शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात प्रचार शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 11:05 PM

उमेदवारांच्या पायाला लागली भिंगरी : प्रचारातील शेवटच्या रविवारी मतदार भेटीवर दिला जोर

- आविष्कार देसाईअलिबाग : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता फक्त आठ दिवस उरले आहेत, तर प्रचाराला फक्त सहा दिवसांचा अवधी शिल्लक आहे. आज प्रचारातील शेवटचा रविवार असल्याने जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारांचा चांगलाच धुरळा उडवला आहे. प्रमुख नेत्यांच्या सभांबरोबरच कॉर्नर सभा, मतदारांच्या गाठीभेटी, गावबैठका यावर प्रामुख्याने उमेदवारांसह त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चांगलेच रान पेटवले आहे. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत पायाला भिंगरी लावल्यासारखे उमेदवार आपापला मतदारसंघ पालथा घालत आहेत. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसते.

सात विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने आघाडी विरोधात युती अशीच लढत पाहावयास मिळत आहे. अपवाद फक्त उरण, अलिबाग आणि श्रीवर्धन मतदारसंघाचा आहे. उरणमध्ये शिवसेनेचे मनोहर भोईर यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी आव्हान उभे केले आहे. तर अलिबागमध्ये काँग्रेसच्या उमेदवार अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर यांच्या विरोधात त्यांचे दीर राजेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी केली आहे, तसेच श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांना काँग्रेसचे ज्ञानदेव पवार, दानेश लांबे, मोईझ शेख यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या युतीत फूट पडली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी झाली आहे. प्र ितस्पर्धी वाढल्याने या उमेदवारांना विरोधकांबरोबर लढताना आपल्याच स्वकीयांचेही व्यवस्थापन करावे लागणार असल्याने त्यांची क्रयशक्ती अधिक खर्च होत असल्याचे दिसून येते.विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने आता रंगत चढू लागली आहे.

प्रचंड उन्हातपायपीटच्सकाळी ७ वाजल्यापासून उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे पायाला भिंगरी लावल्यासारखे संपूर्ण मतदारसंघात मतदारांच्या भेटी घेत होते.च्प्रचंड उन्हाचा तडाखा असतानासुद्धा त्यांनी पायपीट केली.च्वेळ कमी असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करत असल्याचे चित्र आहे.स्थानिक पातळीवरील नेत्यांवर धुरा१नवी मुंबईमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे १६ आॅक्टोबर रोजी येणार आहेत. काहीच दिवसांपूर्वी पेण येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा पार पडली होती.२राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे दिग्गज नेते सोडले तर विविध राजकीय पक्षांचे स्थानिक पातळीवरील नेते प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.३१९ आॅक्टोबरला प्रचाराच्या तोफा थंड होणार असल्याने प्रचारातील आजचा शेवटचा रविवार असल्याने सर्वच राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी मतदारांना सुट्टीच्या दिवशी गाठण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांची भेट घेऊन निवडून देण्यासाठी आम्हालाच मत द्या, अशी विनंती मतदारांना केली.

टॅग्स :raigad-pcरायगड