यांच्या समवेत तालुक्यातील प्रत्येक गावातील २९५६ शेतबांधावर ११७० हेक्टर शेतीची पाहणी करून पंचनामे के ले आहे. ८० लाखा पेक्षा जास्त नुकसान झाले असून या शेतकºयांना लवकरात लवकर भरपाई देण्यात येईल असे तहसीलदार गावीत यांनी सांगितले.2मुरुड तालुक्यात ४५०० मिलीमीटर एवढा पाऊस त्याचप्रमाणे अवकाळी पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान केले होते. शेतात भाताच्या लोंबी तयार झाल्या होत्या परंतु अवकाळी पावसामुळे आलेले भात पीक शेत जमिनीत गाडले गेल्याने आलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते.3भात पिकांबरोबरच सुपारी व इतर कडधान्य पिकांना सुद्धा अवकाळी पावसाने नुकसानीची झळ सोसावी लागली होती. याबाबत मुरुड तहसीलदारांनी यांनी तातडीने पंचनामे करण्यास सुरू वात के ली आहे. मुरुड तालुक्यात काही शेतकºयांच्या ९ ते १० एकर क्षेत्राच्या मोठ्या भात पीक लागवडीच्या जमिनी असून अवकाळी पावसामुळे सर्वच गमावल्यामुळे आता शेतकºयांच्या नजरा शासनाच्या मदतीकडे लागल्या आहेत. 

टॅग्स :Raigadरायगड