शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रायगडला तातडीची १०० कोटींची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 06:48 IST

चक्रीवादळामुळे रायगडला बसलेल्या तडाख्याची पाहणी करत त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर नियोजन भवनातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी तातडीची १०० कोटींची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. रायगड जिल्ह्यासह राज्यातील अन्य भागांचेही नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठीही लवकरच आर्थिक मदत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

चक्रीवादळामुळे रायगडला बसलेल्या तडाख्याची पाहणी करत त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर नियोजन भवनातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पर्यावरण दिनीच पर्यावरणाची पडझड पाहिली. ‘निसर्ग’चे रौद्ररूप रायगडवासीयांनी थेट अनुभवले. मी पॅकेज जाहीर करणार नाही. पॅकेज हा घासून पुसलेला शब्द आहे, असा टोला लगावून ते म्हणाले, नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम प्रशासनाने लगेचच सुरू केले आहे. त्याचा संपूर्ण तपशील मिळेपर्यंत किमान आठ दिवस लागतील. त्यानंतर किती आर्थिक मदत करायची, याचा निर्णय घेऊ. नुकसानीची ठोस आकडेवारी आल्यावरच केंद्राकडे मदत मागणार आहे. चक्रीवादळ येण्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली आहे. जीवितहानी होऊ न देणे हे प्रामुख्याने प्रशासनाचे काम असते. तरीही कोकणात सहा जणांचा मृत्यू झाला. विजेचा खांब अंगावर पडून मृत्युमुखी पडलेले अलिबागच्या उमटे गावातील दशरथ बाबू वाघमारे (५८) यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून चार लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.

बैठकीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, आमदार भरतशेठ गोगावले, रविशेठ पाटील, जयंत पाटील, बाळाराम पाटील, महेश बालदी, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर, कोकण विभागीय आयुक्त लोकेश चंद्रा, जिल्हाधिकारी निधी चौधरी आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

असे वादळ सव्वाशे वर्षांनी...रायगड आणि वादळ हे समीकरण जिल्ह्यासाठी अजिबात नवे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाला वादळे कशी पचवायची हे माहिती आहे. परंतु हे चक्रीवादळ सव्वाशे वर्षांनी आले आणि ते रायगडावर धडकले. सध्या वादळाचा धोका टळला असला तरी कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली.

मुख्यमंत्र्यांचे आदेशरोगराई पसरू नये, यासाठी तातडीने स्वच्छता करा. आपत्तीत ज्यांची घरे, गोठे, शेती, बागायतीची हानी झाली आहे, त्या उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांची सोय करणार.अशा वादळांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी घरांची बांधणी कशी असावी याचे नियोजन करणार.सर्वाधिक नुकसान विजेच्या खाबांचे. घरांचीही पडझड आणि झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व गोष्टी पुन्हा सुरळीत करण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळ पुरविणार.वादळामुळे ज्यांचा अन्नधान्याचा आणि जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, तोही सोडविणार.

नुकसानीचे फोटो-व्हिडीओ पंचनाम्यावेळी ग्राह्यपावसाळा तोंडावर असल्याने नुकसान झालेल्यांनी नुकसानीचे फोटो-व्हिडीओ काढून ठेवावेत. शारीरिक अंतर पाळत स्वच्छता करून घ्यावी. हे फोटो-व्हिडीओ पंचनाम्यात ग्राह्य धरण्यात येतील.

 

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळUddhav Thackerayउद्धव ठाकरे