शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
2
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
3
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
4
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
5
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
6
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
7
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
8
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
9
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
10
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
11
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
12
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
13
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
14
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
15
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
16
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
17
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
18
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
19
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
20
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत

रायगडला तातडीची १०० कोटींची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 06:48 IST

चक्रीवादळामुळे रायगडला बसलेल्या तडाख्याची पाहणी करत त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर नियोजन भवनातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी तातडीची १०० कोटींची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. रायगड जिल्ह्यासह राज्यातील अन्य भागांचेही नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठीही लवकरच आर्थिक मदत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

चक्रीवादळामुळे रायगडला बसलेल्या तडाख्याची पाहणी करत त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर नियोजन भवनातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पर्यावरण दिनीच पर्यावरणाची पडझड पाहिली. ‘निसर्ग’चे रौद्ररूप रायगडवासीयांनी थेट अनुभवले. मी पॅकेज जाहीर करणार नाही. पॅकेज हा घासून पुसलेला शब्द आहे, असा टोला लगावून ते म्हणाले, नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम प्रशासनाने लगेचच सुरू केले आहे. त्याचा संपूर्ण तपशील मिळेपर्यंत किमान आठ दिवस लागतील. त्यानंतर किती आर्थिक मदत करायची, याचा निर्णय घेऊ. नुकसानीची ठोस आकडेवारी आल्यावरच केंद्राकडे मदत मागणार आहे. चक्रीवादळ येण्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली आहे. जीवितहानी होऊ न देणे हे प्रामुख्याने प्रशासनाचे काम असते. तरीही कोकणात सहा जणांचा मृत्यू झाला. विजेचा खांब अंगावर पडून मृत्युमुखी पडलेले अलिबागच्या उमटे गावातील दशरथ बाबू वाघमारे (५८) यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून चार लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.

बैठकीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, आमदार भरतशेठ गोगावले, रविशेठ पाटील, जयंत पाटील, बाळाराम पाटील, महेश बालदी, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर, कोकण विभागीय आयुक्त लोकेश चंद्रा, जिल्हाधिकारी निधी चौधरी आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

असे वादळ सव्वाशे वर्षांनी...रायगड आणि वादळ हे समीकरण जिल्ह्यासाठी अजिबात नवे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाला वादळे कशी पचवायची हे माहिती आहे. परंतु हे चक्रीवादळ सव्वाशे वर्षांनी आले आणि ते रायगडावर धडकले. सध्या वादळाचा धोका टळला असला तरी कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली.

मुख्यमंत्र्यांचे आदेशरोगराई पसरू नये, यासाठी तातडीने स्वच्छता करा. आपत्तीत ज्यांची घरे, गोठे, शेती, बागायतीची हानी झाली आहे, त्या उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांची सोय करणार.अशा वादळांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी घरांची बांधणी कशी असावी याचे नियोजन करणार.सर्वाधिक नुकसान विजेच्या खाबांचे. घरांचीही पडझड आणि झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व गोष्टी पुन्हा सुरळीत करण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळ पुरविणार.वादळामुळे ज्यांचा अन्नधान्याचा आणि जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, तोही सोडविणार.

नुकसानीचे फोटो-व्हिडीओ पंचनाम्यावेळी ग्राह्यपावसाळा तोंडावर असल्याने नुकसान झालेल्यांनी नुकसानीचे फोटो-व्हिडीओ काढून ठेवावेत. शारीरिक अंतर पाळत स्वच्छता करून घ्यावी. हे फोटो-व्हिडीओ पंचनाम्यात ग्राह्य धरण्यात येतील.

 

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळUddhav Thackerayउद्धव ठाकरे