शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आठ हजार अपघातात २००० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 23:19 IST

आठ वर्षांत वाढल्या दुर्घटना; नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज

- निखील म्हात्रेअलिबाग : वाहनांची सातत्याने वाढत जाणारी संख्या, विविध मार्गावरील धोकादायक वळणे, रस्त्यांची झालेली दुरवस्था, भरधाव वेगाने धावणारी वाहने यांचा एकत्रित परिणाम अपघाताला निमंत्रण ठरत आहे. जिल्ह्यात दिवसाला सरासरी तीन अपघात होत असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. जानेवारी २०१२ ते डिसेंबर २०१९ या आठ वर्षांच्या कालावधीत एकूण आठ हजार ९०८ अपघात झाले आहेत. यामध्ये दोन हजार २२६ जणांना मृत्यूने कवटाळले आहे. विविध उपाययोजना करूनही अपघात रोखण्यात म्हणावे तसे यश आले नसल्याने प्रभावी उपाय राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग हे तीन प्रमुख महामार्ग जात आहेत. याव्यतिरिक्त जिल्हाभरात विविध महामार्ग, राज्यमार्ग आणि अंतर्गत जिल्हा मार्गांचे जाळे आहे. या मार्गांवर सध्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत असल्याने अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. चालकांनी वाहन सावकाश चालवावे, यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. प्रमुख नाक्यांवर वाहतूक पोलीस वाहनचालकांची तपासणीही करण्यात येते. वाहनचालकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्यांना वाहनचालकांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. एवढे प्रयत्न करूनही अपघातांची संख्या कमी करण्यात म्हणावे तसे यश येताना दिसत नाही.काही पालक आपल्या मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांना दुचाकी घेऊन देतात. कधी-कधी काही मुलांकडे वाहन चालवण्याचा परवानाही नसतो. वाहतुकीच्या नियमांचीही माहिती नसते. त्यामुळे आजची तरुण पिढी अतिवेगाने आणि बेदरकार वाहने चालवतात, त्यामुळे त्यांचे अपघात होतात. त्याला पोलीस यंत्रणा किती पुरी पडणार, असा प्रश्न उदय भोसले या पालकांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित के ला.जमेची बाजूजानेवारी ते डिसेंबर २०१९ या वर्षात रायगड पोलीस दूरक्षेत्र हद्दीमध्ये रस्ते अपघाताच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे आश्वासक चित्र निर्माण होताना दिसत असले, तरी अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी उपाययोजना करणे गरजेचे आहे. २०१९ या वर्षात जिल्ह्यात ७१८ रस्ते अपघात झाले, त्यामध्ये १६१ जणांचा मृत्यू झाला आहे.अपघाताची प्रमुख कारणेमहामार्गांची संपूर्ण माहिती नसताना वेगाने वाहन चालविणेरस्त्यालगत इंडिकेटर न लावता थांबलेली वाहनेरस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करणेकोणतीही पूर्वकल्पना न देता वाहन दुसºया बाजूला नेणेधोकादायक वळणेमद्य पिऊन वाहन चालविणे७०% निष्काळजीपणे वाहन चालविणे8% पादचाऱ्यांचा निष्काळजीपणा7% रस्त्याची सदोष बांधणी6% खड्डे9% अन्य कारणेअपघात कमी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून विविध उपाययोजना, जनजागृती करण्यात येत आहे; परंतु वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. अपघातांमध्ये प्रामुख्याने तरुणांचा मृत्यू होत आहे अथवा त्यांना अपंगत्व येत आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांचा कोणता हट्ट पुरवायचा, याचा विचार करण्याची खरी गरज आहे.- अनिल पारस्कर, जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगडजिल्ह्यात झालेले अपघातवर्ष      अपघात   मृत्यू२०१२    १३९४     ३४२२०१३    १२५९     ३२१२०१४    १२६१     ३२८२०१५    १४२३    ३५७२०१६    ११५१    २५४२०१७    ९०४      २३०२०१८    ७९८     २४४२०१९    ७१८      १६१

टॅग्स :Accidentअपघात