शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये रासायनिक गाळ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 23:17 IST

कंपन्यांचे नामांकन रद्द करण्याची मागणी : प्रदूषण नियंत्रणचे कारवाईकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कबिरवाडी : महाराष्ट्र शासनाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम सुरू केली आहे, मात्र महाड औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक सांडपाणी जमिनीत मुरवले जात असल्याचा प्रकार उघड झाला असतानाच एमआयडीसीमधील सुदर्शन केमिकल कंपनीमधील रासायनिक गाळ (स्लज) रस्त्यावर सांडल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई आणि नागरिकांच्या तक्रारी फक्त कागदावर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.एमआयडीसीतील नाले आणि गटारात कंपन्यांचे सांडपाणी सोडले जात असल्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. येथील सुदर्शन केमिकल कंपनीच्या सुरक्षा भिंतीबाहेर पाणी साचले आहे. कंपनीने हे पाणी पंपाद्वारे उचलण्याचे काम केले. मात्र हे पाणी आपले नसल्याचे ठामपणे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. येथील जलवाहिनीला असलेली गळतीही काढण्यात आली आहे. जलवाहिनीला गळती असली तरी ते पाणी स्वच्छ असते. मात्र सुदर्शन कंपनीलगत फेसाळयुक्त पांढरे पाणी दिसून येत आहे. त्यामुळे गळतीच्या पाण्यात कंपनीच्या आवारातील जीप्समचे पांढरे पाणी जमिनीत मुरून बाहेर येत असावे असा संशय व्यक्त केला जात होता. तरी कंपनीने इतरांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकली.गुरुवारील रस्त्यावर रासायनिक स्लज आढल्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे महाड कार्यालयातील उपप्रादेशिक अधिकारी सागर आवटी यांच्याशी संपर्क साधला असता, वाहतुकीदरम्यान रासायनिक स्लज रस्त्यावर सांडल्याप्रकरणी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज महाड यांच्या रासायनिक सांडपाणी प्रक्रिया विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, अशी हमी संबंधित कंपनीच्या विभागामार्फत देण्यात आल्याचे आवटी यांनी सांगतले. सुदर्शन कंपनी प्रदूषणाच्या विषयांमुळे कायम चर्चेत आहे. कंपनी प्रशासनाने एमआयडीसीकडे २०१८ मध्ये पत्रव्यवहार केल्याची माहिती कंपनी व्यवस्थापक बी.एन. कदम यांनी दिली. कंपनीलगत साचत असलेले पाणी आपले नसून या ठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्यामुळे येत असल्याचे त्यांनी सांगितले.महाड एमआयडीसीतील या परिसरात सांडपाणी वाहून नेणारी वाहिनीच नाही. त्यामुळे पांढऱ्या रंगाचे फेसाळयुक्त पाणी येण्याचा प्रश्नच येत नसल्याची प्रतिक्रिया साहाय्यक अभियंता एस. एस. गीते यांनी दिली. तर एमआयडीसीतील पाणीपुरवठा विभागाचे बी.एल. वाघमारे यांनीही या ठिकाणी पाहणी करून हे पाणी आपले नसल्याचे सांगितले. यामुळे या ठिकाणी नक्की कोणाचे पाणी मुरते, हा प्रश्न निर्माण झाला होता.एमआयडीसीतील कारखान्यांत मोठमोठे खड्डे करून रासायनिक सांडपाणी जमिनीत मुरवले जात असल्याचा प्रकार यापूर्वी नेक ग्लोबल लिमिटेड कंपनीमध्ये उघडकीस आला होता. याची गंभीर दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीविरोधात कारवाईदेखील केली; मात्र त्यानंतरही रासायनिक सांडपाणी येत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रदूषणकारी कंपन्यांचे आयएसओ नामांकन रद्द करण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे भारत सरकारच्या जीवन नागरी पर्यावरण संस्थेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीपक स्वाई यांनी स्पष्ट केले.