शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

ग्रामीण ‘अर्थसत्ते’साठी राजकीय प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 03:40 IST

ग्रामपंचायत निवडणुका : आजी-माजी लोकप्रतिनिधी उतरले मैदानात

अलिबाग : केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी वितरीत केला जातो, त्याचप्रमाणे संबंधित ग्रामपंचायतींना विविध कररूपातूनही मोठ्या संख्येने निधी प्राप्त होत असल्याने ग्रामीण स्तरावरील अर्थकारणावर गेली काही वर्षे सर्वांचेच लक्ष केंद्रित झाले आहे. रायगड जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुका २४ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहेत. ग्रामीण भागातील ‘अर्थसत्ते’वर आपलेच वर्चस्व राहावे, यासाठी सर्वच राजकीय पक्षप्रमुखांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आपापल्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये कोणतीच कसर राहू नये, यासाठी आजी-माजी आमदार आणि आजी-माजी जिल्हा परिषद सदस्यही मैदानात उतरल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येते.

९० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी प्रत्यक्षात २२६ उमेदवार रिंगणात आहेत, तर ८४५ सदस्यपदांच्या जागेसाठी एक हजार ६३१ असे एकूण एक हजार ८५७ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. या निवडणुकीमध्ये सोयीस्कर आघाड्या आणि युत्या केल्याचे दिसत असले, तरी प्रामुख्याने शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधात शिवसेना भाजपा उभी ठाकली आहे. काही ठिकाणी तर काँग्रेसनेही शिवसेना-भाजपासोबत हातमिळवणी केल्याचे दिसून येते. त्यामुळे एके काळी पक्षनिष्ठेसाठी डोक्यावर, अंगावर दगड-काट्या घेणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज कट्टर राजकीय दुष्मनी असलेल्या राजकीय पक्षाच्या उमेदावारांना निवडून आणण्यासाठी आपल्या बाह्या सरसावून पुढे उभे ठाकल्याचे चित्र आहे.आपापसातील मतभेद विसरून ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करून तेथील अर्थकारणात भागीदारी मिळवण्याचीच ही धडपड असल्याचे त्यांच्या कृतीतून अधोरेखित होत आहे. त्यामुळे मतदारही संभ्रमात असला, तरी त्यांचा संभ्रम मतदानाच्या आदल्या दिवशी कसा दूर करावा, याची व्यूहरचना गेली काही वर्षे भारतीय राजकारणात रुजल्याचे सर्वांनाच माहिती आहे. मतदानापूर्वी मतदार राजाला खूश करण्यासाठी विविध प्रलोभनासाठी दाबून खर्च करायचा आणि निवडून आल्यावर तोच खर्च विकासकामांच्या नावाखाली वसूल करायचा ही लोकशाहीला घातक असलेली पद्धत सर्वच निवडणुकांमध्ये कमालीची रूढ झाल्याचे दिसून येते.प्रचाराला जोरदार सुरुवातच्निवडणुकीची तारीख जशी जवळ येत आहे तसा प्रचाराचा धुरळा उडत आहे. आपल्या पक्षातील अथवा आघाडी, युतीतील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे आमदार, जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीच्या रणांगणात शड्डू ठोकून उभे आहेत. उमेदवारांच्या गावबैठका, मतदार भेटी, कॉर्नर सभांवर याच नेत्यांनी भर दिला आहे. काही उमेदवारांच्या सोबत ते स्वत: हजेरी लावत आहेत. काही राजकीय नेते प्रत्यक्षात मैदानात उतरलेले नसले, तरी राजकीय रणनीती आखून ते पडद्यामागून सूत्र हलवत आहेत. त्यामुळे सर्वांचेच राजकीय डावपेच पणाला लागले आहेत.राजकीय मंडळी सज्जच्अलिबाग, पेण, कर्जत, पनवेल, उरण, श्रीवर्धन, रोहे, तळा, माणगाव, मुरुड, म्हसळा, महाड या प्रमुख तालुक्यांमध्ये निवडणुका होत असल्याने आमदार, माजी आमदार, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी कंबर कसली आहे. पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणता यावे, यासाठी जास्त वेळ मतदार संघातच घालवण्याला त्यांच्याकडून पसंती दिली जात आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या कालावधीत मतदार संघाच्या बाहेर जाणे तूर्तास टाळल्याचे बोलले जाते. 

टॅग्स :ElectionनिवडणूकalibaugअलिबागRaigadरायगड