शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

ढगाळ वातावरणाने शेतकरी धास्तावले; कडधान्य पिकावर परिणाम होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 2:04 AM

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सध्या सफेद कांदा, वाल, चवळी, घेवडा, कलिंगड, नाचणी, वरी, चिबुड, पडवळ, मेथी, कोथिंबीर आदीची लागवड केली आहे.

मुरुड : तालुक्यात मंगळवारपासून ढगाळ वातावरण झाल्याने स्थानिक शेतकरी धास्तावले आहेत. कडधान्य घेणाऱ्या पिकावर संक्रात तर येणार नाही ना, या चिंतेत येथील शेतकरी आहेत. नुकताच अवकाळी पाऊस येऊन गेला; त्यामुळे प्रचंड प्रमाणात भातशेतीचे व बागायत जमिनीचे नुकसान झाले होते. त्यातच मागील तीन दिवसांपासून सूर्यदर्शन न झाल्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सध्या सफेद कांदा, वाल, चवळी, घेवडा, कलिंगड, नाचणी, वरी, चिबुड, पडवळ, मेथी, कोथिंबीर आदीची लागवड केली आहे. या पिकांना पाऊस नको असतो, कारण हिवाळ्यातील दवाच्या पाण्यावर ही पिके तयार होतात. जर का पाऊस पडला तर या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. स्थानिक शेतकरी आता पाऊस नकोच, अशी विनवणी करीत आहेत; परंतु बदललेल्या हवामानामुळे निसर्गाचे चक्र बदलत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गुरुवारी सकाळी पावसाचे थेंब बरसले; परंतु ते सौम्य स्वरूपात होते. मुरुड तालुक्यात ३९०० हेक्टर उत्पादित जमिनीपैकी २१०० हेक्टर क्षेत्रात कडधान्य पिके घेतली जातात. वातावरणातील बदलामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पाऊस न पडावा हीच अपेक्षा येथे व्यक्त होताना दिसत आहे.बागायत जमिनीत आता सुपारीच्या उत्पादनास बहर येत आहे, अशा वेळी या पिकाला पाऊस हा घातक मानला जात आहे. वातावरणात बदल झाल्याने याचा परिणाम मानवी आरोग्यवरही झालेला दिसून येत आहे. घसा खवखणे, सर्दीची लागण व सौम्य ताप याचा त्रास नागरिकांना होतआहे.पावसाने सुपारी बागायतदारांची तारांबळरेवदंडा : गेले तीन दिवस पावसाचे सावट असताना, गुरु वारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पावसाने शिडकाव केल्याने सुपारी बागायतदारांची तारांबळ उडाली. वाळत घातलेली सुपारी पहाटे अनेक जणांना उचलायला लागली.पावसाच्या शिडकावा सुरू असतानाच बत्ती गूल झाली. दिवसभर ढगाळ हवामान असून हवेत उष्मा वाढला आहे. सातत्याने बदलत चाललेल्या हवामानामुळे आंबा, काजू व सुपारी बागायतदार धास्तावले आहेत. अनेक बागायतदारांची वाळत टाकलेली सुपारी भिजली आहे.या आधी अवकाळी पाऊस तसेच क्यार आणि महा या चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस याचा फटका रायगडमधील शेतकºयांना बसला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या बदलत्या हवामानाचा परिणाम पिकावर होऊन नुकसानीची भीती वाटत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी