शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

तरुण जास्त शिकत आहेत म्हणून बेराेजगार, हा माेदींचा नवीन भारत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 19:01 IST

काॅंग्रसचे राष्ट्रीय प्रवक्ते गाैरव वल्लभ यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत माेदींच्या हाऊडी माेदी या कार्यक्रमावर टीका केली.

पुणे : भारतातील तरुण माेठ्याप्रमाणावर उच्च शिक्षण घेत आहेत, त्यामुळे बेराेजगारीचे प्रमाण वाढत असल्याचा अजब अहवाल मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिला आहे, मंत्रालय असे म्हणत असेल तर हाच माेदींचा नवा भारत आहे का, असा सवाल काॅंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गाैरव वल्लभ यांनी माेंदी सरकारला केला. पुण्यात आज आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी युवक काॅंग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे, पुण्याचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माेहन जाेशी आदी उपस्थित हाेते. 

गाैरव वल्लभ म्हणाले, देशात दरवर्षी एक कराेड लाेक पदवी घेतात, त्यातील बहुतांश लाेकांना नाेकऱ्या मिळत नाहीत. सध्या देशात  20 ते 24 या वयाेगटामधील तरुणांचे बेरोजगारीचे प्रमाण 40 टक्के आहे. यातही शहरातील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. सव्वातीन करोड लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. पुण्यातील उत्पादन कंपन्यांमधील 3 लाख लाेकांच्या नाेकऱ्या गेल्या आहेत. आणखी 10 लाख लाेकांच्या नाेकऱ्या जाण्याची शक्यता आहे. ही माहिती खुद्द भारत सरकारनेच दिली आहे. एकीकडे बेराेजगारी राेज वाढत असताना तसेच देश आर्थिक संकटात असताना पंतप्रधान माेदी हाऊडी माेदी कार्यक्रमात व्यस्त आहेत. सध्या देशावर 89 लाख काेटी रुपयांचे कर्ज आहे. देशाचा जीडीपी आज 5 टक्क्यांवर आहे. कृषिक्षेत्राचा तर दाेन टक्क्यांवर आहे. शेतकरी, व्यावसायिक कोणीच सुखाने जगू शकत नाहीये. असंघटित क्षेत्र बंद पडले आहे. वाहन क्षेत्रात मंदी आहे कारण लाेकांकडे वाहन खरेदीसाठी पैसे नाहीत. असे सर्व असताना माेदी अमेरिकेत जाऊन विविध भाषांमध्ये भारतात सर्व ठिक आहे असे म्हणतात. 

पीएमसी बॅंकेबाबत बाेलताना वल्लभ म्हणाले, पीएमसी बॅंक मागील वर्षापर्यंत 100 कराेड रुपये फायद्यात हाेती. 23 ते 25 सप्टेंबर या काळत असं काय झालं की नागरिकांना पैसे काढण्यासाठी निर्बंध लादले गेले. लाेकांचे पैसै त्यांनाच काढू दिले जात नाहीत. रिझर्व बॅंक बॅंकांच्या आर्थिक स्थितीबाबत वेळाेवेळी सूचना देत असते, पीएमसी बॅंकेच्या संचालकांनी त्याकडे लक्ष का दिले नाही. या बॅंकेच्या संचालक मंडळात गेल्या 13 वर्षांपासून भाजपाच्या एका खासदाराचा मुलगा आहे, त्यामुळे या बॅंकेच्या व्यवहारांबाबत शंका येते. बॅंकेवर घातलेले निर्बंध ही एक प्रकारची नाेटबंदीची पुनरावृत्ती आहे. नागरिकांना महिन्याला 10 हजार रुपये काढता येतील ही घातलेली अट मागे घेण्यात यावी. तसेच सगळ्या संचालकांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी काॅंग्रेसची मागणी आहे. 

हाऊडी माेदी कार्यक्रमावर टीका करताना वल्लभ म्हणाले, हाऊडी माेदी कार्यक्रमामधून भारताला काहीच मिळाले नाही. एच 1 व्हिसा नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याबाबत माेदी ट्रॅम्प यांच्याशी काही बाेलले नाहीत. भारतातून निर्यात हाेणारा बासमती भात आणि सफरचंद अमेरिका यावर रासायनिक फवारणी केली आहे असे म्हणत परत पाठवत आहे, त्याबाबत देखील माेदींनी कुठलिही चर्चा केली नाही. आयात हाेणाऱ्या वस्तूंवर अमेरिका माेठ्याप्रमाणावर कर लावत आहे त्यावर सुद्धा माेदी गप्प आहेत. या कार्यक्रमातून भारतात किती गुंतवणूक आली हे माेदींने जाहीर करावे. अन्यथा हा कार्यक्रम केवळ माेदींची खासगी भेट हाेती असेच समजावे लागेल. 

काश्मीरच्या नागरिकांना विश्वासात न घेता 370 रद्द करणे हे असंवेधानिक आहे असेही वल्लभ यावेळी म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसPuneपुणेPoliticsराजकारणHowdy Modiहाऊडी मोदी