शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

आठ हजार अपघातात २००० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 23:19 IST

आठ वर्षांत वाढल्या दुर्घटना; नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज

- निखील म्हात्रेअलिबाग : वाहनांची सातत्याने वाढत जाणारी संख्या, विविध मार्गावरील धोकादायक वळणे, रस्त्यांची झालेली दुरवस्था, भरधाव वेगाने धावणारी वाहने यांचा एकत्रित परिणाम अपघाताला निमंत्रण ठरत आहे. जिल्ह्यात दिवसाला सरासरी तीन अपघात होत असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. जानेवारी २०१२ ते डिसेंबर २०१९ या आठ वर्षांच्या कालावधीत एकूण आठ हजार ९०८ अपघात झाले आहेत. यामध्ये दोन हजार २२६ जणांना मृत्यूने कवटाळले आहे. विविध उपाययोजना करूनही अपघात रोखण्यात म्हणावे तसे यश आले नसल्याने प्रभावी उपाय राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग हे तीन प्रमुख महामार्ग जात आहेत. याव्यतिरिक्त जिल्हाभरात विविध महामार्ग, राज्यमार्ग आणि अंतर्गत जिल्हा मार्गांचे जाळे आहे. या मार्गांवर सध्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत असल्याने अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. चालकांनी वाहन सावकाश चालवावे, यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. प्रमुख नाक्यांवर वाहतूक पोलीस वाहनचालकांची तपासणीही करण्यात येते. वाहनचालकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्यांना वाहनचालकांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. एवढे प्रयत्न करूनही अपघातांची संख्या कमी करण्यात म्हणावे तसे यश येताना दिसत नाही.काही पालक आपल्या मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांना दुचाकी घेऊन देतात. कधी-कधी काही मुलांकडे वाहन चालवण्याचा परवानाही नसतो. वाहतुकीच्या नियमांचीही माहिती नसते. त्यामुळे आजची तरुण पिढी अतिवेगाने आणि बेदरकार वाहने चालवतात, त्यामुळे त्यांचे अपघात होतात. त्याला पोलीस यंत्रणा किती पुरी पडणार, असा प्रश्न उदय भोसले या पालकांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित के ला.जमेची बाजूजानेवारी ते डिसेंबर २०१९ या वर्षात रायगड पोलीस दूरक्षेत्र हद्दीमध्ये रस्ते अपघाताच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे आश्वासक चित्र निर्माण होताना दिसत असले, तरी अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी उपाययोजना करणे गरजेचे आहे. २०१९ या वर्षात जिल्ह्यात ७१८ रस्ते अपघात झाले, त्यामध्ये १६१ जणांचा मृत्यू झाला आहे.अपघाताची प्रमुख कारणेमहामार्गांची संपूर्ण माहिती नसताना वेगाने वाहन चालविणेरस्त्यालगत इंडिकेटर न लावता थांबलेली वाहनेरस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करणेकोणतीही पूर्वकल्पना न देता वाहन दुसºया बाजूला नेणेधोकादायक वळणेमद्य पिऊन वाहन चालविणे७०% निष्काळजीपणे वाहन चालविणे8% पादचाऱ्यांचा निष्काळजीपणा7% रस्त्याची सदोष बांधणी6% खड्डे9% अन्य कारणेअपघात कमी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून विविध उपाययोजना, जनजागृती करण्यात येत आहे; परंतु वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. अपघातांमध्ये प्रामुख्याने तरुणांचा मृत्यू होत आहे अथवा त्यांना अपंगत्व येत आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांचा कोणता हट्ट पुरवायचा, याचा विचार करण्याची खरी गरज आहे.- अनिल पारस्कर, जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगडजिल्ह्यात झालेले अपघातवर्ष      अपघात   मृत्यू२०१२    १३९४     ३४२२०१३    १२५९     ३२१२०१४    १२६१     ३२८२०१५    १४२३    ३५७२०१६    ११५१    २५४२०१७    ९०४      २३०२०१८    ७९८     २४४२०१९    ७१८      १६१

टॅग्स :Accidentअपघात