शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

१,५६१ शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत, ३० गावांतील शेतकरी अद्याप वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:06 IST

महाडमध्ये १ कोटी ७५ लाख रुपये वाटप : ३० गावांतील शेतकरी अद्याप वंचित

दासगाव : महाड तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागा कडून करण्यात आले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे भरपाई देण्यात येणार आहे. तालुक्यातील ३० गावांतील शेतकरी अद्याप वंचित राहिले आहेत. आतापर्यंत जवळपास १ कोटी ७५ लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. शासकीय नियमाप्रमाणे कोकणातील शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार मदत जाहीर झाली आहे.

या वर्षी लांबलेल्या पावसामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. संपूर्ण राज्यामध्ये या वर्षीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने राज्य शासनाकडून शेतीचे पंचनामे पूर्ण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. शेतकºयांना प्रति हेक्टर ८ हजार रुपयांप्रमाणे मदतीचे वाटप जाहीर करण्यात आले आहे. अवेळी पाऊस आणि परतीच्या पावसाने महाड तालुक्यामध्ये ८ हजार ५८६ शेतकरी बाधित झाले. या नुकसानग्रस्त शेतकºयांना प्रथम टप्पा म्हणून २ कोटी २८ लाख १७ हजार १८२ रुपये नुकसानभरपाई दाखल झाली. तालुक्यांमध्ये सुमारे ८ हजार ५८६ शेतकºयांचे पंचनामे करण्यात आले असल्याची माहिती महाड तालुका कृषी विभागाने दिली आहे. तालुक्यांतील अतिदुर्गम भागांमध्येही भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले असून महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे केले गेले.सुरुवातीच्या अवेळी पावसामध्येही शेतकºयांचे नुकसान झाले होते. यातील अनेक शेतकरी अद्याप नुकसानभरपाईपासून वंचित राहिले आहेत. महाड तालुक्यातील जवळपास १ हजार ५६१ शेतकरी वंचित असल्याची माहिती महाड महसूल विभागाने दिली आहे. या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांना ५३ लाख ४ हजार ४९० रुपये येणे अपेक्षित आहे.१महाड तालुका कृषी विभाग आणि महसूल विभागातर्फे तालुक्यातील भातशेतीची पाहणी करण्यात आल्यानंतर पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. २ हजार ४०० शेतकºयांच्या शेताचे पंचनामे करण्यात आले असले तरी सुमारे ८ हजार शेतकºयांच्या भाताचे नुकसान झाले आहे. यापैकी ७०२५ शेतकºयांना १ कोटी ७५ लाख १२ हजार ६९३ रुपये वाटप झाले आहे.२महाड तालुक्याचा बहुतांशी भाग हा डोंगराळ प्रदेशाने व्यापलेला असून त्यातील बरीचशी शेती डोंगर उतारावर आहे. येथील भौगोलिक स्थितीमुळे शेतीचे क्षेत्र कमी आहे. यामुळे कमी जमीन असलेल्या शेतकºयांना गुंठा ८० रुपयेच मिळणार आहेत. तालुक्यातील २०३ शेतकºयांनी आपल्या पिकाचा विमा काढला आहे. हा विमा अ‍ॅग्रिकल्चर इन्श्युरन्स कंपनीकडून उतविण्यांत आला आहे. मात्र ज्यांना नुकसानभरपाई प्राप्त झाली आहे त्यांना विम्याची रक्कम मिळणार नाही. 

टॅग्स :Farmerशेतकरी