शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

६१ ते ७० वयाेगटातील ५१४ ज्येष्ठांचा काेराेनाच्या पहिल्या लाटेत मृत्यू; रायगड प्रशासन सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2020 1:35 AM

नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना

आविष्कार देसाईरायगड : जगभरात काेराेना लाटेच्या दुसऱ्या लाटेची चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र पहिल्या लाटेनेच ६१ ते ७० वयाेगटातील तब्बल ५१४ नागरिकांचा बळी घेतला आहे. जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक ४४३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये वयाेवृद्धांच्या आराेग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे झाले आहे. 

मार्चपासून काेराेनाचा कहर जिल्ह्यात सुरू झाला. सप्टेंबरमध्ये सर्वाधिक ४४३ जणांचा मृत्यू झाला. काेराेनाचा फटका वयाेवृद्धांना अधिक बसला आहे. आकडेवारी बघता ६१ ते ७० वयाेगटातील वयाेवृद्ध नागरिक हे संसर्गाचे बळी ठरले आहेत. काही कालावधीमध्ये काेराेनावर लस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरकीडे दुसऱ्या लाटेने सर्वांच्याच चिंतेमध्ये भर घातली आहे. सरकार आणि प्रशासनाकडून विविध उपाययाेजना आखल्या आहेत. तसेच नागरिकांनी नियम पाळण्याचे आवाहन विविध पातळ्यांवरून केले जात आहे.

रायगड जिल्ह्यात पहिल्या लाटेचा प्रभाव सप्टेंबर महिन्यामध्ये तब्बल ४४३ रुग्णांचा मृत्यू झाला हाेता. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चाकरमानी माेठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल झाले हाेते. त्यामुळे काेराेनाचा प्रसार वेगाने हाेऊन जिल्ह्यामध्ये काेराेनाचे रुग्ण माेठ्या संख्येने वाढले हाेते. आता दिवाळी सणानंतर काेराेनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने सरकार आणि प्रशासन सतर्क झाले आहे.

रायगड जिल्हा मुंबई-पुण्यापासून अगदी जवळ असणारा जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक माेठ्या संख्येने कामधंद्यानिमित्त या जिल्ह्यात जातात. सणासुदीला ते रायगड जिल्ह्यात परतले हाेते. त्यामुळे काेराेनाचा फैलाव ग्रामीण भागांमध्ये चांगलाच फाेफावल्याने येथे रुग्णसंख्या वाढली हाेती. ग्रामीण भागात १,०२५ नागरिकांचा बळी घेतला. तर पालिका क्षेत्रामध्ये हाच आकडा ५७७ आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या