शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

‘क्यार’ चक्रिवादळामुळे पर्यटनाला फटका; श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 12:00 AM

दिघी किनाऱ्यावर आलेल्या मच्छीमारांना श्रीवर्धन तहसीलकडून सुविधा

गणेश प्रभाळे/संजय करडे दिघी : ‘क्यार’ या चक्रिवादळाचा तडाखा श्रीवर्धनमधील किनारपट्टीला बसला आहे. दिघी खाडीतून होणारी दिघी-आगरदांडा ही जलवाहतूक उशिरा सुरू आहे. ‘क्यार’ वादळाचा ऐन दिवाळीत श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला मोठा फटका बसला असून समुद्रकिनारी सध्या शुकशुकाट दिसत आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांना रोजगार मिळवण्यासाठी हाच कालावधी महत्त्वाचा असतो. दिवाळीमध्ये पर्यटन हळूहळू वाढू लागते. मुंबई, पुणे, साताराहून येणारे पर्यटक दिघी जंगलजेटी मार्गे फेरी बोटीने येतात. यामुळे श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर अशा विस्तीर्ण समुद्रकिनाºयाला पर्यटकांची चांगलीच पसंती राहते. सध्या ‘क्यार’ वादळाचा फटका तालुक्यातील पर्यटनाला बसला आहे. शिवाय, गुरुवारपासून दिवसा व रात्री पावसाच्या हलक्या सरी पडल्या. शनिवारी दिवसभर वातावरण ढगाळ होते. पुढे अवकाळी पावसामुळे भातशेती तसेच कडधान्ये पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या वर्षी गणेशोत्सवात झालेली अतिवृष्टी व सध्याच्या दिवाळी उत्सवात पडणाºया पावसामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.

सद्या वादळाची दिशा बदली असल्याची माहिती श्रीवर्धन प्रशासनाकडून देण्यात आली. श्रीवर्धन तालुक्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. क्यार वादळामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी घेत असल्याचे दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक शेलार यांनी सांगितले. क्यार चक्रिवादळामुळे झालेल्या हवामानातील बदलामुळे, वादळी वाºयामुळे दिघी ते आगरदांडा ही प्रवासी वाहतूक उशिरा सुरू असल्याची माहिती दिघी बंदर निरीक्षक प्रकाश गुंजाळ यांनी दिली.वादळामुळे नौका तीन दिवस दिघी बंदराच्या आश्रयाला१) खोल समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या मच्छीमारांनी गुरुवार सायंकाळी वादळापासून सुरक्षिततेसाठी श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदराच्या खाडीत आश्रय घेतला आहे. या वेळच्या बदलत्या वातावरणामुळे मासेमारी व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. यंदाची मासेमारीची सुरुवात मोठ्या कालावधीने रडतखडत सुरू झाली. आता अचानक वादळी वाºयाचे संकट आल्याने अनेक जिल्ह्यांतील मच्छीमार नौका दिघी खाडीकिनाºयालगत विसावल्या आहेत. पावसामुळे व बदलत्या हवामानामुळे समुद्रातील माशांचे प्रमाण कमी झाले असून त्यामुळे मच्छीमारी व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असल्याची भावना याप्रसंगी मच्छीमारांनी व्यक्त केली.प्रशासनाची सतर्कता

२) श्रीवर्धन तहसील व दिघी सागरी पोलीस ठाण्याकडून दिघी बंदर परिसरात मच्छीमारांची भेट घेण्यात आली. क्यार वादळामुळे व समुद्रातील संभाव्य भीतीमुळे इतर राज्ये तसेच जिल्ह्यातील मासेमारी करणाºया बोटी दिघी किनारी लागल्या असल्याने श्रीवर्धन तहसीलकडून या बोटींवरील खलाशांसाठी औषधे व टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा करण्यात आला. या वेळी दिघी बंदर येथे तहसीलदार सचिन गोसावी, दिघी सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक एम. आर. शेलार, पोलीस कर्मचारी संदीप चव्हाण, मंडळ अधिकारी सुनील मोरे, तलाठी सोरे, आरोग्यसेवक कासारे व कोतवाल गणेश महाडिक उपस्थित होते.व्यावसायिकांचा दिवाळी हंगाम गेला वायारायगड हा पर्यटनाचा जिल्हा आहे, त्यामुळे येथे पर्यटकांची वर्दळ असते, त्यात दिवाळी आणि उन्हाळी सुट्टींमध्ये मोठी गर्दी येथे असते. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय या हंगामात जोरात असतो. मात्र, क्यार वादळ आणि पाऊसाचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांची पंचायत झाली आहे.चिंता वाढलीयंदा जिल्ह्यात झालेल्या विक्रमी पावसाचा सर्वाधिक फटका हा शेतकºयांना बसला आहे. त्यात पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने चिंता वाढली आहे.

टॅग्स :Kyarr Cyclonक्यार चक्रीवादळtourismपर्यटन