शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

१६ कोटींची थकबाकी, महावितरणची धडक कारवाई; रायगड जिल्ह्यातून १ हजारांहून गावात अंधार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 12:39 AM

ग्रामीण भागात झाला काळोख; पथदिवे बंद : कर्जत तालुक्यात महावितरणची १६ कोटींची थकबाकी

कर्जत : ग्रामीण भागातील रस्त्यांवरील रात्रीच्या वेळी अंधार दूर करणारे पथदिवे गेले काही दिवस बंद आहेत. रायगड जिल्हा परिषदेने त्या पथदिव्यांच्या बिलाची थकबाकी रक्कम भरली नाही. त्यामुळे वीज पुरवठा खंडित केल्याने सर्व पथदिवे बंद आहेत. दरम्यान, नेरळसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये पथदिव्यांवरून राजकारण तापले असून कर्जत तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींमधील महावितरण कंपनीची थकबाकीची रक्कम तब्बल १६ कोटींच्या घरात आहे.

ग्रामीण भागातील पथदिव्यांचा पथकर ग्रामपंचायत कराच्या पावतीत समाविष्ट असतो, मात्र त्या पथदिव्यांचे वीज बिल रायगड जिल्हा परिषद भरते. त्या वीज बिलाची कोटींच्या घरातील थकबाकी महावितरण कंपनीकडे रायगड जिल्हा परिषदेने जमा केली नाही. त्यामुळे १५ मार्च रोजी महावितरण कंपनीने रायगड जिल्ह्यातील १ हजार ९० ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्या काळोखाने जिल्ह्यात गावागावात राजकारण तापले असून, नेरळ या सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीमधील पथदिवे राजकारणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. मोठी लोकवस्ती, नागरीकरण आणि मोठी बाजारपेठ यामुळे नेरळ ग्रामपंचायतीला महत्त्व आहे; मात्र त्याच नेरळ ग्रामपंचायतीमधील विजेचे पथदिवे रायगड जिल्हा परिषदेने बंद केल्याने नेरळ ग्रामपंचायत टीकेची धनी झाली आहे.

नेरळ ग्रामपंचायतीने जाहीर फलक लावून पथदिव्यांचे बिल रायगड जिल्हा परिषद भरते. त्यांनी वीज बिल भरले नसल्याने पथदिवे बंद आहेत, असे जाहीर निवेदन दिले आहे. परिणामी येथील सोशल मीडिया ग्रुपवर नेरळमधील राजकारण तापले असून नेरळ ग्रामपंचायत कसा भ्रष्टाचार करीत आहे आणि त्यात रस्त्यावरील  दिव्यांच्या मुद्द्याचा भर पडला आहे. दुसरीकडे कर्जत तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींमधील विजेची थकबाकी तब्बल १६ कोटींपर्यंत गेली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या पथदिव्यांची वीज महावितरणने खंडित केली आहे, मात्र त्या वेळी महावितरणला ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विजेच्या खांबांवर २४ तास विजेचे दिवे सुरू असल्याचे लक्षात आले. त्या दिव्यांवरही महावितरणने कारवाई करीत थकबाकी भरा आणि विजेचा पुरवठा सुरू करा, अशी भूमिका घेतली आहे.

आम्ही आठ महिन्यांपूर्वी रायगड जिल्हा परिषदेशी पथदिव्यांच्या वीज बिलाबाबत चर्चा केली होती. त्यांना मागील थकबाकी तुम्ही भरा, पुढचे चालू बिल आम्ही भरतो, असे सांगितले होते, मात्र आतापर्यंत जिल्हा परिषदने वीज बिल थकबाकी भरली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याच वेळी विरोधक अर्धवट माहितीच्या आधारे पथदिव्यांचे वीज बिल भरले नाही म्हणून आमच्यावर आरोप करीत आहेत.- रावजी शिंगवा, सरपंच, नेरळ

आमच्या मुख्य कार्यालयाकडे ग्रामीण भागातील रस्त्यावर असलेल्या पथदिव्यांच्या विजेच्या बिलापोटी थकबाकीची रक्कम रायगड जिल्हा परिषदेने भरलेली नाही. त्यात सध्याच्या महिन्यापर्यंतची थकबाकी पाहिली असता ती १६ कोटींपेक्षा जास्त आहे. जोपर्यंत शासन स्तरावर निर्णय होऊन जिल्हा परिषदेकडून थकबाकीची रक्कम भरली जात नाही, तोपर्यंत पथदिव्यांची वीज पूर्ववत होणार नाही. - गणेश देवके, उपअभियंता, महावितरण, कर्जत

टॅग्स :mahavitaranमहावितरण