शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जेएसडब्ल्यूच्या बार्जवरून केली 16 खलाशांची सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 10:26 IST

भारतीय तटरक्षक दल, रायगड पाेलीस, बंदर विभागाचे संयुक्त बचावकार्य

- अभय आपटे                                                                                                                                    लाेकमत न्यूज नेटवर्क                                                                                                                        रेवदंडा : अलिबाग तालुक्यातील रेवदंडा-साळाव येथील खाडीत जेएसडब्ल्यू कंपनीच्या एम.व्ही. मंगलम बार्जला अपघात झाला. हा मालवाहू बार्ज रेवदंडा बंदरातून मुंबईच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी हि घटना घडली.  रायगड पाेलीस, तटरक्षक दलाने बचावकार्य मोहीम राबवत १६ खलाशांची सुखरूप सुटका केली, अशी माहिती रायगडचे अतिरिक्त जिल्हा पाेलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी लाेकमतशी बाेलताना दिली.

येथील जेएसडब्ल्यू कंपनीची एम.व्ही. मंगलम बार्ज सुमारे दाेन हजार ४०० मेट्रिक टन आर्यन हा कच्चा माल घेऊन मुंबईहून निघाली हाेती. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कंपनीपासून सुमारे दीड किलाेमीटर अंतरावर असताना बार्ज समुद्रातील गाळात रुतून बसली. याबाबतची काेणतीच माहिती यंत्रणेला संबंधित कंपनीने दिली नाही. ओहाेटी सुरू झाल्याने गाळात रुतली. याबाबत रायगड पाेलिसांना माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता बचावकार्य हाती घेण्यात आले.

बुधवारी सायंकाळी साडेपाच ते गुरुवारी सकाळी साडेदहा असे तब्बल १७ तास खलाशी बार्जवरच अडकून पडले हाेते. बचाव कार्यासाठी भारतीय तटरक्षक दलाची दाेन हेलिकाॅप्टर, बाेटी बचाव कार्यात पुढे हाेत्या. १६ खलाशांना हेलिकाॅप्टरच्या, तर तीन खलाशांना बाेटीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्व खलाशांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. 

सदर मोहीम यशस्वी होण्यासाठी तटरक्षक दलाचे कॅप्टन अरुण कुमार सिंग, कर्मचारी, प्रादेशिक बंदरचे कॅप्टन चोकेश्वर लेपांडे, बंदर अधीक्षक अलिबाग अरविंद सोनावणे, रेवदंडा बंदर निरीक्षक अमर पालवणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ,  रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात, पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

या खलाशांची झाली सुखरूप सुटकाकॅप्टन सुदाम देवनाथ, सिरा राजू, मंतव्य राज, संतोष कुमार कटरी, एसके मुस्लर रहमान, मयांक तांडेल, अमित निशाद, मोहम्मद सरफराज, पवन कुमार गुप्ता, मोहम्मद कैफ, समीर विश्वकर्मा, राकेश कुमार गुप्ता, सफात मोहम्मद, मनोज कुमार जैस्वाल, पंकज कुमार पटेल, मिजान एसके.