शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

पुन्हा अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हुकला, लग्ने लाॅकडाऊन, जिल्ह्यात सव्वाशेपेक्षा जास्त विवाह पुढे ढकलले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 09:01 IST

मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून रीतसर परवानगी मागावी लागत आहे.

निखिल म्हात्रे -  अलिबाग : दरवर्षी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त मिळावा म्हणून आतुरतेने वाट पहात असलेले वधू-वराचे पिता यावर्षी हा मुहूर्त टाळताना दिसत आहेत. जिल्हाभरातील जवळपास सव्वाशेपेक्षा जास्त विवाह पुढे ढकलण्यात आले आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी अकय्य तृतीया हा एक महत्त्वाचा मुहूर्त आहे. या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात केली जाते. लग्न समारंभ, वास्तुपूजन, धार्मिक पूजा, नामकरण विधी, नवीन दुकानाचे उद्घाटन आदींसह विविध महत्त्वाच्या कामांची सुरुवात या दिवशी केली जाते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न सोहळ्याला प्रशासनाने वेगळी नियमावली लावली आहे. केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत व कोविडचे नियम पाळून दोन तासांच्या आत लग्नकार्य आटपावे लागत आहे. जिल्ह्यात कोविड नियमांचे पालन करून काही गावात लग्नकार्य करण्यात आली आहेत.लग्न सोहळ्यांमध्ये वधू-वर मंडळींकडून वारेमाप खर्च होत असतो. त्यामुळे आता २० माणसात लग्न सोहळे पार पडत असल्याने खर्चही कमी झाला आहे. तसेच कोरोना विषाणूचे सावट अधिक बळावत असल्याने यावर्षी कोरोनामुळे सर्वच समाजाच्या विवाह सोहळ्यांना पूर्णतः ब्रेक लागला आहे.

नियमांचा अडसर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून रीतसर परवानगी मागावी लागत आहे. वधू-वरांना तहसील कार्यालयात आवश्यक ते दस्तावेज सादर करून अर्ज करून परवानगी घ्यावी लागत आहे. यात कोणत्या गावातील किती नातेवाईक उपस्थित राहतील, याची माहिती द्यावी लागते. 

मे महिन्याच्या अखेरपर्यंत  संसर्ग कमी होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन  लाॅकडाऊन संपल्यावर जून ते जुलै महिन्यात आयोजित करण्याची तयारी दर्शविली आहे. लग्नकार्य जुळून आलेल्या संबंधित कुटुंबांना लाॅकडाऊन संपण्याची प्रतीक्षा आहे.- सुधीर पाटील, वधू पिता

 लग्न जुळल्यावर किती दिवस प्रतीक्षा करायची, असे म्हणत अनेक वधू - वर विवाह बंधनात अडकले आहेत. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत १०० वर विवाह सोहळे पार पडले आहेत. यातील बहुतांश लोकांनी मंगल कार्यालयाऐवजी घरीच हे सोहळे आटोपले आहेत.- दीपक भगत, वरपिता

कार्यालयांचे गणित बिघडले मर्यादा आल्याने मंगल कार्यालय व्यवसायावर परिणाम झाला आहे. २५ लोकांसाठी कार्यालय बुक करणे वर-वधूच्या कुटुंबीयांना परवडत नाही. घरच्या घरी विवाह कार्य पार पाडले जात आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसmarriageलग्न