शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

तरुण जास्त शिकत आहेत म्हणून बेराेजगार, हा माेदींचा नवीन भारत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 19:01 IST

काॅंग्रसचे राष्ट्रीय प्रवक्ते गाैरव वल्लभ यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत माेदींच्या हाऊडी माेदी या कार्यक्रमावर टीका केली.

पुणे : भारतातील तरुण माेठ्याप्रमाणावर उच्च शिक्षण घेत आहेत, त्यामुळे बेराेजगारीचे प्रमाण वाढत असल्याचा अजब अहवाल मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिला आहे, मंत्रालय असे म्हणत असेल तर हाच माेदींचा नवा भारत आहे का, असा सवाल काॅंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गाैरव वल्लभ यांनी माेंदी सरकारला केला. पुण्यात आज आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी युवक काॅंग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे, पुण्याचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माेहन जाेशी आदी उपस्थित हाेते. 

गाैरव वल्लभ म्हणाले, देशात दरवर्षी एक कराेड लाेक पदवी घेतात, त्यातील बहुतांश लाेकांना नाेकऱ्या मिळत नाहीत. सध्या देशात  20 ते 24 या वयाेगटामधील तरुणांचे बेरोजगारीचे प्रमाण 40 टक्के आहे. यातही शहरातील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. सव्वातीन करोड लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. पुण्यातील उत्पादन कंपन्यांमधील 3 लाख लाेकांच्या नाेकऱ्या गेल्या आहेत. आणखी 10 लाख लाेकांच्या नाेकऱ्या जाण्याची शक्यता आहे. ही माहिती खुद्द भारत सरकारनेच दिली आहे. एकीकडे बेराेजगारी राेज वाढत असताना तसेच देश आर्थिक संकटात असताना पंतप्रधान माेदी हाऊडी माेदी कार्यक्रमात व्यस्त आहेत. सध्या देशावर 89 लाख काेटी रुपयांचे कर्ज आहे. देशाचा जीडीपी आज 5 टक्क्यांवर आहे. कृषिक्षेत्राचा तर दाेन टक्क्यांवर आहे. शेतकरी, व्यावसायिक कोणीच सुखाने जगू शकत नाहीये. असंघटित क्षेत्र बंद पडले आहे. वाहन क्षेत्रात मंदी आहे कारण लाेकांकडे वाहन खरेदीसाठी पैसे नाहीत. असे सर्व असताना माेदी अमेरिकेत जाऊन विविध भाषांमध्ये भारतात सर्व ठिक आहे असे म्हणतात. 

पीएमसी बॅंकेबाबत बाेलताना वल्लभ म्हणाले, पीएमसी बॅंक मागील वर्षापर्यंत 100 कराेड रुपये फायद्यात हाेती. 23 ते 25 सप्टेंबर या काळत असं काय झालं की नागरिकांना पैसे काढण्यासाठी निर्बंध लादले गेले. लाेकांचे पैसै त्यांनाच काढू दिले जात नाहीत. रिझर्व बॅंक बॅंकांच्या आर्थिक स्थितीबाबत वेळाेवेळी सूचना देत असते, पीएमसी बॅंकेच्या संचालकांनी त्याकडे लक्ष का दिले नाही. या बॅंकेच्या संचालक मंडळात गेल्या 13 वर्षांपासून भाजपाच्या एका खासदाराचा मुलगा आहे, त्यामुळे या बॅंकेच्या व्यवहारांबाबत शंका येते. बॅंकेवर घातलेले निर्बंध ही एक प्रकारची नाेटबंदीची पुनरावृत्ती आहे. नागरिकांना महिन्याला 10 हजार रुपये काढता येतील ही घातलेली अट मागे घेण्यात यावी. तसेच सगळ्या संचालकांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी काॅंग्रेसची मागणी आहे. 

हाऊडी माेदी कार्यक्रमावर टीका करताना वल्लभ म्हणाले, हाऊडी माेदी कार्यक्रमामधून भारताला काहीच मिळाले नाही. एच 1 व्हिसा नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याबाबत माेदी ट्रॅम्प यांच्याशी काही बाेलले नाहीत. भारतातून निर्यात हाेणारा बासमती भात आणि सफरचंद अमेरिका यावर रासायनिक फवारणी केली आहे असे म्हणत परत पाठवत आहे, त्याबाबत देखील माेदींनी कुठलिही चर्चा केली नाही. आयात हाेणाऱ्या वस्तूंवर अमेरिका माेठ्याप्रमाणावर कर लावत आहे त्यावर सुद्धा माेदी गप्प आहेत. या कार्यक्रमातून भारतात किती गुंतवणूक आली हे माेदींने जाहीर करावे. अन्यथा हा कार्यक्रम केवळ माेदींची खासगी भेट हाेती असेच समजावे लागेल. 

काश्मीरच्या नागरिकांना विश्वासात न घेता 370 रद्द करणे हे असंवेधानिक आहे असेही वल्लभ यावेळी म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसPuneपुणेPoliticsराजकारणHowdy Modiहाऊडी मोदी