शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

पनवेलमधून १५ हजार मजूर स्वगृही रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 6:28 AM

आतापर्यंत मध्यप्रदेशकरिता ५, झारखंडकरिता २, उत्तरप्रदेशकरिता २ तर बिहार आणि ओरिसाकरिता प्रत्येक एक रेल्वे सोडण्यात आल्या आहेत.

पनवेल : लॉकडाउनमुळे नवी मुंबई, पनवेल तालुक्यात अडकलेल्या मध्यप्रदेश, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आणि ओडिसा राज्यातील तब्बल १५ हजार १०४ मजूर विशेष रेल्वेने स्वगृही पाठविण्यात आले.आतापर्यंत मध्यप्रदेशकरिता ५, झारखंडकरिता २, उत्तरप्रदेशकरिता २ तर बिहार आणि ओरिसाकरिता प्रत्येक एक रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. ही सर्व प्रक्रिया पालकमंत्री आदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, पंकज दहाणे, कोकण विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (महसूल), सिद्धराम सालीमठ, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, उपजिल्हाधिकारी मनोज गोहाड, प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, तहसीलदार विशाल दौंडकर, अमित सानप यांच्या एकत्रित नियोजनाने सुरळीत पार पडली.कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर देशभरात लाखो मजूर विविध राज्यांत अडकून पडले होते. त्याचप्रमाणे रायगडमध्येही मध्यप्रदेश, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आणि ओरिसा येथील हजारो मजूर अडकले होते.रेल्वेत बसण्यापूवी सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांना स्वगृही जाण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे. या सर्वांना नवी मुंबई, रायगड जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतून पनवेल रेल्वेस्थानकात बसने आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय रेल्वेने जाणाऱ्या या सर्वांना जेवणाचे पार्सल, मास्क, साबण, सॅनिटायझरही देण्यातआले. रेल्वे विभागानेदेखील रेल्वेगाडी सॅनिटाइझर करणे व स्थानकावर निर्जंतुकीकरण केले होते.गावी जायला मिळत असल्याने मजुरांच्या चेहºयावर समाधान होते, गावी जाण्याची, कुटुंबाला भेटण्याची ओढ होती. गाडी निघताना प्रवाशांनी महाराष्ट्र शासनाचे, प्रशासनाचे, रेल्वे स्थानकात उपस्थित प्रत्येकाचेटाळ्या वाजवून मन:पर्वूक आभारव्यक्त केले.२८६ कामगार उत्तरप्रदेशला रवानामोहोपाडा : चौक परिसरातून २८६ मजूर उत्तरप्रदेशसाठी रवाना झाले आहेत. मजुरांना सुरुवातीला १२ बसमधून पनवेलला पाठविण्यात आले, त्यानंतर रेल्वेने मूळ गावी रवाना करण्यात आले. गावी जाण्याची मुभा मिळाल्यावर, कामगारांनी कुटुंबासह गर्दी केली होती. खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ निरीक्षक, तलाठी, ग्रामसेवक व कर्मचारी यांनी शेकडो कामगारांना एकत्र केले. अर्ज भरून २८६ जणांना १२ एसटी बसमधून पनवेल रेल्वेस्थानकात सोडण्यात आले. या वेळी त्यांच्यासाठी खाद्यपदार्थ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तलाठी व ग्रामसेवकांनी स्वखर्चाने केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस