शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

१,५६१ शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत, ३० गावांतील शेतकरी अद्याप वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:06 IST

महाडमध्ये १ कोटी ७५ लाख रुपये वाटप : ३० गावांतील शेतकरी अद्याप वंचित

दासगाव : महाड तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागा कडून करण्यात आले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे भरपाई देण्यात येणार आहे. तालुक्यातील ३० गावांतील शेतकरी अद्याप वंचित राहिले आहेत. आतापर्यंत जवळपास १ कोटी ७५ लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. शासकीय नियमाप्रमाणे कोकणातील शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार मदत जाहीर झाली आहे.

या वर्षी लांबलेल्या पावसामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. संपूर्ण राज्यामध्ये या वर्षीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने राज्य शासनाकडून शेतीचे पंचनामे पूर्ण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. शेतकºयांना प्रति हेक्टर ८ हजार रुपयांप्रमाणे मदतीचे वाटप जाहीर करण्यात आले आहे. अवेळी पाऊस आणि परतीच्या पावसाने महाड तालुक्यामध्ये ८ हजार ५८६ शेतकरी बाधित झाले. या नुकसानग्रस्त शेतकºयांना प्रथम टप्पा म्हणून २ कोटी २८ लाख १७ हजार १८२ रुपये नुकसानभरपाई दाखल झाली. तालुक्यांमध्ये सुमारे ८ हजार ५८६ शेतकºयांचे पंचनामे करण्यात आले असल्याची माहिती महाड तालुका कृषी विभागाने दिली आहे. तालुक्यांतील अतिदुर्गम भागांमध्येही भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले असून महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे केले गेले.सुरुवातीच्या अवेळी पावसामध्येही शेतकºयांचे नुकसान झाले होते. यातील अनेक शेतकरी अद्याप नुकसानभरपाईपासून वंचित राहिले आहेत. महाड तालुक्यातील जवळपास १ हजार ५६१ शेतकरी वंचित असल्याची माहिती महाड महसूल विभागाने दिली आहे. या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांना ५३ लाख ४ हजार ४९० रुपये येणे अपेक्षित आहे.१महाड तालुका कृषी विभाग आणि महसूल विभागातर्फे तालुक्यातील भातशेतीची पाहणी करण्यात आल्यानंतर पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. २ हजार ४०० शेतकºयांच्या शेताचे पंचनामे करण्यात आले असले तरी सुमारे ८ हजार शेतकºयांच्या भाताचे नुकसान झाले आहे. यापैकी ७०२५ शेतकºयांना १ कोटी ७५ लाख १२ हजार ६९३ रुपये वाटप झाले आहे.२महाड तालुक्याचा बहुतांशी भाग हा डोंगराळ प्रदेशाने व्यापलेला असून त्यातील बरीचशी शेती डोंगर उतारावर आहे. येथील भौगोलिक स्थितीमुळे शेतीचे क्षेत्र कमी आहे. यामुळे कमी जमीन असलेल्या शेतकºयांना गुंठा ८० रुपयेच मिळणार आहेत. तालुक्यातील २०३ शेतकºयांनी आपल्या पिकाचा विमा काढला आहे. हा विमा अ‍ॅग्रिकल्चर इन्श्युरन्स कंपनीकडून उतविण्यांत आला आहे. मात्र ज्यांना नुकसानभरपाई प्राप्त झाली आहे त्यांना विम्याची रक्कम मिळणार नाही. 

टॅग्स :Farmerशेतकरी