शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

Cyclone Tauktae : रायगड जिल्ह्यातील 661 गावे अंधारात, पाच हजार हेक्टरवरील पीक जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 7:03 PM

Cyclone Tauktae : सुमारे पाच हजार हेक्टरवरील आंबा, नारळ आणि भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे12 विद्युत जनित्र कोलमडून पडल्याने जिल्ह्यातील 661 गावांमध्ये अंधार असल्याने एक लाख सहा हजार नागरिक प्रभावित झाले आहेत.

रायगड : तौक्ते वादळामुळे जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, म्हसळा आणि पोलादपूर तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. विजेच्या खांबाची हानी झाल्याने अद्यापही 661 गावे अंधरात आहेत. सुमारे पाच हजार हेक्टरवरील आंबा, नारळ आणि भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ही प्राथमिक माहिती असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नुकसानी आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

तौक्ते चक्रीवादळाने सोमवारी जिल्ह्यात थैमान घालत ते सायंकाळी गुजरात राज्याकडे सरकले. तत्पूर्वी वादळामुळे जिल्ह्यात विविध स्तरावर हानी झाली आहे. वादळामुळे जिल्ह्यातील चार नागरिकांचा जीव गेला आहे, तर सात नागरिक जखमी झाले. 6026 घरांची अंशता पडझड झाली, तर 10 घरे पूर्णतः उध्वस्त झाली. 168 उच्च दाब खांबाचे तर 426 कमी दाबाच्या खांबाचे नुकसान झाले. 12 विद्युत जनित्र कोलमडून पडल्याने जिल्ह्यातील 661 गावांमध्ये अंधार असल्याने एक लाख सहा हजार नागरिक प्रभावित झाले आहेत.

या कालावधीत मासेमारी नौकांना समुद्रामध्ये मासेमारी करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे बहुतांश नौका या किनारी होत्या. वादळामुळे 10 बोटींचे तर 12 मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाले आहे.गेल्या तीन दिवसांमध्ये पडलेल्या पावसामुळे फळ झांडाचे कमी परंतू फळांचे नुकसान झाल्याने बागायतदार हवालदील झाले आहेत.

नुकसानीचे पंचनामे सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे किती रुपयांचे नुकसान झाले हे पंचनामे पूर्ण झाल्यावरच कळणार आहे, असे चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, पंचनामे करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :cycloneचक्रीवादळTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळRaigadरायगड